शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अकरा लाखांच्या चुराड्यानंतर विकत घेतली अक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 13:20 IST

zp kolhapur-उच्च न्यायालयातील याचिका मागे घेतल्याने बुधवारी निधी वाटपाचा वाद तब्बल नऊ महिन्यांनी मिटला खरा; पण यावर झालेला अकरा लाख रुपये खर्च पाहिल्यावर याचसाठी केला होता का अट्टहास, असे म्हणण्याची वेळ आली आहे. सामंजस्याने प्रश्न सोडवता येत असतानादेखील केवळ गटबाजी आणि एकमेकांचे उट्टे काढण्याच्या प्रवृत्तीमुळे अकरा लाख रुपयांचा चुराडा करून जिल्हा परिषदेने अक्कल विकत घेतल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेतील कारभार नऊ महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर संवादानेच सुटला प्रश्न

नसीम सनदीकोल्हापूर : उच्च न्यायालयातील याचिका मागे घेतल्याने बुधवारी निधी वाटपाचा वाद तब्बल नऊ महिन्यांनी मिटला खरा; पण यावर झालेला अकरा लाख रुपये खर्च पाहिल्यावर याचसाठी केला होता का अट्टहास, असे म्हणण्याची वेळ आली आहे. सामंजस्याने प्रश्न सोडवता येत असतानादेखील केवळ गटबाजी आणि एकमेकांचे उट्टे काढण्याच्या प्रवृत्तीमुळे अकरा लाख रुपयांचा चुराडा करून जिल्हा परिषदेने अक्कल विकत घेतल्याचे चित्र आहे.गतवर्षी एप्रिल मेमध्ये १५ व्या वित्त आयोगातून १२ कोटींचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला. तेराव्या आणि चौदाव्या वित्त आयोगाचा निधी तत्कालीन भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीला डावलूनच एकट्याने वापरला असल्याची सल मनात असल्याने सत्तेवर आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीबाबत उट्टे काढण्यासाठी विरोधी भाजपच्या सदस्यांना धोबीघाट दाखवला. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला.

१२ कोटींचा निधी येऊनदेखील केवळ खर्च होत नसल्याने तो पडून राहत असल्याची माहिती असतानादेखील या दोघांमध्ये टोकाचा संघर्ष सुरू राहिला. सत्ताधारी असल्याने सर्वाधिक वाटा आमचाच, असा पदाधिकाऱ्यांचा, तर केंद्राचा निधी असल्याने समसमान वाटला गेला पाहिजे, असा विरोधकांचा हेका कायम राहिला.

याबाबत बैठका बोलाविण्यात आल्या; पण सर्वसाधारण सभा सोडली, तर दोघेही समोरासमोर एकदाही बसले नाहीत. अखेर हा वाद जुलैमध्ये उच्च न्यायालयात गेला आणि सत्ताधारी, विरोधकांच्या कोर्टाच्या वाऱ्या सुरू झाल्या. या याचिका वैयक्तिक स्वरूपाच्या असल्याने विरोधी गटाकडून राजू मगदूम व राजवर्धन निंबाळकर यांनी आर्थिक बाजू उचलली. सत्ताधारी गटाकडून उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनीही खिशात हात घातला.तब्बल १५ वेळा सुनावणीनऊ महिन्यांत मुंबईत तब्बल १५ वेळा सुनावणी झाली. विशेष वकील नेमले गेले. पदाधिकाऱ्यांचीही अनेक वेळा मुंबई वारी झाली. यात विरोधकांचे साडेचार ते पाच लाख रुपये खर्च झाले. सत्ताधाऱ्यांचे सहा लाख रुपये खर्च झाले. एवढा खर्च करूनही शेवटी सामंजस्याने यावर तोडगा काढण्यात आला. जे न्यायालयाला जमले नाही ते परस्परातील संवादाने करून दाखवले; पण केवळ अहंकारामुळे सत्ताधारी व विरोधकांनी नऊ महिने विकास निधी रोखून धरला आणि शेवटी स्वत:च्या खिशातील पैसाही घालवला. त्यामुळे यातून काय मिळवले, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.हम नही सुधरेंगेबुधवारी वित्त आयोगाच्या निधी वाटपाच्या याचिका मागे घेतल्याचे पत्र येत असतानाच त्यासोबत दलित वस्ती निधीवरून विरोधी सदस्य राहुल आवाडे यांनी आता न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. ३६ कोटींचा निधी हातकणंगलेतील सभापतींना दोन कोटी रुपये, तर उर्वरित सदस्यांना ३५ लाख दिले आहेत. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये पुन्हा ठिणगी पडली आहे. त्यामुळे वित्त आयोगाच्या निधीवरून सत्ताधारी व विरोधकांचे तोंड पोळले असताना पुन्हा न्यायालयाचा इशारा देऊन हम नही सुधरेंगे असाच संदेश दिला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर