शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बिद्री कारखाना निवडणूक: परिवर्तनाला उभारी; पण ‘के.पी.’च ठरणार भारी?

By राजाराम लोंढे | Updated: December 4, 2023 13:14 IST

‘ए.वाय.’, ‘आबीटकर’, बाबासाहेब पाटील यांची मुसंडी शक्य

राजाराम लोंढेकोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी ईर्षेने मतदान झाले. सत्तारूढ महालक्ष्मी आघाडीने सत्ता राखण्यासाठी, तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीने परिवर्तनासाठी कंबर कसली; पण कारखान्याच्या राजकारणाचा अंंडरकरंट पाहता ‘बिद्रीत परिवर्तनाला उभारी दिसत असली तरी के.पी. पाटीलच पुन्हा भारी ठरतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.परिवर्तन आघाडीने लावलेल्या जोडण्या १०० टक्के यशस्वी झाल्या तरच काहीतरी त्यांना संधी दिसते. तीन गटांत या आघाडीचे उमेदवार सत्तारूढ गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळेच ए.वाय. पाटील, अर्जुन आबीटकर व बाबासाहेब पाटील हे मुसंडी मारण्याची शक्यताही नाकारता येत नाही.‘बिद्री’च्या निवडणुकीत या वेळेला नेत्यांनी खांदेपालट केली आहे. गेल्या वेळेला ए.वाय. पाटील, समरजित घाटगे हे सत्तारूढ आघाडी, तर माजी आमदार दिनकरराव जाधव विरोधी आघाडीसोबत होते. पाटील, घाटगे विरोधात, तर जाधव सत्तारूढ गटासोबत गेले. सुरुवातीच्या टप्प्यात एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत विरोधकांनी चांगलीच हवा तयार केली. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, ए.वाय. पाटील व समरजित घाटगे यांनी कमालीच्या जोडण्या लावल्या. त्यामुळे सत्तारूढ आघाडीची पुरती दमछाक केली. आता नाहीतर कधीच नाही, या इराद्याने परिवर्तन आघाडी रिंगणात उतरली होती.राजकारणातील सर्व नीतींचा प्रभावीपणे वापर केल्याने हवा करण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे विरोधी परिवर्तन आघाडीला काहीशी उभारी मिळेल, असेच वातावरण होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत सत्तारूढ आघाडीने लावलेल्या जोडण्या विशेषकरून पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील व भाजपचे राहुल देसाई यांनी आपापल्या गटातील मतदारांना चांगलेच जखडून ठेवले. प्रत्येकावर जबाबदारी देत त्या यशस्वी करण्याचा आदेश दिला. त्यामुळे दोन दिवसांत हळूहळू वातावरण बदलत गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले.कार्यक्षेत्रात कानोसा घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील हेच भारी ठरतील, असे चित्र दिसत आहे. मात्र, काही गटांत सत्तारूढ आघाडीच्या उमेदवारांची दमछाक होणार, हे निश्चित आहे. यामध्ये ए.वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, अर्जुन आबीटकर, बालाजी फराकटे हे मुसंडी मारू शकतात.

अफवांचा झटका..

निवडणुकीत शेवटपर्यंत एकमेकांच्या कच्च्या दुव्यांवर आघात करण्याची एकही संधी दोन्ही आघाड्यांनी सोडली नाही. अफवा पसरवून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्नही झाला, अफवा आणि वस्तुस्थितीचा परिणाम किती खाेलवर गेला, यावरच निकाल अवलंबून आहे.सतेज पाटील यांच्या जोडण्या..आमदार सतेज पाटील हे आतापर्यंत करवीरमध्ये एक उमेदवार देऊन फारसा भाग घेत नव्हते. मात्र, या वेळेला पाच जागा घेतल्याच; पण त्याबरोबरच सत्तारूढ पॅनलची धुरा खांद्यावर घेऊन अगदी योग्य पद्धतीने जोडण्या लावल्या आहेत. या जोडण्याच त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवणार, असा सूर उमटत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकK P. Patilके. पी. पाटीलPrakash abitkarप्रकाश आबिटकर