शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

चंद्रदीप नरकेंनी ‘त्या’वेळी नकली हिंदुत्व कोणत्या खुंटीला टांगले होते?

By राजाराम लोंढे | Updated: March 1, 2023 17:10 IST

नरकेंनी करवीरमध्ये किती शाखा काढल्या ?

कोल्हापूर : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिल्यानेच चंद्रदीप नरकेंनी दहा वर्षे आमदारकी भोगली, मात्र, कधीही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो किंवा शिवसेनेचा लोगो वापरला नाही. आमच्या हिंदुत्वावर शंका उपस्थित करणारे नरके स्वार्थासाठी ‘गोकुळ’, जिल्हा बँक, साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते, त्यावेळी त्यांचे नकली हिंदुत्व कोणत्या खुंटीला टांगले होते ? असा पलटवार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व उपजिल्हा प्रमुख बाजीराव पाटील, महिला संघटक शुभांगी पोवार, तानाजी आंग्रे यांनी पत्रकातून केला.बाजीराव पाटील म्हणाले, चंद्रदीप नरके व त्यांचे काका २००९ ला ‘मातोश्री’च्या दारात शिवसेनेच्या उमेदवारीसाठी गेले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी डोक्यावर हात ठेवला म्हणून नरके आमदार झाले. मात्र, २००९ पासून ते घरोघरी नववर्षाचे कॅलेंडर वाटप करत होते, त्याच्यासह स्वत:च्या गाडीवर कधी बाळासाहेबांचा फोटो किंवा शिवसेनेचा लोगो वापरला नाही. शिवसैनिक हा मातोश्रीचा आदेश पाळणारा आहे, त्याने तिन्ही निवडणुकीत नरकेंचे प्रामाणिकपणे काम केले.

मात्र, ज्यांनी नरकेंनी पदे देऊन मोठी केली, त्यांनीच २०१९ ला त्यांचा घात केला. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी करवीर मतदारसंघात जे काम केले, त्यामुळे आपण दोन वेळा आमदार झालात, हे विसरू नका. येथून पुढे जिल्हाप्रमुखांवर बगलबच्च्यांनी बोलताना जीभ सांभाळावी, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ. आगामी २०२४ ला ‘मातोश्री’चा जो आदेश असेल तोच आमचा उमेदवार, जो ‘मातोश्री’चा घात करतो, तो राजकारणातून संपतो, हा शिवसेनेचा इतिहास कोणी विसरू नये, असा इशाराही बाजीराव पाटील यांनी पत्रकातून दिला.नरकेंनी करवीरमध्ये किती शाखा काढल्या ?चंद्रदीप नरके व पोपटपंची करणाऱ्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात गेल्या तेरा वर्षांत शिवसेनेच्या किती शाखा काढल्या, पक्षाची सभासद नोंदणी किती केली ? याचा हिशोब द्यावा, असे बाजीराव पाटील यांनी म्हटले आहे.शिवसैनिकांचा बळी देणाऱ्यांचे हिंदुत्व बेगडेकेवळ नरके गटाच्या बगलबच्च्यांची राजकीय बघणाऱ्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीसह इतर संस्थेत निष्ठावंत शिवसैनिकांचा बळी दिला. ते आम्हाला हिंदुत्व शिकवत असून, चंद्रदीप नरकेंचे हिंदुत्व बेगडे असल्याची टीका बाजीराव पाटील यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण