शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पात्र-अपात्र सभासदांचा कौल कुणाच्या पारड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:47 IST

सरवडे : बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या पात्र, अपात्र सभासदांचा निकाल लागला. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात अपात्र सभासदांचा रोष त्याचबरोबर पात्र सभासदांचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देबिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखाना : कार्यक्षेत्रात जोरदार चर्चा, नेते लावत आहेत सोईप्रमाणे अर्थसाखर बंदमुळे या सभासदांच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होणार हा प्रकल्प सुरू झाल्यापासून १६९ कोटी ४0 लाख रुपयांचे उत्पन्न वीज विक्रीतून कारखान्यास मिळाले

दत्ता लोकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या पात्र, अपात्र सभासदांचा निकाल लागला. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात अपात्र सभासदांचा रोष त्याचबरोबर पात्र सभासदांचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार, याची चर्चा सुरू झाली आहे.या निर्णयामुळे माजी अध्यक्ष के. पी. पाटील गटाला हादरा बसला असला तरी सत्ताधारीमधील चार संचालक हे सध्या विरोधी आमदार प्रकाश आबिटकर गटात असल्याने पात्र झालेले सभासद आपल्या मतांचे दान कोणाच्या पारड्यात टाकणार, तर अपात्र सभासद कोणाला हिसका दाखविणार, अशी चर्चा आहे. या निवडणुकीत अपात्र सभासद, बिद्रीचा के. पी. पाटील यांचा कारभार व प्रशासकीय कारभार या मुद्द्यांवर प्रचाराचा नूर असणार आहे.

बिद्री साखर कारखान्याची सन २00९ ची पंचवार्षिक निवडणूक ही ४७ हजार ८३८ सभासदांमध्ये झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ४३८४ सभासदांची झालेली वाढ, तर जून २0१२ ला सत्ताधारी के. पी. पाटील गटाने १४ हजार ५६३ नवीन सभासद केले. त्यानंतर विरोधकांनी तक्रार केली. हा वाद गेली अनेक वर्षे सुरू होता. उच्च न्यायालयाने सर्व सभासद रद्द करून जुन्या सभासदांवर निवडणूक घ्यावी, असे सूचित केले. त्यावेळी विरोधी आमदार आबिटकर, दिनकरराव जाधव, आदी मंडळींनी न्यायालयीन लढा जिंकल्याने आनंद साजरा केला. त्याचवेळी सत्ताधारी के. पी. पाटील गटाला मोठा हादरा बसला.

त्यानंतर के. पी. पाटील यांनी सदर निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला व सदर सभासदांची सहकार कलम ११ नुसार चौकशी करण्याचे आदेश दिले. ही छाननी प्रादेशिक सहसंचालक यांच्या कार्यालयात प्रदीर्घ कालावधीनंतर पात्र-अपात्रतेचा फैसला झाला. त्यामध्ये ९ हजार ८२0 सभासद अपात्र झाल्याने के. पी. पाटील गटाला हादरा बसल्याची चर्चा असली तरी पात्र झालेल्या ४७४३ सभासदांपैकी बहुतांशी सभासदांचा पाटील गटाला लाभ होणार आहे. त्यातील तत्कालीन संचालक मंडळातील बदलत्या राजकीय समीकरणानुसार आमदार आबिटकर गटात असल्याने संचालक विजसिंह मोरे, के. जी. नांदेकर, राजेखान जमादार, डी. एस. पाटील यांचा ही पात्र-अपात्र सभासद यादीत समावेश आहे. त्यामुळेच पात्र-अपात्रतेचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार, हे निकालात स्पष्ट होईल.

गेली १0 वर्षे बिद्रीचा कारभार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यामध्ये त्यांनी केलेला कारभार, सहवीज प्रकल्प यावर अनेकदा विरोधकांनी तोंंंंडसुख घेतले. सहवीज प्रकल्प उभारण्यावेळी तर काढलेले कर्ज, मशिनरी यावरून टोकाची टिका करण्यात आली. मात्र, त्याच प्रकल्पाने कारखान्याची आर्थिक घडी सक्षम झाली. सहवीज प्रकल्पासाठी ११0 कोटींचे कर्ज काढण्यात आले. तर हा प्रकल्प सुरू झाल्यापासून १६९ कोटी ४0 लाख रुपयांचे उत्पन्न वीज विक्रीतून कारखान्यास मिळाले आहे. त्याचबरोबर गेल्या दशकामध्ये केलेल्या कारभाराचा लेखाजोखा पाटील गटाकडून मांडला जाणरा आहे.

तर विरोधी गटाकडून मोठ्या प्रमाणात झालेले बोगस सभासद त्याचप्रमाणे कारभारातील त्रुटींवरती प्रचाराचा मुद्दा केला जाणार आहे. तसेच दोन वर्षे कारभार करीत असलेले प्रशासकीय मंडळ यांच्या कारभारातील विकासाच्या मुद्द्यांवर आमदार आबिटकर गटाकडून चर्चा होण्याची शक्यता आहे.अपात्र सभासदांची साखर बंदसभासदांना ऊसदरापेक्षा साखरेचे महत्त्व अधिक असते. सभासदांना सवलतीच्या दरात प्रति महिना, तसेच दिवाळीला पाच किलोप्रमाणे ६५ किलो साखर दिली जाते. मतदानाचा हक्क गेला तरी चालेल, परंतु साखर मात्र प्रत्येकाला हक्काची वाटते. अपात्र ठरलेल्या ९८२0 सभासदांना गेली अनेक वर्षे साखर मिळत होती. ती साखर त्यांच्या अपात्रतेमुळे बंद होणार आहे. याबाबतच्या सूचना साखर वितरित होणाºया संस्थांना देणार असल्याचे समजते. साखर बंदमुळे या सभासदांच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होणार आहेत.