शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बिद्री कारखाना निवडणूक: परिवर्तनाला उभारी; पण ‘के.पी.’च ठरणार भारी?

By राजाराम लोंढे | Updated: December 4, 2023 13:14 IST

‘ए.वाय.’, ‘आबीटकर’, बाबासाहेब पाटील यांची मुसंडी शक्य

राजाराम लोंढेकोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी ईर्षेने मतदान झाले. सत्तारूढ महालक्ष्मी आघाडीने सत्ता राखण्यासाठी, तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीने परिवर्तनासाठी कंबर कसली; पण कारखान्याच्या राजकारणाचा अंंडरकरंट पाहता ‘बिद्रीत परिवर्तनाला उभारी दिसत असली तरी के.पी. पाटीलच पुन्हा भारी ठरतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.परिवर्तन आघाडीने लावलेल्या जोडण्या १०० टक्के यशस्वी झाल्या तरच काहीतरी त्यांना संधी दिसते. तीन गटांत या आघाडीचे उमेदवार सत्तारूढ गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळेच ए.वाय. पाटील, अर्जुन आबीटकर व बाबासाहेब पाटील हे मुसंडी मारण्याची शक्यताही नाकारता येत नाही.‘बिद्री’च्या निवडणुकीत या वेळेला नेत्यांनी खांदेपालट केली आहे. गेल्या वेळेला ए.वाय. पाटील, समरजित घाटगे हे सत्तारूढ आघाडी, तर माजी आमदार दिनकरराव जाधव विरोधी आघाडीसोबत होते. पाटील, घाटगे विरोधात, तर जाधव सत्तारूढ गटासोबत गेले. सुरुवातीच्या टप्प्यात एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत विरोधकांनी चांगलीच हवा तयार केली. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, ए.वाय. पाटील व समरजित घाटगे यांनी कमालीच्या जोडण्या लावल्या. त्यामुळे सत्तारूढ आघाडीची पुरती दमछाक केली. आता नाहीतर कधीच नाही, या इराद्याने परिवर्तन आघाडी रिंगणात उतरली होती.राजकारणातील सर्व नीतींचा प्रभावीपणे वापर केल्याने हवा करण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे विरोधी परिवर्तन आघाडीला काहीशी उभारी मिळेल, असेच वातावरण होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत सत्तारूढ आघाडीने लावलेल्या जोडण्या विशेषकरून पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील व भाजपचे राहुल देसाई यांनी आपापल्या गटातील मतदारांना चांगलेच जखडून ठेवले. प्रत्येकावर जबाबदारी देत त्या यशस्वी करण्याचा आदेश दिला. त्यामुळे दोन दिवसांत हळूहळू वातावरण बदलत गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले.कार्यक्षेत्रात कानोसा घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील हेच भारी ठरतील, असे चित्र दिसत आहे. मात्र, काही गटांत सत्तारूढ आघाडीच्या उमेदवारांची दमछाक होणार, हे निश्चित आहे. यामध्ये ए.वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, अर्जुन आबीटकर, बालाजी फराकटे हे मुसंडी मारू शकतात.

अफवांचा झटका..

निवडणुकीत शेवटपर्यंत एकमेकांच्या कच्च्या दुव्यांवर आघात करण्याची एकही संधी दोन्ही आघाड्यांनी सोडली नाही. अफवा पसरवून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्नही झाला, अफवा आणि वस्तुस्थितीचा परिणाम किती खाेलवर गेला, यावरच निकाल अवलंबून आहे.सतेज पाटील यांच्या जोडण्या..आमदार सतेज पाटील हे आतापर्यंत करवीरमध्ये एक उमेदवार देऊन फारसा भाग घेत नव्हते. मात्र, या वेळेला पाच जागा घेतल्याच; पण त्याबरोबरच सत्तारूढ पॅनलची धुरा खांद्यावर घेऊन अगदी योग्य पद्धतीने जोडण्या लावल्या आहेत. या जोडण्याच त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवणार, असा सूर उमटत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकK P. Patilके. पी. पाटीलPrakash abitkarप्रकाश आबिटकर