शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

रस्त्याकडे माय-बाप सरकार लक्ष देणार का?

By admin | Updated: November 28, 2014 23:46 IST

अरळगुंडीकरांची व्यथा : तीन वर्षांपासून दुर्दशा

रवींद्र येसादे - उत्तूर --गेली तीन वर्षे रस्त्याच्या दुर्दशेत अडकलेल्या चिमणे-अरळगुंडी (ता. भुदरगड) रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. माय-बाप सरकार या रस्त्याकडे लक्ष देईल का? अशी विचारणा अरळगुंडी ग्रामस्थ करीत आहेत.अरळगुंडी-बेडीव-सावतवाडी ही भुदरगड तालुक्यातील गावे आजरा तालुक्यातून या गावांना प्रवेश करावा लागतो. गेली तीन वर्षे रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या मदतीतून रस्त्यावर मुरूम जे.सी.बी. टॅक्टरच्या साह्याने टाकला जातो. पूर्वी केलेला डांबरी रस्ता नामशेष झाला आहे.मुरूमाच्या साह्याने रस्त्याची डागडुजी करण्यात येत आहे. पण पावसाळ्यात रस्त्यात चिखलाचे साम्राज्य पसरते. त्यामुळे प्रवास करणे वाहनधारकांना जिकिरीचे बनले आहे.अरळगुंडी-बेडीव-सावतवाडी या गावांना बाजारहाटसाठी उत्तूर (ता. आजरा) या बाजारपेठेत यावे लागते. त्यामुळे त्यांचा नित्याचा संबंध येतो. या रस्त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे मैल कामगार नसल्यामुळे रस्त्याची देखभाल ग्रामस्थांनाच करावी लागत आहे. चिकोत्रा प्रकल्पामुळे परिसरात उसाचे प्रमाण अधिक आहे. रस्ता चांगला नसल्याने ट्रकचालक ट्रकाची वाहतूक करीत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत व शेतकरी यांनाच चिमणेपासून बेडीवपर्यंत १५ कि. मी. रस्ता करावा लागतो. त्यामुळे माय-बाप सरकारने या रस्त्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.रस्त्याची दुर्दशा उडाल्याने या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तालुक्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे लक्ष या ग्रामीण भागातील गावाकडे असावे. वाहतुकीसाठी आणखी किती आर्थिक बोजा ग्रामस्थांनी सोसावयाचा असा प्रश्नही ग्रामस्थांना खुणावतो. त्यामुळे आमदार आबिटकर यांनी या लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.