शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

कधी उशिरा, तर कधी चुकीची प्रश्नपत्रिका : शिवाजी विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:36 IST

कधी उशिरा, तर कधी चुकीच्या विषयांची प्रश्नपत्रिका देण्याचा प्रकार हिवाळी आणि उन्हाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर परीक्षांदरम्यान घडला आहे.

ठळक मुद्देनावाजलेल्या परीक्षा मंडळाचा गोंधळ; विद्यार्थ्यांना होतोय नाहक त्रास

संतोष मिठारी ।कोल्हापूर : कधी उशिरा, तर कधी चुकीच्या विषयांची प्रश्नपत्रिका देण्याचा प्रकार हिवाळी आणि उन्हाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर परीक्षांदरम्यान घडला आहे. त्यातून शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या कामकाजातील गोंधळ आणि अनागोंदी समोर आली आहे. त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होत आहे.

परीक्षाविषयक कामकाजामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सर्वाधिक परीक्षा घेऊनही वेळेत निकाल जाहीर करणे याबाबत शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ राज्यात आघाडीवर आहे. त्याच्या जोरावर मुंबई विद्यापीठाला उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात मदत करण्याची जबाबदारी या मंडळावर सोपविण्यात आली होती. अशा पद्धतीने नावाजलेल्या या परीक्षा मंडळाच्या कामकाजात मात्र, सध्या काही गोंधळ आणि अनागोंदी सुरू आहे.

आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मधील (हिवाळी सत्र) आॅक्टोबरमध्ये बी. एस्सी. अभ्यासक्रमाच्या काही परीक्षार्थींना प्रवेशपत्रच मिळाले नाही.नोव्हेंबरमध्ये आॅनलाईन सांकेतिक क्रमांक समजण्यातील गोंधळामुळे एम. कॉम. भाग दोनचा पेपर परीक्षार्थींना अर्धा तास उशिरा मिळाला.

या प्रकाराच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या एम. कॉम. भाग दोनच्या पेपरवेळी पुन्हा असाच गोंधळ घडला. बी. टेक. अभ्यासक्रमाच्या पदवी प्रमाणपत्रातील चुका झाल्याचा प्रकार मार्च २०१८ मध्ये समोर आला. उन्हाळी सत्रातील परीक्षांदरम्यान बी. ए. हिंदी भाग एकच्या परीक्षार्थींना चुकीची प्रश्नपत्रिका मिळाली. यानंतर ‘एलएल. बी.’ अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष आणि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमातील तृतीय वर्षाच्या पुनर्परीक्षार्थींना बुधवारी (दि. २३) जुनेच प्रश्न असलेला पेपर मिळाला. परीक्षाविषयक या चुकांचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.कुलगुरूंनी लक्ष देण्याची गरजप्रश्ननियोजकाकडून प्रश्नपत्रिका तयार करणे, ती गोपनीयतेसाठी पाकीटबंद करणे. त्यासह सिक्युअर्ड रिमोट पेपर डिलिव्हरी (एसआरपीडी, गोपनीय व नियंत्रित पद्धतीने प्रश्नपत्रिका वितरण) या प्रणालीद्वारे प्रश्नपत्रिकांचे वितरण आणि या टप्प्यांवर होणाºया चुकांचा समावेश आहे. निकाल वेळेत लावण्याच्या कामगिरीमुळे विद्यापीठाचा राज्यात नावलौकिक आहे. परीक्षा मंडळासह एकूण विद्यापीठातील उल्लेखनीय कामगिरीमुळे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरुपद सांभाळण्याची जबाबदारी मिळाली. परीक्षा मंडळाच्या कामकाजातील गोंधळ थांबविण्यासाठी कुलगुरूंनी वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे मत विद्यापीठातील विविध घटकांकडून व्यक्त होत आहे.परीक्षांविषयक आकडेवारी दृष्टिक्षेपातविद्यापीठाकडून दोन सत्रांत घेणाºया परीक्षांची संख्या११६८वर्षभरात परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची संख्या५ लाख ७५ हजारएका सत्रात तपासल्या जाणाºया उत्तरपत्रिका२२ लाख

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूर