शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘गुरुविण कोण दाखविल वाट!’ -दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 00:40 IST

आज गुरूपौर्णिमा. गुरुजींना वंदन करण्याचा, त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करण्याचा दिवस. गुरू-शिष्याचे नाते अधिक दृढ करणारा दिवस. प्रत्येकजण एका आदर्श गुरूच्या शोधात असतो. ज्याला तो भेटतो, त्याचे जीवन सफल होऊन जाते. म्हणूनच म्हटले जाते...

ठळक मुद्देकारण या गुरूंची ‘कथनी अन् करणी’ वेगळी असल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

चंद्रकांत कित्तुरेआज गुरूपौर्णिमा. गुरुजींना वंदन करण्याचा, त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करण्याचा दिवस. गुरू-शिष्याचे नाते अधिक दृढ करणारा दिवस. खरंच आपल्या आयुष्यातून गुरुला वगळले तर... विचारच करून पहा. आपले आयुष्य दिशाहीन, भरकटलेले असते असे वाटल्याशिवाय राहत नाही. कारण अगदी जन्मापासूनच आपल्याला शिक्षणाची, शिकविण्याची गरज असते. जी मातेपासून होते. म्हणूनच म्हटले आहे की, आई माझा गुरू, आई कल्पतरू. आई ही आपली पहिली गुरू असते, जी आपल्याला बोलायला शिकविते, जगाची ओळख करून देते. कसे वागायचे, काय करायचे, काय करायचे नाही, चांगले काय, वाईट काय हे जाणून घेण्यास शिकविते. वडिलांचाही यात वाटा असला, तरी आई हीच प्रामुख्याने आपल्या मुलावर संस्कार घडविण्याचे कार्य करीत असते. त्यामुळेच आईला आपला पहिला गुरू मानले आहे.

शाळेत आपल्याला दुसरा गुरू मिळतो तो शिक्षकाच्या रूपात. बालवाडी असेल, प्राथमिक शाळा असेल, तेथे शिक्षक, शिक्षिका मुलांना लिहायला, वाचायला शिकवितानाच सुसंस्काराचे धडेही देतात. येथेच आपल्याला गुरू-शिष्य या नात्याची ओळख होते. गुरू-शिष्याची परंपरा भारतात फार मोठी आहे. पुराण काळापासून ती चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळात गुरुकुल पद्धती होती. राजपुत्रासह सर्वच विद्यार्थी विद्यार्जनासाठी गुरुच्या घरी जात. तेथेच राहत. गुरू-शिष्य म्हटले की ‘महाभारता’तील एकलव्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. द्रोणाचार्यांनी शिष्य म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या पुतळ्यालाच गुरू मानून विद्यार्जन करणारा आणि गुरुदक्षिणा म्हणून स्वत:च्या उजव्या हाताचा अंगठा कापून देणारा एकलव्य महानच होता.

जी विद्या आपण शिकली आहे ती या गुरुदक्षिणेमुळे व्यर्थ ठरणार आहे. तिचा काहीच उपयोग होणार नाही हे माहीत असूनही त्याने द्रोणाचार्यांनी मागितलेली गुरुदक्षिणा क्षणाचाही विचार न करता देऊन टाकली. यात महान समजल्या जाणाऱ्या गुरूच्या कोत्या मनोवृत्तीचेही दर्शन होते. सर्वच गुरू सर्वांना समान विद्यादान करतात असे नाही. त्यातही त्यांचा एखादा आवडता, एखादा नावडता शिष्य असतोच.आज पूर्वीप्रमाणे गुरुकुल पद्धती नसली तरी शाळा, महाविद्यालये आहेत. शाळांमध्ये शिक्षकाच्या रूपाने दुसरा गुरू भेटल्यानंतर महाविद्यालयीन जीवनात प्रवेश होताच प्राध्यापकाच्या रूपाने तिसरा गुरू भेटतो. आजकाल शिक्षणाला व्यावसायिक स्वरूप आले असल्यामुळे या तिसºया गुरूचे शिष्याच्या मनातील स्थान पूर्वीएवढे आत्मीयतेचे असल्याचे दिसत नाही. तरीही भावी पिढी घडविण्यासाठी तळमळीने शिकविणारे, आपले विद्यार्थी कुठेही कमी पडू नयेत यासाठी धडपडणारे शिक्षकही काही कमी नाहीत.हे झाले शिक्षणक्षेत्रातील गुरूच्या बाबतीत.

तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचे असेल तर त्यासाठी एखादा मार्गदर्शक, गुरू असायलाच हवा. जो तुम्हाला अडचणीच्या काळात योग्य ते मार्गदर्शन करेल, अडचणीतून बाहेर काढेल, तुमच्या यशासाठी आवश्यक तो मार्ग दाखवेल, तोच खरा आदर्श गुरू म्हणावा लागेल. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे असा आदर्श गुरू भेटलेला असतो. त्याच्यामुळे आयुष्याला नवी कलाटणी मिळते. जीवनात उभारी येते.

यशाचा नवा मार्ग गवसतो. अशा या गुरूच्या ऋणातून उतराई होणे कुणालाही शक्य नसते. मात्र, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरूचे स्मरण करणे, त्याला वंदन करणे, गुरुदक्षिणा देणे शिष्य करीत असतात. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. गुरूही आपल्या शिष्याला यशासाठी भरभरून आशीर्वाद देत असतात.

व्यावहारिक जीवनातील गुरूबरोबच आध्यात्मिक जीवनातही गुरूची आवश्यकता असते. किंबहुना गुरूशिवाय तुम्ही कितीही साधना केलीत तर त्याचे अपेक्षित फळ तुम्हाला मिळत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे आध्यात्मिक गुरूला आपल्या समाजात फार मोठे स्थान आहे. मुळात आपला समाज देवभोळा आणि अंधश्रद्धाळू आहे. त्यामुळे आध्यात्मिक गुरूंची संख्याही काही कमी नाही. महर्षी व्यासांपासून अशा गुरूंची परंपरा सुरू होते. या थोर परंपरेला अलीकडील काळात काही गुरूंमुळे गालबोट लागल्याचे दिसते. कारण या गुरूंची ‘कथनी अन् करणी’ वेगळी असल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. काहीजण तर अद्याप तुरुंगात आहेत. त्यांच्यामुळे गुरूबद्दल समाजाच्या मनात असलेल्या समजाला हादरे बसले आहेत. असे असले तरी गुरूशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे याची जाणीव प्रत्येकाला असते. त्यामुळे प्रत्येकजण एका आदर्श गुरूच्या शोधात असतो. ज्याला तो भेटतो, त्याचे जीवन सफल होऊन जाते. म्हणूनच म्हटले जाते...गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:, गुरुर्देवो महेश्वर:।गुरु:साक्षात् परब्रह्म, तस्मै श्रीगुरूवे नम:।।

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाkolhapurकोल्हापूर