शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जयंतरावांपुढे सदाभाऊंच्या मंत्रिपदाची तुतारी वाजणार का?

By admin | Updated: June 4, 2016 00:29 IST

वाळवा-शिराळ्यातील चित्र : विरोधकांकडे कार्यकर्त्यांची वानवा असल्याने त्यांचे आव्हान तोकडे; आता तरी कार्यकर्त्यांना बळ मिळणार का?

अशोक पाटील -- इस्लामपूर वाळवा-शिराळ्यात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या संस्थांची ताकद मोठी आहे. तेथील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांच्या जोरावर प्रत्येक निवडणुकीत आ. पाटील बाजी मारतात. विरोधकांकडे कार्यकर्त्यांची वानवा असल्याने त्यांचे आव्हान तोकडे ठरते. आता ‘आमदार’ होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांचीतरी ताकद वाढून आ. पाटील यांच्यापुढे सशक्त पर्याय निर्माण होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.शिराळ्याच्या शिवाजीराव देशमुख यांनी कॅबिनेट मंत्री, विधान परिषदेच्या सभापतीपदापर्यंत मजल मारली. सध्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनीही मंत्रीपद भूषविले आहे. माजी आमदार मानसिंगराव नाईक हेही आमदार होते. या मतदार संघातील राजकीय समीकरणे नेहमीच बदलतात. आता या मतदार संघातील, मात्र वाळवा तालुक्यातील सदाभाऊ खोत यांना भाजपने आमदारकी देऊन मंत्रीपदाचे आश्वासन दिले आहे.वाळवा तालुक्यात मात्र वेगळे चित्र आहे. राजारामबापू पाटील यांनी उभ्या केलेल्या संस्था जयंत पाटील यांनी वाढवल्या आहेत. या तालुक्यातील अण्णासाहेब डांगे यांनी पाच वर्षे मंत्रीपद भूषविले. परंतु त्यांना कार्यकर्त्यांच्या रूपाने ताकद दाखवता आली नाही. तथापि सूतगिरणी व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी पाय रोवले आहेत. हुतात्मा संकुलाचे संस्थापक क्रांतिसिंह नागनाथअण्णा नायकवडी आमदार झाले. त्यानंतर वाळवा व परिसरातील १५ गावांवर पकड मजबूत करून सहकार, शिक्षण क्षेत्रात त्यांनी प्रगती केली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र वैभव नायकवडी यांनी सर्व सूत्रे हाती घेतली. मात्र त्यांची ताकद आ. पाटील यांच्यापुढे तोकडी पडत गेली. शिक्षकांच्या बळावर येलूरचे शिवाजीराव पाटील आणि इस्लामपूरच्या भगवानराव साळुंखे यांनी आमदारपद मिळवले, पण त्यांनी बांधलेल्या शिक्षक संघटनेची ताकद आता दिसत नाही.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी पश्चिम महाराष्ट्रात ऊसदर आंदोलन पेटवले होते. त्याचा शेतकऱ्यांना फायदाही झाला. या आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचे नेते जयंत पाटील यांचा उघड विरोध होता. तरीही संघटनेने आंदोलन तीव्र केले. लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, आर.पी.आय., स्वाभिमानी व इतर पक्षांनी एकत्र येऊन महायुती केली. हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी निवडून आले, परंतु माढ्यातून खोत पराभूत झाले. मोदी लाटेच्या जोरावर भाजपची सत्ता आली. खोत यांचा निसटता पराभव झाल्याने त्यांना आमदार, मंत्रिपदाची संधी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. भाजपच्या नेत्यांनी दिलेला शब्द पाळला असून खोत यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे. ते आमदार होतील, मंत्रीपदही मिळेल. परंतु वाळवा तालुक्यात प्राबल्य असलेल्या आ. पाटील यांच्यापुढे त्यांची ताकद कितपत चालणार, हे लवकरच दिसून येईल.ऊस उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरजपरिसरात ६0 ते ६५ टक्के शेतकरी ऊस उत्पादक आहेत. त्यामुळे उसाला दर मिळण्यासाठी ऊस उत्पादक लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या पाठीशी राहतात, तर विधानसभेला आमदार जयंत पाटील यांना निवडून देतात. भाजपसोबत असलेल्या राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी यंदा ऊसदरप्रश्नी कसलेही आंदोलन केले नाही. त्यामुळे अद्याप कारखान्यांनी एफआरपीच्या रकमाही दिलेल्या नाहीत. त्यामुळे जयंत पाटील यांच्यापुढे स्वाभिमानीची ताकद तोकडीच पडणार आहे.शिंदेंनी नेतृत्व स्वीकारलेशरद पवार यांच्या सरकारमध्ये वाळव्यातून पराभूत झालेले प्रा. एन. डी. पाटील, राजारामबापू पाटील मंत्री झाले. परंतु या दोघांना पराभूत करणारे विलासराव शिंदे आमदार होऊनही मंत्रिपदाविना राहिले. आता तर शिंदे हे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत.