शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

‘गुरुविण कोण दाखविल वाट!’ -दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 00:40 IST

आज गुरूपौर्णिमा. गुरुजींना वंदन करण्याचा, त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करण्याचा दिवस. गुरू-शिष्याचे नाते अधिक दृढ करणारा दिवस. प्रत्येकजण एका आदर्श गुरूच्या शोधात असतो. ज्याला तो भेटतो, त्याचे जीवन सफल होऊन जाते. म्हणूनच म्हटले जाते...

ठळक मुद्देकारण या गुरूंची ‘कथनी अन् करणी’ वेगळी असल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

चंद्रकांत कित्तुरेआज गुरूपौर्णिमा. गुरुजींना वंदन करण्याचा, त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करण्याचा दिवस. गुरू-शिष्याचे नाते अधिक दृढ करणारा दिवस. खरंच आपल्या आयुष्यातून गुरुला वगळले तर... विचारच करून पहा. आपले आयुष्य दिशाहीन, भरकटलेले असते असे वाटल्याशिवाय राहत नाही. कारण अगदी जन्मापासूनच आपल्याला शिक्षणाची, शिकविण्याची गरज असते. जी मातेपासून होते. म्हणूनच म्हटले आहे की, आई माझा गुरू, आई कल्पतरू. आई ही आपली पहिली गुरू असते, जी आपल्याला बोलायला शिकविते, जगाची ओळख करून देते. कसे वागायचे, काय करायचे, काय करायचे नाही, चांगले काय, वाईट काय हे जाणून घेण्यास शिकविते. वडिलांचाही यात वाटा असला, तरी आई हीच प्रामुख्याने आपल्या मुलावर संस्कार घडविण्याचे कार्य करीत असते. त्यामुळेच आईला आपला पहिला गुरू मानले आहे.

शाळेत आपल्याला दुसरा गुरू मिळतो तो शिक्षकाच्या रूपात. बालवाडी असेल, प्राथमिक शाळा असेल, तेथे शिक्षक, शिक्षिका मुलांना लिहायला, वाचायला शिकवितानाच सुसंस्काराचे धडेही देतात. येथेच आपल्याला गुरू-शिष्य या नात्याची ओळख होते. गुरू-शिष्याची परंपरा भारतात फार मोठी आहे. पुराण काळापासून ती चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळात गुरुकुल पद्धती होती. राजपुत्रासह सर्वच विद्यार्थी विद्यार्जनासाठी गुरुच्या घरी जात. तेथेच राहत. गुरू-शिष्य म्हटले की ‘महाभारता’तील एकलव्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. द्रोणाचार्यांनी शिष्य म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या पुतळ्यालाच गुरू मानून विद्यार्जन करणारा आणि गुरुदक्षिणा म्हणून स्वत:च्या उजव्या हाताचा अंगठा कापून देणारा एकलव्य महानच होता.

जी विद्या आपण शिकली आहे ती या गुरुदक्षिणेमुळे व्यर्थ ठरणार आहे. तिचा काहीच उपयोग होणार नाही हे माहीत असूनही त्याने द्रोणाचार्यांनी मागितलेली गुरुदक्षिणा क्षणाचाही विचार न करता देऊन टाकली. यात महान समजल्या जाणाऱ्या गुरूच्या कोत्या मनोवृत्तीचेही दर्शन होते. सर्वच गुरू सर्वांना समान विद्यादान करतात असे नाही. त्यातही त्यांचा एखादा आवडता, एखादा नावडता शिष्य असतोच.आज पूर्वीप्रमाणे गुरुकुल पद्धती नसली तरी शाळा, महाविद्यालये आहेत. शाळांमध्ये शिक्षकाच्या रूपाने दुसरा गुरू भेटल्यानंतर महाविद्यालयीन जीवनात प्रवेश होताच प्राध्यापकाच्या रूपाने तिसरा गुरू भेटतो. आजकाल शिक्षणाला व्यावसायिक स्वरूप आले असल्यामुळे या तिसºया गुरूचे शिष्याच्या मनातील स्थान पूर्वीएवढे आत्मीयतेचे असल्याचे दिसत नाही. तरीही भावी पिढी घडविण्यासाठी तळमळीने शिकविणारे, आपले विद्यार्थी कुठेही कमी पडू नयेत यासाठी धडपडणारे शिक्षकही काही कमी नाहीत.हे झाले शिक्षणक्षेत्रातील गुरूच्या बाबतीत.

तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचे असेल तर त्यासाठी एखादा मार्गदर्शक, गुरू असायलाच हवा. जो तुम्हाला अडचणीच्या काळात योग्य ते मार्गदर्शन करेल, अडचणीतून बाहेर काढेल, तुमच्या यशासाठी आवश्यक तो मार्ग दाखवेल, तोच खरा आदर्श गुरू म्हणावा लागेल. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे असा आदर्श गुरू भेटलेला असतो. त्याच्यामुळे आयुष्याला नवी कलाटणी मिळते. जीवनात उभारी येते.

यशाचा नवा मार्ग गवसतो. अशा या गुरूच्या ऋणातून उतराई होणे कुणालाही शक्य नसते. मात्र, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरूचे स्मरण करणे, त्याला वंदन करणे, गुरुदक्षिणा देणे शिष्य करीत असतात. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. गुरूही आपल्या शिष्याला यशासाठी भरभरून आशीर्वाद देत असतात.

व्यावहारिक जीवनातील गुरूबरोबच आध्यात्मिक जीवनातही गुरूची आवश्यकता असते. किंबहुना गुरूशिवाय तुम्ही कितीही साधना केलीत तर त्याचे अपेक्षित फळ तुम्हाला मिळत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे आध्यात्मिक गुरूला आपल्या समाजात फार मोठे स्थान आहे. मुळात आपला समाज देवभोळा आणि अंधश्रद्धाळू आहे. त्यामुळे आध्यात्मिक गुरूंची संख्याही काही कमी नाही. महर्षी व्यासांपासून अशा गुरूंची परंपरा सुरू होते. या थोर परंपरेला अलीकडील काळात काही गुरूंमुळे गालबोट लागल्याचे दिसते. कारण या गुरूंची ‘कथनी अन् करणी’ वेगळी असल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. काहीजण तर अद्याप तुरुंगात आहेत. त्यांच्यामुळे गुरूबद्दल समाजाच्या मनात असलेल्या समजाला हादरे बसले आहेत. असे असले तरी गुरूशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे याची जाणीव प्रत्येकाला असते. त्यामुळे प्रत्येकजण एका आदर्श गुरूच्या शोधात असतो. ज्याला तो भेटतो, त्याचे जीवन सफल होऊन जाते. म्हणूनच म्हटले जाते...गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:, गुरुर्देवो महेश्वर:।गुरु:साक्षात् परब्रह्म, तस्मै श्रीगुरूवे नम:।।

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाkolhapurकोल्हापूर