शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- जोतिबा डोंगर विकासाचं 'चांगभलं': मंदिर 'देवस्थान'पासून वेगळे होणार का ? कशी असेल प्राधिकरणाची रचना 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 20, 2025 15:46 IST

योग्य पुनर्वसनाची ग्रामस्थांची अपेक्षा

इंदुमती गणेशकोल्हापूर : जोतिबा मंदिर विकास प्राधिकरण झाल्यानंतर जोतिबा मंदिर स्वतंत्र होणार का, येथे स्वतंत्र समिती पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार का, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे मंदिरावर अधिपत्य असणार की नाही, पूजेसंबंधीच्या गुरवांच्या हक्कांना बाधा येणार का, असे अनेक प्रश्न प्राधिकरणच्या निमित्ताने तयार झाले आहेत. जोतिबा मंदिर हे बहुजनांचे दैवत आहे, अठरा पगड जातीचे भाविक आमच्याकडे शिधा देतात, नैवेद्य पाेटभर खाऊन तृप्त मनाने जातात. यावर आमचा उदरनिर्वाह आहे. विकासाला विरोध नाही, फक्त परंपरा, धार्मिक विधी, कुलाचाराला आणि व्यवसायाला बाधा येऊ नये, योग्य पुनर्वसन व्हावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थांची संख्या ५ ते ६ हजारांच्या आसपास आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने आता तिथे प्रशासक आहेत. डोंगरावर ८० टक्के लोक पुजारी आहेत. त्यांच्याकडे विविध भागातून भाविक शिधा घेऊन येतात. पुजाऱ्यांनी केलेला नैवेद्य देवाला दाखवतात, जेऊन आपल्या गावी परततात. हे पौरोहित्य आणि भाविकांना सोयी-सुविधा, पूजेच्या साहित्यांची विक्री हाच येथील गुरव समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. प्राधिकरण झाल्यानंतर आमच्या या हक्कांवर बाधा येणार नाही ना, या ग्रामस्थांच्या चिंतेचा विषय आहे.

एकत्र बैठक घ्यातिरुपतीप्रमाणे या मंदिराचेही व्यावसायिकीकरण झाले तर काय? मूळ स्थानिकांनाच बाहेर काढून उपऱ्यांना व्यवसायाची परवानगी दिली गेली, तर आम्ही कुठे जायचे, काय खायचे. कोणता व्यवसाय करायचा अशा अनेक शंका ग्रामस्थांमध्ये आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची एकत्र बैठक घेऊन त्यांच्यासमोर जोतिबा आराखडा सादर करावा, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, शंकांचे निराकरण करावे, त्यांनी सुचवलेले संयुक्तिक बदल करून आराखडा पुढे राबवता येईल.

मंदिर स्वतंत्र करून अध्यक्षपद एकास देण्याची चर्चा राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने कार्यकर्त्यांना पदे देऊन मुरवायचे कुठे, असा प्रश्न नेत्यांना पडला आहे. जोतिबा प्राधिकरण झाले की, अध्यक्षांपासून पदाधिकारी, सदस्यांची समितीच स्वतंत्र होणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे त्याचे अधिकार असणार नाहीत. जोतिबा मंदिर स्वतंत्र करून त्याचे अध्यक्षपद एका पक्षाला द्यायचे अशाही चर्चा सुरू असल्याचे समजते. प्राधिकरणचे कामकाज स्वतंत्रपणे चालेल.

वनखात्याचे उत्तम कामया भागात वनखात्याने उत्तम काम केले असून वृक्षसंपदा वाढली आहे. माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर यांच्या ३ कोटी निधीतून कल्पवृक्ष तलावाचे संवर्धन झाले आहे. पण, डोंगरावरील अन्य ७ तलावांचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. त्यांचे संवर्धन झालेले नाही.

विकासाला विरोध नाही. पण, जोतिबावरील ८० टक्के ग्रामस्थ मंदिरावर अवलंबून आहेत. मंदिराचा विकास व्हावा, पण परंपरा खंडित होऊ नये. स्थानिक नागरिकांचे म्हणणे ऐकून त्यांना विश्वासात घेऊन आराखडा राबवला गेला, तर सर्वांचे सहकार्यच असेल. पण, विकासाच्या नावाखाली व्यावसायिकरण आणि स्थानिकांनाच बेरोजगार करू नये.  - नवनाथ लादे, जोतिबा हक्कदार समिती

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा