शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गडबडीने घळभरणी केल्याने आंबेओहोळ धरणाचे काम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST

उत्तूर : धरणग्रस्तांचे पुनर्वसन सध्या थांबले असून धरणाच्या घळभरणीचे काम मात्र पूर्ण होत आले आहे. पूर्वेकडील संपूर्ण लांबीवर पिचिंग ...

उत्तूर :

धरणग्रस्तांचे पुनर्वसन सध्या थांबले असून धरणाच्या घळभरणीचे काम मात्र पूर्ण होत आले आहे. पूर्वेकडील संपूर्ण लांबीवर पिचिंग न करता घळभरणी केली जात आहे. त्यातच अवकाळी पाऊस लागल्याने धरणाच्या पूर्व बाजूला माती बंधारा वाहून जाताना दिसत आहे. त्यामुळे आंबेओहोळ प्रकल्पाचे काम धोकादायक बनल्याचे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून कॉ. शिवाजी गुरव यांनी केले आहे.

पावसाळाभर अशीच स्थिती राहिल्यास धरणाच्या बांधाची बरीच माती वाहून जाणार आहे. आजपर्यंत जिल्ह्यात कोणत्या धरणाला एका बाजूने पिचिंग दगड लावणे असे झाले नाही. चित्रीपासून सर्व पूर्ण झालेल्या धरणांना दोन्ही बाजूने दगड लावून पिचिंग केले आहे. मात्र, धरणांमध्ये पाणी अडविण्याची घाई झाल्याने पूर्व बाजूची पिचिंग केले जाणार नसल्याचे समजते.

कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या धरणाला पिचिंग होणार नाही याचे शेतकरी व जाणकार मंडळी आश्चर्य व्यक्त करत आहेत. याचा धोका शेजारील शेतकऱ्यांना आहे. शिवाय धरणाला पावसाळ्यात भेगा पडणार आहेत. पहिल्याच पावसाने पडलेल्या भेगा(खागी) मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.

अवकाळी पावसाचे पहिले थोडे पाणी धरणात साठलेले दिसत आहे. अजून घळभरणीचे काम पूर्ण झालेले नाही. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे कामही कोरोना लॉकडाऊनमुळे थांबले आहे. आता धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय कोण देणार, असा प्रश्नही प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.

-------------------------

* धरणाला धोका नाही

प्रकल्पाच्या कामाचा धरणाला कोणताही धोका नाही. धरणाच्या पूर्वेकडील बाजूस दगडी पिचिंगची मंजुरी नाही. अतिवृष्टी असलेल्या ठिकाणी दोन्ही बाजूस पिचिंग असते. पाणी जाण्यास वाट असते. त्यामुळे धरणाला भेगा पडतात असे नव्हे. घळभरणीचे काम दोन मीटर शिल्लक आहे. योग्य ती खबरदारी घेऊन काम सुरू आहे, अशी माहिती जलसंपदा विभाग आंबेओहोळ प्रकल्प यांनी दिली.

------------------------

-

फोटो ओळी : आंबेओहोळ प्रकल्पात वळीव पावसाने झालेला पाणीसाठा.

क्रमांक : १८०५२०२१-गड-०१