शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

पाल गावामधील महिलांनी नोंदवला निषेध, रिकाम्या घागरी ठेवल्या चौकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 19:07 IST

श्रीकांत ऱ्हायकर कोल्हापूर/धामोड : राधानगरी तालुक्यात पाणी टंचाईचे ढग यावर्षी प्रचंड गडद झाले आहेत. तालुक्याच्या पश्चिम बाजुस असणाऱ्या धामोड परिसरातील ...

ठळक मुद्देपाल गावामधील महिलांनी नोंदवला निषेधरिकाम्या घागरी ठेवल्या चौकात

श्रीकांत ऱ्हायकरकोल्हापूर/धामोड : राधानगरी तालुक्यात पाणी टंचाईचे ढग यावर्षी प्रचंड गडद झाले आहेत. तालुक्याच्या पश्चिम बाजुस असणाऱ्या धामोड परिसरातील बहुतांशी वाडया- वस्त्या पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत. पाल बु॥ गावामधील पाणीटंचाईची बिकट परस्थिती पाहता संतप्त  ग्रामस्यांनी पाण्याचा रिकाम्या टाकी भोवती बसून तर माहिलांनी रिकाम्या घागरी गावच्या चौकात ठेऊन निषेध नोंदवला.साधारणता ५०० लोकवस्ती असणारे हे गांव चांदे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आहे. या गावासाठी दहा वर्षापूवी 'केकतीचा झरा ' नावाच्या ओढया जवळून थेट सायफनने पाणी गावाशेजारील टाकीत टाकून नळाद्वारे गावाला पुरविण्यात आले.  पण गेल्या ४०ते ५० वर्षात पहिल्यांदाच ह्या झऱ्याचे पाणी या वर्षी आटल्याने गेल्या महिनाभरापासून गावात पाणीच नाही. पिण्याचे पाणी महिला चार ते पाच किलोमिटरची पायपीट करून आणत आहेत. ऊस पीक तर हातचे केंव्हाच निघून गेले आहे. ग्रामस्यांना व जनावरांना तर या भीषण पाणी व चारा टंचाईस गेल्या एक महीन्यापासून तोंड द्यावे लागत आहे.ग्रामपंचायतीची वाट न पाहता १ लाख रुपयाचा निधी वर्गणीच्या माध्यमातुन गावकऱ्यांनी गोळा करत दोन बोअर मारल्या पण त्याही बोअरना पाणी न लागल्याने पुन्हा एकदा एका कुटुंबाला १४०० रुपयाप्रमाणे वर्गणी गोळा करून या दोन दिवसात पुन्हा दुसरे बोअर घेण्याचा निर्णय केलाय.

घागरभर पाण्यासाठी पाच -सहा किलोमिटरची रोजची पायपीट करून घरात पाणी आणाणाऱ्या आईच्या डोळ्याकडे पाहिल्यावर माझे मन हेलावून जाते हे कुठेतरी थांबले पाहिजे . यासाठी शासन स्तरावरील निधीची वाट न पाहता गावातील तरूणांना एकत्र करून स्वनिधीतूनच पाणी टंचाईवर उपाय शोधायला आमचा प्रयत्न आहे .भगवान पाटील, ग्रामस्थ 

 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईkolhapurकोल्हापूर