शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
4
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
5
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
6
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
8
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
9
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
10
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
11
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
12
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
13
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
14
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
15
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
16
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
17
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
18
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
19
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
20
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...

महावितरण’ची गाडी निकम यांना शोधत जाते तेव्हा...!

By admin | Updated: June 14, 2015 01:51 IST

‘‘लोकमत’ इफेक्ट : वीज कंपनीची यंत्रणा हादरली, शनिवारी सुटी असूनही अधिकारी कार्यालयात; वीज कनेक्शन आठ दिवसांत जोडणार

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर ‘लोकमत’मध्ये आलेल्या एखाद्या बातमीची दखल किती तत्परतेने घेतली जाते, याचाच अनुभव सातारा जिल्ह्यातील करंदी (ता. जावळी) येथील शेतकरी सदाशिव दिनकर निकम यांना शनिवारी आला. पैसे भरूनही त्यांना तब्बल २२ वर्षे कनेक्शन मिळाले नसल्याचे वृत्त शनिवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच ‘महावितरण’ची गाडी निकम यांना शोधत त्यांच्या गावी गेली. त्यांना मेढा येथे आणून त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती घेतली व आठ दिवसांत कनेक्शन जोडण्याची ग्वाही बारामती झोनचे मुख्य अभियंता रामराव मुंढे यांनी दिली. इतकी वर्षे रखडलेले काम इतक्या जलदगतीने होणार म्हटल्यावर निकम यांना भरून आले. सदाशिव निकम हे करंदी गावचे अल्पभूधारक शेतकरी. त्यांनी पहिल्यांदा १९९३ ला वीज कनेक्शनसाठी १९१० रुपये भरले. तो अर्ज निकाली निघाला म्हणून नव्याने पैसे भरा म्हणून सांगितल्यावर त्यांनी पुन्हा १२ आॅक्टोबर २०११ रोजी ३०२५ रुपये भरले. पहिल्या अर्जाची अनामत रक्कम त्यांना आजही मिळालेली नाही. दोन अर्ज करून त्यासाठी अनामत भरूनही त्यांना कनेक्शन मिळत नव्हते. अनेक वेळा हेलपाटे मारूनही महावितरणचे अधिकारी ‘आता तुमचाच नंबर बघा,’ असे आश्वासन देत; परंतु प्रत्यक्षात कनेक्शन काही जोडत नव्हते. त्यासंबंधीची व्यथा निकम यांनी ‘लोकमत’कडे मांडली. शनिवारी त्याचे वृत्त प्रकाशित होताच वीज कंपनीची यंत्रणा हादरली. दुसऱ्या शनिवारची सुटी असूनही मेढ्याचे उपकार्यकारी अभियंता वैभव थोरवडे व कनिष्ठ अभियंता सी. आर. महाडिक कार्यालयात आले. गावातील वायरमनद्वारे निकम यांना भेटायला या, असा निरोप दिला. त्यांच्याकडे वाहनाची सोय नव्हती म्हटल्यावर वायरमनला ‘वाहन करून त्यांना घेऊन या,’ असे सांगण्यात आले. त्यानुसार वायरमन त्यांना घेऊन मेढा येथे गेला. तिथे त्यांच्याकडून पूर्वीच्या वायरमनने एक हजार रुपयांची लाच घेतल्याचे लेखी लिहून घेतले व ट्रान्सफॉर्मर बसवून तातडीने कनेक्शन देण्याची ग्वाही देण्यात आली. मुख्य अभियंता रामराव मुंढे यांनी ‘लोकमत’ला सांगितले,‘निकम यांची व्यथा मी वाचल्यावर सकाळीच मेढ्याचे उपअभियंता थोरवडे यांना तातडीने कनेक्शन देण्याचे आदेश दिले आहेत. निकम यांना कनेक्शन मंजूर आहे; परंतु त्यांचे क्षेत्र गावठाणजवळ आहे. शेतीपंपाचे कनेक्शन असल्याने दुसऱ्या फीडरवरून ते द्यायला हवे होते. त्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसवायला लागत होता. तो बसविण्यासाठी नेमलेल्या सांगलीच्या पाटील एजन्सीने हे काम वेळेत न केल्याने कनेक्शन देण्यास विलंब झाला; परंतु आता मागे काय झाले याची कारणे न सांगता पहिल्यांदा त्यांचे कनेक्शन जोडावे, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार शक्य तितक्या लवकर कनेक्शन जोडले जाईल.’