शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

जागतिक जल दिवस विशेष: नैसर्गिक पाणीसाठा कमी झाल्याने वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न

By संदीप आडनाईक | Updated: March 22, 2024 15:50 IST

खासगी संस्थेची मदत घेण्याची गरज..

संदीप आडनाईककोल्हापूर : जंगलतोड, खाणकाम, पीक पद्धतीतील मोठे बदल, दुष्काळ, सर्वसाधारणपणे कोरडे पडणे, पाण्याच्या गुणवत्तेचा ऱ्हास, भूजल शोषून घेणे या सर्व प्रक्रियांचा वन्यजीव क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याने पश्चिम घाटातील काही ठिकाणी वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी खासगी स्वयंसेवी संस्थेची मदत घेतल्यास उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी तहान भागण्यास मदत होणार आहे.पश्चिम घाटातील राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, आजरा, चंदगड या तालुक्यांत घनदाट जंगल आहे. वन्यजीवांच्या अस्तित्वाच्या खुणा जंगल परिसरात आहेत. अशा वन्यजीवांच्या संवर्धनाचा भाग म्हणून वन विभागातर्फे जंगली भागात कृत्रिम वनतळी तयार केली जातात. कोल्हापूर वन्यजीव क्षेत्रात चार तलाव, तळी आहेत. नैसर्गिक पाण्याचे जवळपास ५० स्रोत आहेत. बारमाही ३६ आणि हंगामी १७ तळी आहेत. बारमाही १९ आणि हंगामी ८ अशी कृत्रिम वनतळी तयार केलेली आहेत. याशिवाय मोठे ५४ नाले या क्षेत्रात वाहतात.वन विभागाने पूर्वी जंगलातील वनतळी पुनरुज्जीवित करण्यास प्राधान्य दिले आहे. वास्तविक गेल्या काही वर्षांत पश्चिम घाटात साडेतीनशेहून अधिक वनतळी (पाणवठे) बांधली आहेत. त्यांपैकी निम्म्याहून अधिक तळ्यांतील पाण्याची पातळी कायम आहे; मात्र आता निम्मी तळी कोरडी पडली असून त्यांची स्वच्छता करून पुन्हा पाणवठे तयार करण्याचे आव्हान आहे. ज्या वनतळ्यांत सध्या पाणीसाठा आहे, आणि पावसाळ्याचे पाणी डिसेंबरअखेरपर्यंत टिकून राहते, तेथे उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर पाणी पूर्णतः संपून जाते. अशा वनतळ्यांत सभोवतालच्या झाडांचा पालापाचोळा पडतो. त्यामुळे तळी बुजून जातात. या तळ्यांची साफसफाई करून ते पुन्हा पाणी साठवणुकीसाठी तयार करणे गरजेचे आहे.लहान प्राण्यांना फटकाधरणालगतच्या पाणवठ्यावर मोठे वन्यजीव येतात; मात्र भयामुळे लहान प्राणी तिथे जात नाहीत. जंगलातील तळ्यांचे पाणी आटून गेल्याने त्यांना तिथेही पाणी मिळत नाही. ओलवण, देवर्डे, वाकीघोल, जांबरे, साळवण अशा भागांत वन्यजीव दिसतात, पाणी कमी झाल्याचा पहिला फटका वानरांना बसताे आणि ती रस्त्याकडेला येतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी