शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

सकलजनांशिवाय मराठी भाषा धोरण अपूर्ण

By admin | Updated: February 25, 2015 00:01 IST

महावीर जोंधळे : बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र व भाषा संचालनालयातर्फे राष्ट्रीय चर्चासत्र

कोल्हापूर : मराठी भाषा ही आपली मायबोली असून महाराष्ट्राची ती ‘राजभाषा’ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे मराठी भाषेचे धोरण ठरविताना सकलजनांचा विचार करणे गरजेचे आहे. त्याशिवाय मराठी भाषा धोरण परिपूर्ण होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे यांनी शनिवारी (दि. २१) शिवाजी विद्यापीठात केले.विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि मराठी विभाग, राज्य शासनाच्या भाषा संचालनालय व मराठी भाषा विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात लेखक जोंधळे यांचे बीजभाषण झाले. ‘महाराष्ट्र राज्याचे पुढील २५ वर्षांचे मराठी भाषा धोरण’ असा चर्चासत्राचा विषय होता. सिनेट हॉलमधील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.लेखक जोंधळे म्हणाले, इंग्रजीच्या माध्यमातून मराठीचे शोषण होत आहे. भाषाप्रदूषणाची लागण सर्वत्र झाली आहे. एखाद्या वस्तूचे नामकरण करताना मराठी प्रमाणीकरणाचा मोठा प्रश्न आहे.कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, मातृभाषा ही महत्त्वाची आहे. तिचा विकास करणे ही प्रत्येक मराठी माणसांची जबाबदारी आहे. मराठी समृद्ध होण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.भाषा संचालनालयाचे विनय मालवणकर यांनी मराठी भाषाविषयक कृती कार्याचा आढावा घेतला. डॉ. नीळकंठ शेरे, महेंद्र कदम, अनिल सपकाळ, सारीपुत्र तुपेरे, विनोद गायकवाड आदींनी विचार मांडले. मराठी विभागप्रमुख डॉ. कृष्णा किरवले यांनी प्रास्ताविक केले. सोनम खराडे, आशा रावण, राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश कांबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)