शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

सकलजनांशिवाय मराठी भाषा धोरण अपूर्ण

By admin | Updated: February 25, 2015 00:01 IST

महावीर जोंधळे : बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र व भाषा संचालनालयातर्फे राष्ट्रीय चर्चासत्र

कोल्हापूर : मराठी भाषा ही आपली मायबोली असून महाराष्ट्राची ती ‘राजभाषा’ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे मराठी भाषेचे धोरण ठरविताना सकलजनांचा विचार करणे गरजेचे आहे. त्याशिवाय मराठी भाषा धोरण परिपूर्ण होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे यांनी शनिवारी (दि. २१) शिवाजी विद्यापीठात केले.विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि मराठी विभाग, राज्य शासनाच्या भाषा संचालनालय व मराठी भाषा विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात लेखक जोंधळे यांचे बीजभाषण झाले. ‘महाराष्ट्र राज्याचे पुढील २५ वर्षांचे मराठी भाषा धोरण’ असा चर्चासत्राचा विषय होता. सिनेट हॉलमधील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.लेखक जोंधळे म्हणाले, इंग्रजीच्या माध्यमातून मराठीचे शोषण होत आहे. भाषाप्रदूषणाची लागण सर्वत्र झाली आहे. एखाद्या वस्तूचे नामकरण करताना मराठी प्रमाणीकरणाचा मोठा प्रश्न आहे.कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, मातृभाषा ही महत्त्वाची आहे. तिचा विकास करणे ही प्रत्येक मराठी माणसांची जबाबदारी आहे. मराठी समृद्ध होण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.भाषा संचालनालयाचे विनय मालवणकर यांनी मराठी भाषाविषयक कृती कार्याचा आढावा घेतला. डॉ. नीळकंठ शेरे, महेंद्र कदम, अनिल सपकाळ, सारीपुत्र तुपेरे, विनोद गायकवाड आदींनी विचार मांडले. मराठी विभागप्रमुख डॉ. कृष्णा किरवले यांनी प्रास्ताविक केले. सोनम खराडे, आशा रावण, राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश कांबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)