शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

दोष कुणाचा...? -- दष्टिक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:09 IST

कोल्हापुरातील शिवाजी पुलाचा कठडा तोडून मिनीबस पंचगंगेत कोसळली आणि त्यात १३ जण ठार झाले. यामुळे नव्या शिवाजी पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

चंद्रकांत कित्तुरे  

कोल्हापुरातील शिवाजी पुलाचा कठडा तोडून मिनीबस पंचगंगेत कोसळली आणि त्यात १३ जण ठार झाले. यामुळे नव्या शिवाजी पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या अपघाताला कारणीभूत कोण? पर्यायी पूल कुणामुळे? कशामुळे? रखडला यावर उलट - सुलट चर्चा सुरू झाली आहे. ज्या पुलावरून अपघात झाला तो १४० वर्षे जुना आहे. त्याचे आयुर्मान संपले म्हणून पर्यायी पूल या पुलाशेजारीच बांधण्यात येत आहे. मात्र, हा नवा पूल बांधत असताना आवश्यक ते सर्व परवाने घेतले गेले नाहीत. पुलाचा काही भाग पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येतो त्यांचाच परवाना घेतला गेला नाही. त्यामुळे पुरातत्त्व खात्याने या कामाला आक्षेप घेतला आणि पुलाचे काम अर्ध्यावरच थांबले. ते पुन्हा सुरू व्हावे म्हणून कोल्हापुरात सर्वपक्षीय कृती समितीच्या नेतृत्वाखाली अनेकवेळा आंदोलनही झाले. मात्र, कायद्याचाच अडथळा असल्याने त्याला मंजुरी मिळू शकली नाही. खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनीही आपले राजकीय वजन पणाला लावून अखेर यासंदर्भातील कायद्यातच बदल करण्याचा निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडले. कायद्यातील ही प्रस्तावित दुरुस्ती लोकसभेत मंजूर झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ती राज्यसभेतही मंजूर होईल आणि या पुलाचे काम मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे. हे सर्व जरी खरे असले तरी मुळात सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करूनच पुलाचे काम का सुरू केले नाही? हा सवाल उरतोच. आपल्याकडे कोणतेही काम रेटून करण्याचा, ‘काय होतंय बघुया’ असे म्हणून कामे सुरू करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी अनेकवेळा झालेला दिसून येतो. यामुळेच नवीन सुरू झालेली कामे रखडतात. कारण त्याला कुणीतरी आव्हान देतो, विरोध करतो, आंदोलनही केले जाते. परिणामी एकतर ती योजना किंवा प्रकल्प गुंडाळावा लागतो किंवा तो तसाच लटकत रहातो. यात कोट्यवधी रुपये खर्ची पडलेले असतात. तेही वाया जातात. शिवाजी पुलाच्या बाबतीत तसे होणार नाही. कारण कायद्यात बदल झाल्यानंतर तो पूर्ण होणार आहे. मात्र, या पुलाचा खर्च कितीतरी वाढला आहे. तो वेळेत पूर्ण झाला असता तर नागरिकांचीही सोय झाली असती आणि पैसाही वाचला असता. या पुलावर छोटे मोठे अपघात होत होते. सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर या पुलावरील वाहतूकही काहीकाळ बंद करण्यात आली होती. स्ट्रक्चरल आॅडीटही करण्यात आले होते. शुक्रवारच्या दुर्घटनेनंतर पुन्हा स्ट्रक्चरल आॅडीट सुरू झाले आहे. त्याचा अहवाल येईल, त्यातील शिफारशीनुसार वाहतूक सुरू ठेवायची की नाही, याबाबतचा निर्णय होईल. मात्र, या एकूण प्रकारात शासकीय पातळीवर जी अनास्था, कागदी घोडे नाचवण्याचे प्रकार सुरू असतात त्यावर कुणीच काही बोलत नाही. मार्गही काढत नाही. एखादी दुर्घटना घडली की, तेवढ्यापुरते काही दिवस चर्चा होते. कारणांचा शोध घेतला जातो. दोष दाखवले जातात. वातावरण थंड झाले की, सर्वकाही विसरले जाते. मात्र, अपघातात बळी गेलेल्या निष्पाप जिवांचे काय? सरकार मृतांच्या कुटुंबीयांना थोडीफार मदत करेल आणि हा विषय संपून जाईल. पण ज्या घरातील माणसे गेली ती घरेच उद्ध्वस्त होतात. त्यांचे काय? याला उत्तर नाही. शिवाजी पुलाच्या दुर्घटनेत ज्या तिघींचे प्राण वाचले ते केवळ तातडीने तेथे धावलेल्या तरुणांमुळेच. बस बुडत असताना अंधारात तेथे जाऊन त्यांना बाहेर ओढून काढल्यामुळेच त्यांचे प्राण वाचू शकले. सध्या माणुसकी, नितीमत्ता कमी होत चालली आहे, असे सर्रास म्हटले जाते. पण कोठेही दुर्घटना घडली की तेथे माणुसकीच कामी येते. कोण, कुठला, कुणाचा याचा विचार न करता माणसे मदतीला धावतात. दुर्घटनाग्रस्तांना मदत करतात. त्यांचे प्राण वाचवतात. शिवाजी पूल दुर्घटनेतही या माणुसकीचे दर्शन घडले. स्वत:चा जीव धोक्यात घालून दुसºयाचे प्राण वाचविण्याºया तरुणाईला सलाम...!  (लेखक -लोकमतचे उपवृत्त संपादक आहेत)

 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर