शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

बावड्यातील शेतकऱ्यांना वाली कोण ?

By admin | Updated: December 2, 2014 00:21 IST

प्रश्न पाणंदीचा : कारखाना, महापालिका, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

रमेश पाटील - कसबा बावडा -तब्बल एक लाखांहून अधिक मेट्रिक टन ऊस पिकविणाऱ्या कसबा बावड्यातील शेतकऱ्यांना परिसरातील पाणंदी गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका, साखर कारखाना आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून दुरुस्ती होत नसल्यामुळे आम्हाला वाली कोण? असा प्रश्न पडला आहे.ग्रामीण भागातील पाणंदींची दुरुस्ती जिल्हा परिषदेमार्फत केली जाते. काही ठिकाणी त्या-त्या भागातील साखर कारखानेही पाणंद दुरुस्तीची कामे हाती घेतात. त्यामुळे दर दोन तीन वर्षांनी खडी, मुरुम टाकून पाणंदीची दुरुस्ती होते. जिल्हा परिषदेचे सदस्यही आपला काही फंड या कामावर खर्च करतात. त्यामुळे ग्रामीण भागात गळीत हंगामास उसाची वाहतूक सुलभ होते.परंतु, कसबा बावड्याची परिस्थिती नेमकी उलटच आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत बावडा येत असल्यामुळे जिल्हा परिषद बावड्यातील पाणंदी दुरुस्ती करू शकत नाही. राजाराम कारखाना (शुगर मिल) जेव्हा खासगी मालकांचा होता तेव्हा काही प्रकरणात कारखान्याकडून पाणंदीची दुरुस्ती होत होती. त्यातच आता ऊस झोन बंदी उठल्यामुळे कोणताही शेतकरी कोणत्याही कारखान्याला ऊस पाठवीत असल्यामुळे कारखाने पाणंदी दुरुस्तीवर फारसे लक्ष देईनात. राजाराम साखर कारखानाही याला अपवाद नाही. आता राहिला प्रश्न महापालिकेचा. मुळातच महापालिका शहरातील रस्ते करताना फंड नाहीत अशी कारणे असतात. त्यामुळे पाणंदी दुरुस्तीसाठी ती पैसे खर्च करू शकत नाही. पाणंदी दुरुस्ती करा म्हणून एखाद्या नगरसेवकाला कोणी शेतकऱ्यांनी विनंती केली तर शहरातील रस्ते दुरुस्त करायला पैसे नाहीत, तर पाणंद दुरुस्ती लांबच असा उलटच प्रश्न नगरसेवकांचा असतो.शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मला बावड्याच्या समस्येची जाण आहे. बावड्यातील पाणंदी दुरुस्तीची आपण लवकरच कामे हाती घेणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होईल. काही पाणंदीची कामे पूर्ण केली जातील, तर काही पाणंदी योग्य त्या प्रकारे दुरुस्त केल्या जातील.- राजेश क्षीरसागर, आमदार बावड्यातील सरवळ परिसरातील सरवळ पाणंद, सुतार तळी पाणंद, तसेच चौगले पाणंद, रणदिवे पाणंद, माळी पाणंद, रेडेकर पाणंद या व अन्य पाणंदीची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पाणंदी खराब असल्याने गळीत हंगामात उसाची वाहतूक करताना अडचण येते.- सुरेश शंकरराव पाटील,शेतकरी, कसबा बावडा