शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या मास्टर प्लॅनला 'सतरा विघ्नं! निविदा प्रक्रियेतच अडकले घोडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 13:17 IST

सुधारित शहर विकास आराखड्याचे काम तब्बल दोन वर्षे रेंगाळले

भारत चव्हाणकोल्हापूर : शहराचा विकास पुढील वीस वर्षांत कशा पद्धतीने करावा, या दृष्टीने तयार केल्या जाणाऱ्या सुधारित शहर विकास आराखड्याचे काम तब्बल दोन वर्षे रेंगाळले असून, पुढील एक वर्ष तरी त्याच्या कामाला सुरुवात होणार नाही. ‘नकटीच्या लग्नाला सतरा विघ्नं’ असं म्हणतात तसंच या विकास आराखड्याचे झाले आहे. तो तत्काळ पूर्ण होऊन त्याची अंमलबजावणी सुरू व्हावी, असे कोणालाही वाटत नसल्याने त्याच्या पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोल्हापूर शहराचा दुसरा सुधारित विकास आराखडा १९९९ रोजी पूर्ण होऊन २००० सालापासून अंमलबजावणी झाली. शहराचा विकास सुनियोजित व्हावा, नागरिकांना चांगल्या सार्वजनिक सुविधा मिळाव्यात, त्यांचा त्यांना लाभ घेता यावा, आरक्षित जागांचा विकास कधी आणि कशा प्रकारे करावा याचे संपूर्ण नियोजन या आराखड्यात केलेले असते.गेल्या वीस वर्षांत दुसऱ्या सुधारित शहर विकास आराखडा किती टक्के पूर्णत्वास गेला हा संशोधनाचा विषय आहे. आता त्याच्याही पुढे जाऊन तिसरा सुधारित आराखडा रखडून ठेवून विकासामागील उदासीनता स्पष्ट केली आहे.२०१९ वर्ष संपत असताना कामाला सुरुवात व्हायला पाहिजे होती. तोपर्यंत २०२० मध्ये कोरोनासारखी महामारी आली. त्यात गेल्या दीड वर्षापासून काम रखडले. कोरोना कमी होऊन निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक तयारी केली जात होती. पाच वेळा निविदा प्रक्रिया राबविली गेली. काम करण्यास कोणी ठेकेदार मिळाला नाही. आता सहाव्यांदा निविदा जाहीर होणार तोवर राज्य सरकारने मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केले. पुन्हा त्यावर काम झाले. निविदा प्रक्रियाची कागदपत्रे, आराखडे नगररचना उपसंचालक यांच्याकडे छाननीसाठी पाठविण्यात आली आहेत. त्यांच्याकडून छाननी पूर्ण झाल्यावर हे काम अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे जाणार आहे. समितीच्या मान्यतेनंतर निविदा प्रसिद्ध होईल.२०२३ साल उजाडणार समितीची मान्यता मिळण्यास किमान एक महिना, तर तेथून पुढे विकास आराखडा तयार करण्यास एक वर्ष लागणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याचा अर्थ २०२३ सालापर्यंत तरी शहराचा विकास आराखडा पूर्ण होणार नाही, असे दिसते.उत्साहापेक्षा उदासीनताच अधिक - सभागृहाचे अस्तित्व नसल्यामळे अधिकाऱ्यांच्या मागे लागणार कोण? हा प्रश्न आहे. 

- दैनंदिन कामाचा वर्कलोड लक्षात घेता आराखडा तयार करण्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. ही उदासीनता शहराच्या विकासाच्या दृष्टीने अडचणीची ठरली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर