शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रदूषण मंडळ कारवाई करणार कधी ?

By admin | Updated: November 28, 2014 23:43 IST

हिरण्यकेशी प्रदूषण : पाणी तपासले... स्थळभेटी झाल्या... पण न्याय नाही--‘नांगनूर’च्या पाण्याचा प्रश्न

राम मगदूम - गडहिंग्लज -सात वर्षांत सातवेळा प्रदूषित पाण्याचे नमुने तपासण्यात आले. दोनवेळा प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष स्थळ भेटी झाल्या. नांगनूरनजीक हिरण्यकेशी नदीतील पाणी पिण्यासाठी अयोग्य व असुरक्षित असल्याचे अहवाल शासकीय विविध प्रयोगशाळांनी दिले; परंतु नदीचे पाणी प्रदूषित करण्यांविरूद्ध अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. आठवड्यापूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नांगनूरनजीक ओढा व नदीतील दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. तपासणीसाठी हे नमुने चिपळूण येथील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल मिळायला महिनाभराची प्रतीक्षा आहे. मात्र, नदीत पाणी असूनही, ते दूषित झाल्यामुळे प्यायला पाणी नाही, अशी विचित्र अवस्था असल्यामुळे पंचक्रोशीतील जनतेत तीव्र संतापाची भावना आहे.नार्वेकरांची लढाई... अन् पंचक्रोशीची एकजूटनांगनूरचे माजी उपसरपंच स्व. मनोहर नार्वेकर यांनी नांगनूरसह पंचक्रोशीतील जनतेला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, म्हणून एकांड्या शिलेदाराप्रमाणे शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. प्रदूषण मंडळ व कारखान्याबरोबरच अधिकारी, आमदार-खासदारांशीही पत्रव्यवहार केला. हिरण्यकेशीत मळी मिश्रित पाणी सोडणे बंद न झाल्यास कोर्टात खेचण्याचा लेखी इशारादेखील त्यांनी संकेश्वर साखर कारखान्याला दिला होता. अलीकडे दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांचा लढा पुढे नेण्यासाठी आता नांगनूरसह अरळगुंडी, कडलगे व इदरगुच्ची ग्रामस्थ एकत्र आले आहेत. यापूर्वीचे रिपोर्ट काय सांगतात ?फेब्रुवारी २००८ : राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या पाणी गुणवत्ता अहवालानुसार पाणी रासायनिकदृष्ट्या पिण्यासाठी अयोग्य व असुरक्षित आहे. - गटप्रमुख, जिल्हा सुलभीकरण गट, कोल्हापूर.३० एप्रिल २००८ : स्थळ पाहणीवेळी नदीच्या पाण्याला कोणताही रंग अथवा वास आढळला नाही. - अजित सराफ , प्रादेशिक अधिकारी (समन्वय), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई.२८ जानेवारी २००९ : पाण्यात अमोनिया, नायट्रेटस्, आॅक्सिजन, दुर्गंधी व गढूळपणा अधिक असल्यामुळे जवळपास पर्यायी जलस्त्रोत उपलब्ध नसल्यास पाण्यावर योग्य प्रक्रिया व निर्जंतुकीकरण करूनच पिण्यासाठी वापरावे. - कनिष्ठ संशोधक अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, कोल्हापूर.११ नोव्हेंबर २००९ : रासायनिकदृष्ट्या पाणी पिण्यास योग्य आहे. मात्र, निर्जंतुकीकरण करून वापरावे. - कनिष्ठ संशोधक अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, कोल्हापूर३ फेब्रुवारी २०११ : पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा पाणी नमुन्याचा सूक्ष्म जीविय अहवाल.- कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, कोल्हापूर.