शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बावड्यातील शेतकऱ्यांना वाली कोण ?

By admin | Updated: December 2, 2014 00:21 IST

प्रश्न पाणंदीचा : कारखाना, महापालिका, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

रमेश पाटील - कसबा बावडा -तब्बल एक लाखांहून अधिक मेट्रिक टन ऊस पिकविणाऱ्या कसबा बावड्यातील शेतकऱ्यांना परिसरातील पाणंदी गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका, साखर कारखाना आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून दुरुस्ती होत नसल्यामुळे आम्हाला वाली कोण? असा प्रश्न पडला आहे.ग्रामीण भागातील पाणंदींची दुरुस्ती जिल्हा परिषदेमार्फत केली जाते. काही ठिकाणी त्या-त्या भागातील साखर कारखानेही पाणंद दुरुस्तीची कामे हाती घेतात. त्यामुळे दर दोन तीन वर्षांनी खडी, मुरुम टाकून पाणंदीची दुरुस्ती होते. जिल्हा परिषदेचे सदस्यही आपला काही फंड या कामावर खर्च करतात. त्यामुळे ग्रामीण भागात गळीत हंगामास उसाची वाहतूक सुलभ होते.परंतु, कसबा बावड्याची परिस्थिती नेमकी उलटच आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत बावडा येत असल्यामुळे जिल्हा परिषद बावड्यातील पाणंदी दुरुस्ती करू शकत नाही. राजाराम कारखाना (शुगर मिल) जेव्हा खासगी मालकांचा होता तेव्हा काही प्रकरणात कारखान्याकडून पाणंदीची दुरुस्ती होत होती. त्यातच आता ऊस झोन बंदी उठल्यामुळे कोणताही शेतकरी कोणत्याही कारखान्याला ऊस पाठवीत असल्यामुळे कारखाने पाणंदी दुरुस्तीवर फारसे लक्ष देईनात. राजाराम साखर कारखानाही याला अपवाद नाही. आता राहिला प्रश्न महापालिकेचा. मुळातच महापालिका शहरातील रस्ते करताना फंड नाहीत अशी कारणे असतात. त्यामुळे पाणंदी दुरुस्तीसाठी ती पैसे खर्च करू शकत नाही. पाणंदी दुरुस्ती करा म्हणून एखाद्या नगरसेवकाला कोणी शेतकऱ्यांनी विनंती केली तर शहरातील रस्ते दुरुस्त करायला पैसे नाहीत, तर पाणंद दुरुस्ती लांबच असा उलटच प्रश्न नगरसेवकांचा असतो.शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मला बावड्याच्या समस्येची जाण आहे. बावड्यातील पाणंदी दुरुस्तीची आपण लवकरच कामे हाती घेणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होईल. काही पाणंदीची कामे पूर्ण केली जातील, तर काही पाणंदी योग्य त्या प्रकारे दुरुस्त केल्या जातील.- राजेश क्षीरसागर, आमदार बावड्यातील सरवळ परिसरातील सरवळ पाणंद, सुतार तळी पाणंद, तसेच चौगले पाणंद, रणदिवे पाणंद, माळी पाणंद, रेडेकर पाणंद या व अन्य पाणंदीची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पाणंदी खराब असल्याने गळीत हंगामात उसाची वाहतूक करताना अडचण येते.- सुरेश शंकरराव पाटील,शेतकरी, कसबा बावडा