शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

चंदगड नगरपंचायतीचे स्वप्न सत्यात उतरणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:46 IST

चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळून नागरी जीवन जगण्याची स्वप्ने पाहणाऱ्या चंदगड शहरवासीयांना नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी शासनाची सुरू असलेली चालढकल यामुळे

ठळक मुद्दे नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली ! : शासनाच्या चालढकलीमुळे नागरिकांत संताप, पालकमंत्र्यांचे आश्वासन हवेतच

नंदकुमार ढेरे ।चंदगड : चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळून नागरी जीवन जगण्याची स्वप्ने पाहणाऱ्या चंदगड शहरवासीयांना नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी शासनाची सुरू असलेली चालढकल यामुळे नागरिकांत तीव्र संताप आहे. याचा परिणाम लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेला चंदगड तालुका. तालुक्याची वाढती लोकसंख्या नागरी वस्तीकडे वाटचाल करीत आहे. निसर्गाच्या वरदानामुळे तालुक्याला मोठा नावलौकिक मिळाला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चंदगडची छोट्या शहराकडे वाटचाल सुरू आहे.केवळ ब्रिटिश काळापासून ‘महाल’चा दर्जा मिळाल्यामुळे या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये आहेत. दूरवर ख्याती असलेल्या प्राचीन देव श्री रवळनाथ मंदिर, मंदिराच्या भोवतालच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू, तलाव, धुण्याचे कुंड, लहान मोठी-मंदिरे, सध्या जीर्णोद्धार केलेले रवळनाथ मंदिर, बाबा गार्डन, नामवंत काजू प्रक्रिया कारखाने, शाळा, महाविद्यालय, विविध प्रकारचे व्यवसाय, आदी कारणांमुळे चंदगडचा विस्तार पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तरकडे विस्तारलेला आहे.

तालुक्याला नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे शासनाचे काम आहे. मागील शासनाने तालुक्याच्या ठिकाण असलेल्या सर्व ग्रा. पं.ना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव जारी केला होता. त्यानुसार चंदगडला नगरपंचायतीचा दर्जा मिळालाच पाहिजे. नगरपंचायतीसाठी लागणारे सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करूनही केवळ राजकीयदृष्ट्या चंदगडला नगरपंचातीचा दर्जा देताना वंचित ठेवले आहे.

चंदगडनजीकच्या आजरा शहराला मात्र नगरपंचायतीचा दर्जा देताना शासनाला कोणतीच अडचण आली नाही. मात्र, चंदगडसाठी हात अकडता घेण्यात आला. त्यामुळे भेदाची वागणूक स्पष्ट झाली. पालकमंत्री चंद्रकांतपाटील यांनी चंदगडला मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी हजेरी लावून केलेले भाष्य पोकळ ठरले.1 चंदगडवासीयांनी नगरपंचायतीच्या मागणीसाठी उभारलेला लढा अगदी सनदशीर आहे. चंदगडवासीय नागरिक आग्रही आहेत; पण संयमी आहेत. ते आपला हक्क लोकशाही मार्गाने मिळवतील. नगरपंचायतीच्या मागणीच्या लढ्यासाठी श्रद्धास्थान असलेल्या श्री देव रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात पहिली बैठक घेण्यात आली.

2 याठिकाणापासून लढ्याची दिशा ठरवित सनदशीर लढा सुरू करण्यात आला. अखेरच्या टप्प्यात पावसाळ्यापूर्वी नवीन प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. राजकीय स्थानिक नेत्यांनीही पाठिंबा दर्शवत सहभाग घेतला. मात्र, राजकीय वजन कमी पडल्याने चंदगडच्या नगरपंचायतीचा निर्णय लोबंकळत राहिला आहे.

3 नागरिकांच्या सनदेतील एका भागानुसार जे गाव नागरी वसाहतीकडे वाटचाल करीत आहे. ज्या गावची लोकसंख्या १५००० ते २५००० दरम्यान आहे. भौगोलिक क्षेत्राची वाढ होऊन वस्ती मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे, अशा ठिकाणी नगरपंचायत स्थापन करता येते, हे खुद्द नागरिकशास्त्र सांगते. मात्र, चंदगडला शासन ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यापासून का वंचित ठेवत आहे? हे मात्र न सुटणारे कोडे आहे.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर