शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेचा समझोता विकासात दिसणार का ?

By admin | Updated: December 21, 2015 00:33 IST

गडहिंग्लज नगरपालिका : शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची संधी

राम मगदूम -- गडहिंग्लज नगरपालिकेतील विषय समित्यांच्या सभापती निवडीत ‘समझोता’ करून सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही ‘समित्या’ वाटून घेतल्या. सत्तेसाठी झालेला हा ‘समझोता’ आणि ‘एकजूट’ शहराच्या विकासात दिसणार का? अशी चर्चा शहरवासीयांत आहे.चार वर्षांपूर्वी झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य आघाडीचा पाडाव करून राष्ट्रवादी सत्तेत आली. ‘जनता दल-जनसुराज्य’ला ८, तर ‘राष्ट्रवादी’ला ९ जागा मिळाल्या. मात्र, अंर्तगत मतभेदामुळेच जनतेने दिलेली सत्ता राष्ट्रवादीला पाच वर्षे टिकविता आली नाही.काठावरील बहुमतामुळे नगरपालिकेतील सत्तांतराचे कवित्व गेली दोन वर्षे सुरूच राहिले. गतवर्षीच्या विषय समित्यांच्या निवडीच्यावेळी सत्ता आणि बहुमत असतानाही केवळ सभापतिपदासाठी नामनिर्देशनपत्रे भरताना केलेल्या चुकीमुळे बांधकाम व वाचनालय या दोन समित्यांच्या सभापतिपदावर राष्ट्रवादीला पाणी सोडावे लागले. तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी जनता दल दोघांनीही गतवर्षीच्या विषय समित्यांच्या निवडीला आव्हान दिल्यामुळे बांधकाम आणि वाचनालय ही दोनही सभापतिपदे वर्षभर रिक्तच राहिली. सत्ता असूनही राष्ट्रवादीला आपल्या नगरसेवकांना सभापतिपदाची संधी देता आली नाही.राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजीचा लाभ उठवत जनता दलाने सहा महिन्यांपूर्वीच पुन्हा पालिकेचीच सत्ता ताब्यात घेतली. महिला व बालकल्याण सभापती सुंदराबाई बिलावर यांनीच नगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या विरोधात बंडखोरी केल्यामुळे वर्षभर समित्यांच्या बाहेर राहिलेल्या राष्ट्रवादीला पालिकेच्या सत्तेवरही पाणी सोडावे लागले.सध्या केवळ नाममात्र उपनगराध्यक्षपदच राष्ट्रवादीकडे आहे. काठावरील बहुमतामुळे एक समिती विरोधकांना मिळतेच. त्यानुसार वाचनालय समिती आता राष्ट्रवादीला मिळाली आहे. यावर्षीच्या विषय समित्यांच्या निवडीत सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही एकत्र बसून सामोपचाराने तोडगा काढल्यामुळेच प्रत्येक समितीमध्ये विरोधकांनाही प्रतिनिधित्व मिळाले आहे. एका अर्थाने सत्तेत सहभाग आणि काम करण्याची संधीच विरोधकांनाही मिळाली आहे. सत्तेसाठी झालेली ही एकजूट शहराच्या विकासात दिसावी एवढीच शहरवासीयांची अपेक्षा आहे.जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्याची संधी!हद्दवाढीला मंजुरी मिळविणे, रिंगरोडची कामे मार्गी लावणे, सांडपाणी व कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे, अतिक्रमणे हटवून शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे आणि नागरिकांना वाहतूक सुरक्षिततेची हमी देणे, महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास, सुसज्ज नाट्यगृह बांधकाम, प्रांतकचेरीसाठी भाड्याने दिलेली जागा परत मिळविणे आणि नगरपालिका शाळांची पटसंख्या वाढविणे हे शहरातील प्रमुख प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. निवडणुकीत दोनही आघाड्यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिलेली ही आश्वासने आहेत. एकजुटीने या वचनांची पूर्तता करण्याची संधी आता मिळाली आहे.