शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

बिद्री कारखाना निवडणूक: परिवर्तनाला उभारी; पण ‘के.पी.’च ठरणार भारी?

By राजाराम लोंढे | Updated: December 4, 2023 13:14 IST

‘ए.वाय.’, ‘आबीटकर’, बाबासाहेब पाटील यांची मुसंडी शक्य

राजाराम लोंढेकोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी ईर्षेने मतदान झाले. सत्तारूढ महालक्ष्मी आघाडीने सत्ता राखण्यासाठी, तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीने परिवर्तनासाठी कंबर कसली; पण कारखान्याच्या राजकारणाचा अंंडरकरंट पाहता ‘बिद्रीत परिवर्तनाला उभारी दिसत असली तरी के.पी. पाटीलच पुन्हा भारी ठरतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.परिवर्तन आघाडीने लावलेल्या जोडण्या १०० टक्के यशस्वी झाल्या तरच काहीतरी त्यांना संधी दिसते. तीन गटांत या आघाडीचे उमेदवार सत्तारूढ गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळेच ए.वाय. पाटील, अर्जुन आबीटकर व बाबासाहेब पाटील हे मुसंडी मारण्याची शक्यताही नाकारता येत नाही.‘बिद्री’च्या निवडणुकीत या वेळेला नेत्यांनी खांदेपालट केली आहे. गेल्या वेळेला ए.वाय. पाटील, समरजित घाटगे हे सत्तारूढ आघाडी, तर माजी आमदार दिनकरराव जाधव विरोधी आघाडीसोबत होते. पाटील, घाटगे विरोधात, तर जाधव सत्तारूढ गटासोबत गेले. सुरुवातीच्या टप्प्यात एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत विरोधकांनी चांगलीच हवा तयार केली. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, ए.वाय. पाटील व समरजित घाटगे यांनी कमालीच्या जोडण्या लावल्या. त्यामुळे सत्तारूढ आघाडीची पुरती दमछाक केली. आता नाहीतर कधीच नाही, या इराद्याने परिवर्तन आघाडी रिंगणात उतरली होती.राजकारणातील सर्व नीतींचा प्रभावीपणे वापर केल्याने हवा करण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे विरोधी परिवर्तन आघाडीला काहीशी उभारी मिळेल, असेच वातावरण होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत सत्तारूढ आघाडीने लावलेल्या जोडण्या विशेषकरून पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील व भाजपचे राहुल देसाई यांनी आपापल्या गटातील मतदारांना चांगलेच जखडून ठेवले. प्रत्येकावर जबाबदारी देत त्या यशस्वी करण्याचा आदेश दिला. त्यामुळे दोन दिवसांत हळूहळू वातावरण बदलत गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले.कार्यक्षेत्रात कानोसा घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील हेच भारी ठरतील, असे चित्र दिसत आहे. मात्र, काही गटांत सत्तारूढ आघाडीच्या उमेदवारांची दमछाक होणार, हे निश्चित आहे. यामध्ये ए.वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, अर्जुन आबीटकर, बालाजी फराकटे हे मुसंडी मारू शकतात.

अफवांचा झटका..

निवडणुकीत शेवटपर्यंत एकमेकांच्या कच्च्या दुव्यांवर आघात करण्याची एकही संधी दोन्ही आघाड्यांनी सोडली नाही. अफवा पसरवून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्नही झाला, अफवा आणि वस्तुस्थितीचा परिणाम किती खाेलवर गेला, यावरच निकाल अवलंबून आहे.सतेज पाटील यांच्या जोडण्या..आमदार सतेज पाटील हे आतापर्यंत करवीरमध्ये एक उमेदवार देऊन फारसा भाग घेत नव्हते. मात्र, या वेळेला पाच जागा घेतल्याच; पण त्याबरोबरच सत्तारूढ पॅनलची धुरा खांद्यावर घेऊन अगदी योग्य पद्धतीने जोडण्या लावल्या आहेत. या जोडण्याच त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवणार, असा सूर उमटत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकK P. Patilके. पी. पाटीलPrakash abitkarप्रकाश आबिटकर