शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
2
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
3
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
4
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
5
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
6
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
7
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
8
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
9
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
10
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
11
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
12
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
13
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
14
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
15
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
16
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
17
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
18
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
19
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
20
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...

चंद्रदीप नरकेंनी ‘त्या’वेळी नकली हिंदुत्व कोणत्या खुंटीला टांगले होते?

By राजाराम लोंढे | Updated: March 1, 2023 17:10 IST

नरकेंनी करवीरमध्ये किती शाखा काढल्या ?

कोल्हापूर : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिल्यानेच चंद्रदीप नरकेंनी दहा वर्षे आमदारकी भोगली, मात्र, कधीही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो किंवा शिवसेनेचा लोगो वापरला नाही. आमच्या हिंदुत्वावर शंका उपस्थित करणारे नरके स्वार्थासाठी ‘गोकुळ’, जिल्हा बँक, साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते, त्यावेळी त्यांचे नकली हिंदुत्व कोणत्या खुंटीला टांगले होते ? असा पलटवार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व उपजिल्हा प्रमुख बाजीराव पाटील, महिला संघटक शुभांगी पोवार, तानाजी आंग्रे यांनी पत्रकातून केला.बाजीराव पाटील म्हणाले, चंद्रदीप नरके व त्यांचे काका २००९ ला ‘मातोश्री’च्या दारात शिवसेनेच्या उमेदवारीसाठी गेले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी डोक्यावर हात ठेवला म्हणून नरके आमदार झाले. मात्र, २००९ पासून ते घरोघरी नववर्षाचे कॅलेंडर वाटप करत होते, त्याच्यासह स्वत:च्या गाडीवर कधी बाळासाहेबांचा फोटो किंवा शिवसेनेचा लोगो वापरला नाही. शिवसैनिक हा मातोश्रीचा आदेश पाळणारा आहे, त्याने तिन्ही निवडणुकीत नरकेंचे प्रामाणिकपणे काम केले.

मात्र, ज्यांनी नरकेंनी पदे देऊन मोठी केली, त्यांनीच २०१९ ला त्यांचा घात केला. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी करवीर मतदारसंघात जे काम केले, त्यामुळे आपण दोन वेळा आमदार झालात, हे विसरू नका. येथून पुढे जिल्हाप्रमुखांवर बगलबच्च्यांनी बोलताना जीभ सांभाळावी, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ. आगामी २०२४ ला ‘मातोश्री’चा जो आदेश असेल तोच आमचा उमेदवार, जो ‘मातोश्री’चा घात करतो, तो राजकारणातून संपतो, हा शिवसेनेचा इतिहास कोणी विसरू नये, असा इशाराही बाजीराव पाटील यांनी पत्रकातून दिला.नरकेंनी करवीरमध्ये किती शाखा काढल्या ?चंद्रदीप नरके व पोपटपंची करणाऱ्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात गेल्या तेरा वर्षांत शिवसेनेच्या किती शाखा काढल्या, पक्षाची सभासद नोंदणी किती केली ? याचा हिशोब द्यावा, असे बाजीराव पाटील यांनी म्हटले आहे.शिवसैनिकांचा बळी देणाऱ्यांचे हिंदुत्व बेगडेकेवळ नरके गटाच्या बगलबच्च्यांची राजकीय बघणाऱ्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीसह इतर संस्थेत निष्ठावंत शिवसैनिकांचा बळी दिला. ते आम्हाला हिंदुत्व शिकवत असून, चंद्रदीप नरकेंचे हिंदुत्व बेगडे असल्याची टीका बाजीराव पाटील यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण