शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण मंडळ कारवाई करणार कधी ?

By admin | Updated: November 28, 2014 23:43 IST

हिरण्यकेशी प्रदूषण : पाणी तपासले... स्थळभेटी झाल्या... पण न्याय नाही--‘नांगनूर’च्या पाण्याचा प्रश्न

राम मगदूम - गडहिंग्लज -सात वर्षांत सातवेळा प्रदूषित पाण्याचे नमुने तपासण्यात आले. दोनवेळा प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष स्थळ भेटी झाल्या. नांगनूरनजीक हिरण्यकेशी नदीतील पाणी पिण्यासाठी अयोग्य व असुरक्षित असल्याचे अहवाल शासकीय विविध प्रयोगशाळांनी दिले; परंतु नदीचे पाणी प्रदूषित करण्यांविरूद्ध अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. आठवड्यापूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नांगनूरनजीक ओढा व नदीतील दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. तपासणीसाठी हे नमुने चिपळूण येथील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल मिळायला महिनाभराची प्रतीक्षा आहे. मात्र, नदीत पाणी असूनही, ते दूषित झाल्यामुळे प्यायला पाणी नाही, अशी विचित्र अवस्था असल्यामुळे पंचक्रोशीतील जनतेत तीव्र संतापाची भावना आहे.नार्वेकरांची लढाई... अन् पंचक्रोशीची एकजूटनांगनूरचे माजी उपसरपंच स्व. मनोहर नार्वेकर यांनी नांगनूरसह पंचक्रोशीतील जनतेला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, म्हणून एकांड्या शिलेदाराप्रमाणे शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. प्रदूषण मंडळ व कारखान्याबरोबरच अधिकारी, आमदार-खासदारांशीही पत्रव्यवहार केला. हिरण्यकेशीत मळी मिश्रित पाणी सोडणे बंद न झाल्यास कोर्टात खेचण्याचा लेखी इशारादेखील त्यांनी संकेश्वर साखर कारखान्याला दिला होता. अलीकडे दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांचा लढा पुढे नेण्यासाठी आता नांगनूरसह अरळगुंडी, कडलगे व इदरगुच्ची ग्रामस्थ एकत्र आले आहेत. यापूर्वीचे रिपोर्ट काय सांगतात ?फेब्रुवारी २००८ : राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या पाणी गुणवत्ता अहवालानुसार पाणी रासायनिकदृष्ट्या पिण्यासाठी अयोग्य व असुरक्षित आहे. - गटप्रमुख, जिल्हा सुलभीकरण गट, कोल्हापूर.३० एप्रिल २००८ : स्थळ पाहणीवेळी नदीच्या पाण्याला कोणताही रंग अथवा वास आढळला नाही. - अजित सराफ , प्रादेशिक अधिकारी (समन्वय), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई.२८ जानेवारी २००९ : पाण्यात अमोनिया, नायट्रेटस्, आॅक्सिजन, दुर्गंधी व गढूळपणा अधिक असल्यामुळे जवळपास पर्यायी जलस्त्रोत उपलब्ध नसल्यास पाण्यावर योग्य प्रक्रिया व निर्जंतुकीकरण करूनच पिण्यासाठी वापरावे. - कनिष्ठ संशोधक अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, कोल्हापूर.११ नोव्हेंबर २००९ : रासायनिकदृष्ट्या पाणी पिण्यास योग्य आहे. मात्र, निर्जंतुकीकरण करून वापरावे. - कनिष्ठ संशोधक अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, कोल्हापूर३ फेब्रुवारी २०११ : पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा पाणी नमुन्याचा सूक्ष्म जीविय अहवाल.- कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, कोल्हापूर.