शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

लाभांशावरून वादळी चर्चा

By admin | Updated: August 15, 2014 00:23 IST

बँकेला पॅकेज देण्याबाबत उद्या, शुक्रवारी सहकारमंत्र्यांना भेटण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

कोल्हापूर : सात वर्षे लाभांश नसल्याने साडेआठशे संस्था अनिष्ट दुराव्यात आल्या, बँक सदृढ झाली तरीही लाभांश देणार नसाल तर विकास संस्थांना कुलुपे लावायची का? अशी विचारणा करीत यावर्षी लाभांश मिळालाच पाहिजे, अशी मागणी संस्था प्रतिनिधींनी जिल्हा बॅँकेच्या सभेत लावून धरली. तब्बल अडीच तास केवळ लाभांशावर चर्चा करत प्रशासनाला धारेवर धरले. बँकेला पॅकेज देण्याबाबत उद्या, शुक्रवारी सहकारमंत्र्यांना भेटण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. जिल्हा बॅँकेची ७६ वी सभा आज, गुरुवारी शाहू सांस्कृतिक मंदिर, कोल्हापूर येथे झाली. अध्यक्षस्थानी प्रशासक प्रतापसिंह चव्हाण होते. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन रोखत बाबासाहेब पाटील यांनी गेल्या सभेतील ५ टक्के लाभांश वाटपाचे काय झाले, लाभांश न मिळाल्याने संस्थांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून देत लाभांश विषयाला तोंड फोडले. ‘नाबार्ड’च्या निकषांनुसार लाभांश देता येत नसल्याचे प्रशासक चव्हाण यांनी सांगितले. यावर हरकत घेत कर्मचाऱ्यांचे पगार वाढवताना तुमचे निकष कोठे गेले होते, असे पाटील यांनी विचारणा केली. बॅँकेच्या दूषित दृष्टिकोनामुळे साडेआठशे संस्था तोट्यात गेल्या आहेत. लाभांश देता येत नसेल, तर ६ टक्के दराने व्याजरूपात ‘रिबेट’ द्या, अशी पी. डी. पाटील यांनी मागणी केली. बॅँक संचित तोट्यातून अजून दहा वर्षे निघणार नाही, तोपर्यंत संस्था जिवंत राहणार नसल्याचे सांगत बॅँकेच्या धोरणामुळे चांगल्या संस्था बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप बाळासाहेब खाडे यांनी केला. संस्थांना वाटपासाठी १०० टक्के पीक कर्ज द्या, ५० हजारांपर्यंतचे कर्ज मंजुरीचे अधिकार संस्थांना देण्याची मागणीही त्यांनी केली. लाभांश नसल्याने ‘कोजिमाशि’ पतसंस्थेचे ६० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगत राज्य बँक तुम्हाला लाभांश देत असेल, तर आम्हाला का देत नाही, अशी विचारणा दादासाहेब लाड यांनी केली. २६ कोटी व्याज परताव्याच्या नफ्यातून लाभांश द्या, दहा हजारांपेक्षा जादा असणारी शेअर्सवरील रक्कम ठेवीला वर्ग करा, अशी मागणी पुंडलिक पाटील यांनी केली. कायदा मोडायचा नसतो, वाकवायचा असतो, त्यानुसार लाभांश ऐवजी सभासद सक्षमीकरण योजनेतून ५ टक्के मोबदला द्या, अशा ठरावास कार्यत्तोर मंजुरी घ्या, अन्यथा आमरण उपोषणास बसू, असा इशारा किसन कुराडे यांनी दिला. शासनाने शेतकऱ्यांना ‘०’ टक्के व्याजाने पीक कर्ज देण्याचे धोरण घेतले तर त्यांची पूर्तता केली पाहिजे. बॅँकेने १०० टक्के पीक कर्ज द्यावे व स्वभांडवालातून मध्यम मुदत वाटपास परवानगी द्यावी, अशी मागणी खाडे यांनी केली. शाखांतील सेवेबाबत अनेकांनी तक्रारी केल्या. चालू खात्यावरील रकमा वापरण्यास संस्थांना मोकळीक असल्याचे प्रशासकांनी सांगितले. (प्रतिनिधी)संचालकांना झटका द्यासंचालकांवरील ‘कलम ८८’च्या चौकशीचे काय झाले, अशी विचारणा करत त्यांना चांगला झटका द्या, अशी मागणी पुंडलिक पाटील यांनी केली. गायकवाड, तांबाळे कारखान्यांना नोटिसाबँकेच्या थकबाकीबाबत उदयसिंह गायकवाड कारखाना व इंदिरा गांधी महिला कारखाना, तांबाळे यांना फौजदारीबाबत नोटिसा लागू केल्याची माहिती प्रशासक चव्हाण दिली. असे झाले ठराव-मागण्या ठराव ४सभासद सक्षमीकरण योजनेतून ५ टक्के मोबदला द्या-‘नाबार्ड’ने १०० टक्के पीक कर्ज द्यावे.-बॅँकेवर अशासकीय प्रशासक मंडळ नकोमागण्या४लाभांशाऐवजी ‘रिबेट’ द्या - ५० हजारांपर्यंतचे कर्ज वाटपाचे अधिकारी संस्थांना द्या -दहा हजारांपेक्षा जादा शेअर्स रक्कम ठेवीला वर्ग करा.-राज्य बॅँकेप्रमाणे शासनाने जिल्हा बँकेला आर्थिक मदत करावी.मोठ्या संस्थांना वसुलीला मदत केली तर बॅँक निसटेल. ‘दौलत’, ‘गायकवाड’, ‘राधानगरी स्टार्च’, ‘ तांबाळे कारखाना’ व ‘ तंबाखू समूह’ या पाच बड्या थकबाकीदारांमुळे बँकेचा ताळेबंद अडकल्याचे प्रशासकांनी सांगितले. ‘ओटीएस’ योजना पुन्हा सुरूथकीत कर्जातून बाहेर पडण्यासाठी एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) सुरू करण्याची मागणी कुराडे यांनी केली. त्याला प्रशासकांनी मान्यता दिली.