शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पात्र-अपात्र सभासदांचा कौल कुणाच्या पारड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:47 IST

सरवडे : बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या पात्र, अपात्र सभासदांचा निकाल लागला. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात अपात्र सभासदांचा रोष त्याचबरोबर पात्र सभासदांचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देबिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखाना : कार्यक्षेत्रात जोरदार चर्चा, नेते लावत आहेत सोईप्रमाणे अर्थसाखर बंदमुळे या सभासदांच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होणार हा प्रकल्प सुरू झाल्यापासून १६९ कोटी ४0 लाख रुपयांचे उत्पन्न वीज विक्रीतून कारखान्यास मिळाले

दत्ता लोकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या पात्र, अपात्र सभासदांचा निकाल लागला. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात अपात्र सभासदांचा रोष त्याचबरोबर पात्र सभासदांचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार, याची चर्चा सुरू झाली आहे.या निर्णयामुळे माजी अध्यक्ष के. पी. पाटील गटाला हादरा बसला असला तरी सत्ताधारीमधील चार संचालक हे सध्या विरोधी आमदार प्रकाश आबिटकर गटात असल्याने पात्र झालेले सभासद आपल्या मतांचे दान कोणाच्या पारड्यात टाकणार, तर अपात्र सभासद कोणाला हिसका दाखविणार, अशी चर्चा आहे. या निवडणुकीत अपात्र सभासद, बिद्रीचा के. पी. पाटील यांचा कारभार व प्रशासकीय कारभार या मुद्द्यांवर प्रचाराचा नूर असणार आहे.

बिद्री साखर कारखान्याची सन २00९ ची पंचवार्षिक निवडणूक ही ४७ हजार ८३८ सभासदांमध्ये झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ४३८४ सभासदांची झालेली वाढ, तर जून २0१२ ला सत्ताधारी के. पी. पाटील गटाने १४ हजार ५६३ नवीन सभासद केले. त्यानंतर विरोधकांनी तक्रार केली. हा वाद गेली अनेक वर्षे सुरू होता. उच्च न्यायालयाने सर्व सभासद रद्द करून जुन्या सभासदांवर निवडणूक घ्यावी, असे सूचित केले. त्यावेळी विरोधी आमदार आबिटकर, दिनकरराव जाधव, आदी मंडळींनी न्यायालयीन लढा जिंकल्याने आनंद साजरा केला. त्याचवेळी सत्ताधारी के. पी. पाटील गटाला मोठा हादरा बसला.

त्यानंतर के. पी. पाटील यांनी सदर निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला व सदर सभासदांची सहकार कलम ११ नुसार चौकशी करण्याचे आदेश दिले. ही छाननी प्रादेशिक सहसंचालक यांच्या कार्यालयात प्रदीर्घ कालावधीनंतर पात्र-अपात्रतेचा फैसला झाला. त्यामध्ये ९ हजार ८२0 सभासद अपात्र झाल्याने के. पी. पाटील गटाला हादरा बसल्याची चर्चा असली तरी पात्र झालेल्या ४७४३ सभासदांपैकी बहुतांशी सभासदांचा पाटील गटाला लाभ होणार आहे. त्यातील तत्कालीन संचालक मंडळातील बदलत्या राजकीय समीकरणानुसार आमदार आबिटकर गटात असल्याने संचालक विजसिंह मोरे, के. जी. नांदेकर, राजेखान जमादार, डी. एस. पाटील यांचा ही पात्र-अपात्र सभासद यादीत समावेश आहे. त्यामुळेच पात्र-अपात्रतेचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार, हे निकालात स्पष्ट होईल.

गेली १0 वर्षे बिद्रीचा कारभार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यामध्ये त्यांनी केलेला कारभार, सहवीज प्रकल्प यावर अनेकदा विरोधकांनी तोंंंंडसुख घेतले. सहवीज प्रकल्प उभारण्यावेळी तर काढलेले कर्ज, मशिनरी यावरून टोकाची टिका करण्यात आली. मात्र, त्याच प्रकल्पाने कारखान्याची आर्थिक घडी सक्षम झाली. सहवीज प्रकल्पासाठी ११0 कोटींचे कर्ज काढण्यात आले. तर हा प्रकल्प सुरू झाल्यापासून १६९ कोटी ४0 लाख रुपयांचे उत्पन्न वीज विक्रीतून कारखान्यास मिळाले आहे. त्याचबरोबर गेल्या दशकामध्ये केलेल्या कारभाराचा लेखाजोखा पाटील गटाकडून मांडला जाणरा आहे.

तर विरोधी गटाकडून मोठ्या प्रमाणात झालेले बोगस सभासद त्याचप्रमाणे कारभारातील त्रुटींवरती प्रचाराचा मुद्दा केला जाणार आहे. तसेच दोन वर्षे कारभार करीत असलेले प्रशासकीय मंडळ यांच्या कारभारातील विकासाच्या मुद्द्यांवर आमदार आबिटकर गटाकडून चर्चा होण्याची शक्यता आहे.अपात्र सभासदांची साखर बंदसभासदांना ऊसदरापेक्षा साखरेचे महत्त्व अधिक असते. सभासदांना सवलतीच्या दरात प्रति महिना, तसेच दिवाळीला पाच किलोप्रमाणे ६५ किलो साखर दिली जाते. मतदानाचा हक्क गेला तरी चालेल, परंतु साखर मात्र प्रत्येकाला हक्काची वाटते. अपात्र ठरलेल्या ९८२0 सभासदांना गेली अनेक वर्षे साखर मिळत होती. ती साखर त्यांच्या अपात्रतेमुळे बंद होणार आहे. याबाबतच्या सूचना साखर वितरित होणाºया संस्थांना देणार असल्याचे समजते. साखर बंदमुळे या सभासदांच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होणार आहेत.