शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जागतिक जल दिवस विशेष: नैसर्गिक पाणीसाठा कमी झाल्याने वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न

By संदीप आडनाईक | Updated: March 22, 2024 15:50 IST

खासगी संस्थेची मदत घेण्याची गरज..

संदीप आडनाईककोल्हापूर : जंगलतोड, खाणकाम, पीक पद्धतीतील मोठे बदल, दुष्काळ, सर्वसाधारणपणे कोरडे पडणे, पाण्याच्या गुणवत्तेचा ऱ्हास, भूजल शोषून घेणे या सर्व प्रक्रियांचा वन्यजीव क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याने पश्चिम घाटातील काही ठिकाणी वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी खासगी स्वयंसेवी संस्थेची मदत घेतल्यास उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी तहान भागण्यास मदत होणार आहे.पश्चिम घाटातील राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, आजरा, चंदगड या तालुक्यांत घनदाट जंगल आहे. वन्यजीवांच्या अस्तित्वाच्या खुणा जंगल परिसरात आहेत. अशा वन्यजीवांच्या संवर्धनाचा भाग म्हणून वन विभागातर्फे जंगली भागात कृत्रिम वनतळी तयार केली जातात. कोल्हापूर वन्यजीव क्षेत्रात चार तलाव, तळी आहेत. नैसर्गिक पाण्याचे जवळपास ५० स्रोत आहेत. बारमाही ३६ आणि हंगामी १७ तळी आहेत. बारमाही १९ आणि हंगामी ८ अशी कृत्रिम वनतळी तयार केलेली आहेत. याशिवाय मोठे ५४ नाले या क्षेत्रात वाहतात.वन विभागाने पूर्वी जंगलातील वनतळी पुनरुज्जीवित करण्यास प्राधान्य दिले आहे. वास्तविक गेल्या काही वर्षांत पश्चिम घाटात साडेतीनशेहून अधिक वनतळी (पाणवठे) बांधली आहेत. त्यांपैकी निम्म्याहून अधिक तळ्यांतील पाण्याची पातळी कायम आहे; मात्र आता निम्मी तळी कोरडी पडली असून त्यांची स्वच्छता करून पुन्हा पाणवठे तयार करण्याचे आव्हान आहे. ज्या वनतळ्यांत सध्या पाणीसाठा आहे, आणि पावसाळ्याचे पाणी डिसेंबरअखेरपर्यंत टिकून राहते, तेथे उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर पाणी पूर्णतः संपून जाते. अशा वनतळ्यांत सभोवतालच्या झाडांचा पालापाचोळा पडतो. त्यामुळे तळी बुजून जातात. या तळ्यांची साफसफाई करून ते पुन्हा पाणी साठवणुकीसाठी तयार करणे गरजेचे आहे.लहान प्राण्यांना फटकाधरणालगतच्या पाणवठ्यावर मोठे वन्यजीव येतात; मात्र भयामुळे लहान प्राणी तिथे जात नाहीत. जंगलातील तळ्यांचे पाणी आटून गेल्याने त्यांना तिथेही पाणी मिळत नाही. ओलवण, देवर्डे, वाकीघोल, जांबरे, साळवण अशा भागांत वन्यजीव दिसतात, पाणी कमी झाल्याचा पहिला फटका वानरांना बसताे आणि ती रस्त्याकडेला येतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी