शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

चिचडोह प्रकल्पाचे काम प्रगतीवर

By admin | Updated: June 18, 2017 01:24 IST

जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील प्रस्तावित बंधाऱ्यांपैकी चिचडोह बंधारा, कोटगल उपसा सिंचन,

वर्षभरात काम पूर्ण होणार : माजी आमदारांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील प्रस्तावित बंधाऱ्यांपैकी चिचडोह बंधारा, कोटगल उपसा सिंचन, हल्दीपुराणी उपसा सिंचन या प्रकल्पांना काँग्रेसच्या काळात प्रशासकीय मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यात आली. चामोर्शी तालुक्यातील चिचडोह प्रकल्पाला तत्कालीन सरकारने १५२ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. सदर प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून हे काम वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चिचडोह प्रकल्पाच्या कामाची पाहणी नुकतीच केली. यावेळी काँग्रेसचे महासचिव प्रभाकर वासेकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, चामोर्शी तालुकाध्यक्ष निशांत नैताम, विनोद खोबे, वैभव भिवापुरे, प्रमोद भगत, विजय शातलवार तसेच काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसच्या तत्कालीन राज्य सरकारने हल्दीपुराणी उपसा सिंचन योजनेस ४५ कोटी व कोटगल उपसा सिंचन प्रकल्पाला ५५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला, असे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी म्हटले आहे. विद्यमान भाजपप्रणित राज्य सरकारने कोटगल व हल्दीपुराणीचा सिंचन प्रकल्पास पुरेसा निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे या प्रकल्पाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. भाजप सरकारने व लोकप्रतिनिधींनी या सिंचन प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्यास हे प्रकल्प पूर्ण करण्यास पाच ते सहा वर्षाचा कालावधी लागेल. तसेच या प्रकल्पाची किंमत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे डॉ. उसेंडी यांनी म्हटले आहे. ७८ टक्क्यांपैकी अर्धा टक्के वनजमीन सरकारने प्रकल्पांना दिल्यास हे प्रकल्प मार्गी लागू शकतात. मात्र यासाठी इच्छाशक्ती आवश्यक आहे.