शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रदीप नरकेंनी ‘त्या’वेळी नकली हिंदुत्व कोणत्या खुंटीला टांगले होते?

By राजाराम लोंढे | Updated: March 1, 2023 17:10 IST

नरकेंनी करवीरमध्ये किती शाखा काढल्या ?

कोल्हापूर : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिल्यानेच चंद्रदीप नरकेंनी दहा वर्षे आमदारकी भोगली, मात्र, कधीही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो किंवा शिवसेनेचा लोगो वापरला नाही. आमच्या हिंदुत्वावर शंका उपस्थित करणारे नरके स्वार्थासाठी ‘गोकुळ’, जिल्हा बँक, साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते, त्यावेळी त्यांचे नकली हिंदुत्व कोणत्या खुंटीला टांगले होते ? असा पलटवार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व उपजिल्हा प्रमुख बाजीराव पाटील, महिला संघटक शुभांगी पोवार, तानाजी आंग्रे यांनी पत्रकातून केला.बाजीराव पाटील म्हणाले, चंद्रदीप नरके व त्यांचे काका २००९ ला ‘मातोश्री’च्या दारात शिवसेनेच्या उमेदवारीसाठी गेले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी डोक्यावर हात ठेवला म्हणून नरके आमदार झाले. मात्र, २००९ पासून ते घरोघरी नववर्षाचे कॅलेंडर वाटप करत होते, त्याच्यासह स्वत:च्या गाडीवर कधी बाळासाहेबांचा फोटो किंवा शिवसेनेचा लोगो वापरला नाही. शिवसैनिक हा मातोश्रीचा आदेश पाळणारा आहे, त्याने तिन्ही निवडणुकीत नरकेंचे प्रामाणिकपणे काम केले.

मात्र, ज्यांनी नरकेंनी पदे देऊन मोठी केली, त्यांनीच २०१९ ला त्यांचा घात केला. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी करवीर मतदारसंघात जे काम केले, त्यामुळे आपण दोन वेळा आमदार झालात, हे विसरू नका. येथून पुढे जिल्हाप्रमुखांवर बगलबच्च्यांनी बोलताना जीभ सांभाळावी, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ. आगामी २०२४ ला ‘मातोश्री’चा जो आदेश असेल तोच आमचा उमेदवार, जो ‘मातोश्री’चा घात करतो, तो राजकारणातून संपतो, हा शिवसेनेचा इतिहास कोणी विसरू नये, असा इशाराही बाजीराव पाटील यांनी पत्रकातून दिला.नरकेंनी करवीरमध्ये किती शाखा काढल्या ?चंद्रदीप नरके व पोपटपंची करणाऱ्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात गेल्या तेरा वर्षांत शिवसेनेच्या किती शाखा काढल्या, पक्षाची सभासद नोंदणी किती केली ? याचा हिशोब द्यावा, असे बाजीराव पाटील यांनी म्हटले आहे.शिवसैनिकांचा बळी देणाऱ्यांचे हिंदुत्व बेगडेकेवळ नरके गटाच्या बगलबच्च्यांची राजकीय बघणाऱ्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीसह इतर संस्थेत निष्ठावंत शिवसैनिकांचा बळी दिला. ते आम्हाला हिंदुत्व शिकवत असून, चंद्रदीप नरकेंचे हिंदुत्व बेगडे असल्याची टीका बाजीराव पाटील यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण