शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रस्त्याकडे माय-बाप सरकार लक्ष देणार का?

By admin | Updated: November 28, 2014 23:46 IST

अरळगुंडीकरांची व्यथा : तीन वर्षांपासून दुर्दशा

रवींद्र येसादे - उत्तूर --गेली तीन वर्षे रस्त्याच्या दुर्दशेत अडकलेल्या चिमणे-अरळगुंडी (ता. भुदरगड) रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. माय-बाप सरकार या रस्त्याकडे लक्ष देईल का? अशी विचारणा अरळगुंडी ग्रामस्थ करीत आहेत.अरळगुंडी-बेडीव-सावतवाडी ही भुदरगड तालुक्यातील गावे आजरा तालुक्यातून या गावांना प्रवेश करावा लागतो. गेली तीन वर्षे रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या मदतीतून रस्त्यावर मुरूम जे.सी.बी. टॅक्टरच्या साह्याने टाकला जातो. पूर्वी केलेला डांबरी रस्ता नामशेष झाला आहे.मुरूमाच्या साह्याने रस्त्याची डागडुजी करण्यात येत आहे. पण पावसाळ्यात रस्त्यात चिखलाचे साम्राज्य पसरते. त्यामुळे प्रवास करणे वाहनधारकांना जिकिरीचे बनले आहे.अरळगुंडी-बेडीव-सावतवाडी या गावांना बाजारहाटसाठी उत्तूर (ता. आजरा) या बाजारपेठेत यावे लागते. त्यामुळे त्यांचा नित्याचा संबंध येतो. या रस्त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे मैल कामगार नसल्यामुळे रस्त्याची देखभाल ग्रामस्थांनाच करावी लागत आहे. चिकोत्रा प्रकल्पामुळे परिसरात उसाचे प्रमाण अधिक आहे. रस्ता चांगला नसल्याने ट्रकचालक ट्रकाची वाहतूक करीत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत व शेतकरी यांनाच चिमणेपासून बेडीवपर्यंत १५ कि. मी. रस्ता करावा लागतो. त्यामुळे माय-बाप सरकारने या रस्त्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.रस्त्याची दुर्दशा उडाल्याने या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तालुक्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे लक्ष या ग्रामीण भागातील गावाकडे असावे. वाहतुकीसाठी आणखी किती आर्थिक बोजा ग्रामस्थांनी सोसावयाचा असा प्रश्नही ग्रामस्थांना खुणावतो. त्यामुळे आमदार आबिटकर यांनी या लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.