शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

नेत्याने निवडणूक न लढवण्याचं केलं जाहीर, ..अन् महिलांनी नेत्याच्या घरावरच मारला ठिय्या; कोल्हापुरातील घटना

By विश्वास पाटील | Updated: November 24, 2022 18:57 IST

ग्रामस्थांच्या आग्रहापुढे नेत्याला बदलावा लागला निर्णय

कोल्हापूर-चुये : सद्या गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अनेक इच्छुकांनी जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. आपल्यालाच पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी अनेकांनी फिल्डींग देखील लावली आहे. असे असतानाच कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील म्हाळुंगे गावामधील एका प्रमुख कार्यकर्त्याने आपण निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. अन् गावातील सुमारे साडेचारशे महिलांनी या नेत्यांच्या घरावरच ठिय्या आंदोलन केले. या नेत्याने अर्ज भरण्याचा शब्द दिल्यावरच महिलांनी त्यांचे दार सोडले.म्हाळुंगे गावातील चौगले यांचे घराणे नेहमीच सर्वांच्या मदतीला धावून जाणारे. वडिलांच्या निधनानंतर गेल्या पंचवार्षिकला त्यांच्या आई पार्वती चौगले या थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या. प्रकाश चौगले यांचा कोल्हापुरात पशुखाद्य विक्रीचा व्यवसाय आहे. परंतु, त्यांनी गावाच्या विकासात लक्ष घालण्याचे ठरविले. अन् गावचा चेहरा मोहराच बदलून टाकला.यंदा सरपंचपद खुले असल्याने त्यांनी आता हा विकासाचा रथ अन्य कुणीतरी पुढे न्यावा म्हणून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रकाश यांनी घेतलेला हा निर्णय ग्रामस्थांना मान्य झाला नाही. अन् गावातील महिलांनी त्यांच्या घरावर धडक देऊन जोपर्यंत तुम्ही अर्ज भरण्याचा शब्द देत नाही, तोपर्यंत अन्न-पाणी घेणार नाही, असा निर्धार केला. शेवटी प्रकाश यांना ग्रामस्थांच्या आग्रहापुढे निर्णय बदलावा लागला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक