शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maratha Reservation-तमिळनाडू व महाराष्ट्राला वेगवेगळा न्याय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 14:22 IST

तमिळनाडू राज्यात आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून ६९ टक्के झाली. गेली २६ वर्षे तेथील समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतो. मग महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर आक्षेप कसा? आरक्षणाबाबत तमिळनाडू व महाराष्ट्राला वेगवेगळा न्याय का? अशी विचारणा खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी राज्यसभेत केली.

ठळक मुद्देतमिळनाडू व महाराष्ट्राला वेगवेगळा न्याय का?मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे यांची राज्यसभेत विचारणा

कोल्हापूर : तमिळनाडू राज्यात आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून ६९ टक्के झाली. गेली २६ वर्षे तेथील समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतो. मग महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर आक्षेप कसा? आरक्षणाबाबत तमिळनाडू व महाराष्ट्राला वेगवेगळा न्याय का? अशी विचारणा खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी राज्यसभेत केली.मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने त्याचे पडसाद मंगळवारपासून सुरू झालेल्या अधिवेशनात उमटले. पहिल्याच दिवशी खासदार संभाजीराजे यांनी हा विषय राज्यसभेत अतिशय आक्रमकपणे लावून धरलाच. त्याचबरोबर महाराष्ट्रातील राज्यसभा व लोकसभा खासदारांनी आपआपल्या परीने सभागृहात आवाज उठवण्यासाठी ते सातत्याने खासदारांच्या संपर्कात राहिले.

खासदार संभाजीराजे म्हणाले, मोठ्या कष्टाने आणि त्यागातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत पाचजणांच्या न्यायपीठासमोर हा विषय ठेवला आहे. यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले असून विविध ठिकाणच्या नियुक्त्या, शैक्षणिक प्रवेश धोक्यात आल्याने विशेषत: तरुण हवालदिल झाला आहे.

राजर्षी शाहू महाराज यांनी मागासलेल्या बहुजन समाजासाठी ५० टक्के आरक्षण दिले होते. त्यामध्ये मराठा समाजाचा समावेशही होता. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, अशी भूमिका मांडली होती.

सामाजिक व आर्थिक मागासलेपणामुळे हा समाज दरारिद्र्यात राहत आहे. आरक्षणाअभावी समाजाची आर्थिक घडी बिघडलेली आहे. राज्य शासनाने आरक्षणाबाबत विविध अभ्यास समित्यांची नेमणूक केली. त्यांनीही आरक्षण गरजेचे असल्याचे म्हटल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. तमिळनाडू राज्यात गेली २६ वर्षे अशाच प्रकारचे आरक्षण सुरू आहे. तिथेही ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून ६९ टक्के झाली. मग महाराष्ट्राला वेगळा न्याय का? अशी विचारणा खासदार संभाजीराजे यांनी राज्यसभेत केली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूरParliamentसंसद