शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

रायगडाला जेव्हा जाग येते नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 16:00 IST

ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांच्या निधनामुळे कोल्हापुरातील त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात झाला होता.

ठळक मुद्देरायगडाला जेव्हा जाग येते नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात​​​​​​​ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांच्या आठवणी झाल्या ताज्या

संदीप आडनाईककोल्हापूर : ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांच्या निधनामुळे कोल्हापुरातील त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात झाला होता.अभिनेते अविनाश देशमुख आणि मोहन जोशी यांनी १९८४ मध्ये सीमांत या नाट्यसंस्थेची स्थापना केली आणि ५ मार्च १९८४ रोजी कोल्हापुरात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या ह्यरायगडाला जेव्हा जाग येतेह्ण या ऐतिहासिक नाटकाचा पहिला प्रयोग केला. या नाटकाचे अनेक प्रयोग शहरात आणि ग्रामीण भागांत झाल्याची आठवण ७८ वर्षीय ज्येष्ठ नाट्यवितरक शशिकांत रंगनाथ जोशी यांनी सांगितली.या नाटकात कोणत्याही पात्राच्या कमरेला तलवार नव्हती, हे आणखी वैशिष्ट्य होते. १९६२ साली प्रथमत: रंगभूमीवर आलेले हे नाटक १९६४ मध्ये वेगळ्या ढंगात सादर करण्याचा प्रयत्न अविनाश देशमुख यांनी केला, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. या नाटकात शिवाजी साकारतानाच इथे ओशाळला मृत्यू या नाटकात अविनाश देशमुख यांनी औरंगजेबही साकारला होता.बादशाही लॉजमध्ये मुक्कामरायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचे सुमारे ३५ प्रयोग कोल्हापुरात झाले. ज्या ज्या वेळी इथे प्रयोग झाले, त्या त्या वेळी अविनाश देशमुख पत्नी स्वाती, मुलासह शशिकांत जोशी यांच्या बादशाही लॉजमध्ये मुक्काम करीत, अशी आठवण जोशी यांनी सांगितली. या नाटकात त्यांचे संपूर्ण कुटुंबच काम करीत होते. इतर कलाकारांसारखे नखरे त्यांनी कधी केले नाहीत, असेही जोशी म्हणाले.ग्रामीण भागांतील नाट्यप्रयोगांना प्रतिसादज्येष्ठ नाट्यवितरक कै. प्रफुल्ल महाजन आणि आनंद कुलकर्णी यांच्यासोबत अविनाश देशमुख यांनी अनेक प्रयोग केले. विशेषत: हातकणंगले, उत्तूर, पेठवडगाव येथे झालेल्या प्रयोगांना विशेष प्रतिसाद लाभल्याची माहिती गिरीश कुलकर्णी यांनी सांगितली. या नाटकासोबत त्यांनी इतरही अनेक नाटकांचे प्रयोग जिल्ह्यात केल्याची आठवण कुलकर्णी यांनी सांगितली.

 

टॅग्स :Natakनाटकkolhapurकोल्हापूर