शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

मॅटवरील कुस्तीचा अनुभव-- हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहाणी- लाल मात-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 1:07 AM

तो मार्च १९६६ चा काळ होता. कुस्ती संघटक व मठ तालमीचे वस्ताद बापूसाहेब राडे आमच्या गंगावेस तालमीत आले व पतियाळाला गादीवरच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आहेत तिथे दीनानाथला उतरूया,

तो मार्च १९६६ चा काळ होता. कुस्ती संघटक व मठ तालमीचे वस्ताद बापूसाहेब राडे आमच्या गंगावेस तालमीत आले व पतियाळाला गादीवरच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आहेत तिथे दीनानाथला उतरूया, असे त्यांनी सुचविले. नाशिकला झालेल्या कुस्तीमुळे तसा कुस्ती क्षेत्रात मी चांगलाच चर्चेत आलो होतो. लोकांनाही मी काहीतरी कुस्तीत नक्की करून दाखवेन, असा विश्वास वाटत होता. या स्पर्धेत तू उतरलास तर तूला निश्चित मेडल आहे, तेव्हा गादीवरून कुस्तीत तू भाग घे, असा आग्रह त्यांनी धरला. हा विषय आम्ही गवळी वस्तादांना सांगितला. ते लगेच तयार झाले. मातीची कुस्ती करून ‘महाराष्ट्र केसरी’ व्हायचे माझे स्वप्न होते. परंतू मध्येच ही संधी आली. राडे वस्ताद यांनी मला गादीवरील कुस्तीचे प्रशिक्षण देण्यासाठी बलभीम बँकेजवळील दौलतराव भोसले विद्यालयात नेले. तिथे मॅटवरचा सराव सुरू झाला. राडे वस्ताद यांच्यामुळे मी अशा कुस्तीसाठी आयुष्यात पहिल्यांदा गादीवर पाय ठेवला. तिथे पंधरा दिवस चांगला सराव केला. राडे हा कुस्तीवर जीवापाड प्रेम करणारा रांगडा माणूस. कुस्तीचे समालोचन करावे तर ते राडे यांनीच. त्यांच्यामुळे कुस्तीलाही रंगत येत असे. राडे मास्तरांचे निवेदन कुस्त्यांच्या मैदानात वेगळीच जान आणत असे. अगोदरच ईर्षेसाठी होणारी कुस्ती अधिक ईर्षेने होते. कुस्ती कलेवरील प्रेमापोटी त्यांनी बराच पदरमोड केली आहे. विभागीय,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्लांना मार्गदर्शन करणारे राडे मास्तर दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांच्या गुणांची कदर कुठे झाली नाही असे वाटते. माझ्यासह त्यांनी हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, मारुती माने, त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर नांव कमावलेले राम सारंग, संभाजी वरुटे, दादू चौगले, लक्ष्मण वडार, गणपत खेडकर, विष्णू जोशीलकर आदींना मार्गदर्शन केले.महाराष्ट्राच्या संघातून मी पतियाळा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी गेलो. गणपत खेडकर, मारुती वडार आणि मी असे तिघे त्या संघात होतो. मी ९० किलो गटातून स्पर्धेत भाग घेतला. तिथे चार दिवसांत ५ लढती खेळलो व त्यात मला रौप्यपदक मिळाले. मला मातीच्या कुस्तीचा सराव होता. बूट घालून कुस्ती करणे मला जमलेच नाही. मिलिटरीच्या माधवसिंग यांने या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. तो आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेचाही सुवर्णपदक विजेता होता. त्याने ती लढत जिंकली. त्यावेळी भीमासिंग, विश्वनाथ सिंग हे लष्कराचे गाजलेले पैलवान होते. त्यांचे गादीवरील कुस्तीत वर्चस्व असायचे. सुपर हेवी गटातून ते खेळायचे. गणपत खेडकर या गटातून खेळले परंतु त्यांना पदक मिळाले नाही. आम्ही परत कोल्हापूरला आलो. त्यानंतर वस्ताद म्हणाले गादीची कुस्ती विसरून जा व मातीचा सराव वाढव. कारण नोव्हेंबरमध्ये जळगांवला ‘महाराष्ट्र केसरी’ची स्पर्धा आहे.सांगलीहून गंगावेस तालमीत आल्याचा माझा एक फायदा झाला. सांगलीत माझे वजन ८२ किलो होते. कोल्हापुरात वातावरण चांगले. खाणे-पिणे चांगले यामुळे माझे वजन वाढू लागले. पतियाळाला मी ९० किलोगटात खेळलो; परंतु पुढच्या दोन-तीन महिन्यांत माझे वजन १०५ किलो झाले. त्यावेळी २ रुपये दिले की चड्डी शिवून मिळायची. शिवून आणलेली चड्डी मला लगेच घट्ट होऊ लागली. मी वस्तादांना म्हणू लागलो की मला चड्डी लहान होत आहे. ते म्हणाले, ‘लेका चड्डी लहान होत नाही तुझे वजन वाढले आहे.’ व्यायाम जोरात करून घेत होते. खाणंही पौष्टीक होते. त्याचा हा परिणाम होता.आता माझ्यासमोर ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा हेच ध्येय होते. या स्पर्धेत मी मुंबई संघाकडून उतरलो. कोल्हापूरहून मुंबईला गेलो व तिथून जळगांवला रेल्वेने गेलो. जळगांवला एस. टी. स्टँडजवळच कुस्तीचे मैदान होते. माझी पहिली लढत पुण्याच्या तुकाराम शिंदे यांच्या बरोबर झाली. साडेचार मिनिटे ही लढत झाली. त्यामध्ये मी त्यांना चितपट केले. सांगलीच्या शंकरराव घारे याच्याबरोबर दुसरी लढत झाली. ती देखील पाच मिनिटांत मी चीतपट केली. तिसरी व चौथी कुस्ती बीड व अहमदनगरच्या मल्लांबरोबर झाली. मी ग्रुप ‘अ’ मधून व चंबा मुत्नाळ हे ‘ब’ मधून खेळत होतो. त्यामुळे आम्ही दोन्ही गटांकडून अंतिम आलो तेव्हा ती लढत मुंबई विरुद्ध कोल्हापूर अशी झाली. आम्ही दोघेही तालीम कोल्हापुरातच करत होतो; परंतु मी मुंबईकडून खेळत असल्याने तसे घडले.- शब्दांकन : विश्वास पाटील