शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

हातकणंगलेला नगरपंचायत कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:22 IST

ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, गाव बंद आंदोलन, उपोषण, अशी लोकशाही मार्गाची विविध जनआंदोलने पूर्ण झाली. पालकमंत्री, नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा होऊनही हातकणंगले

ठळक मुद्देग्रामस्थांचा सवाल : भाजप-शिवसेनेच्या राजकारणाचा फटका!लोकसभा निवडणुकीपूर्वी हातकणंगले नगरपंचायत स्थापन होण्याच्या अशा पल्लवित

दत्ता बिडकर ।हातकणंगले : ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, गाव बंद आंदोलन, उपोषण, अशी लोकशाही मार्गाची विविध जनआंदोलने पूर्ण झाली. पालकमंत्री, नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा होऊनही हातकणंगले तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत स्थापन करण्यामध्ये भाजपचे शासन दुजाभाव करीत असल्याची भावना हातकणंगले ग्रामस्थांची झाली आहे. आजरा, चंदगडपेक्षा हातकणंगलेची लोकसंख्या जास्त असूनही येथील नगरपंचायत निर्मितीसाठी राज्य शासन उदासीन असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

हातकणंगले नगरपंचायतसाठी कृती समितीच्यावतीने २०१६ पासून ग्रामस्थांच्यावतीने वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. आॅक्टोबर २०१७ च्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आला. तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलने झाली, तरीही शासनाने नगरपंचायत स्थापनेकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले. नगरपंचायतीच्या स्थापनेसाठी ग्रामस्थांनी कृती समिती स्थापन करून आमदार, खासदार, पालकमंत्री, नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करूनही हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे नगरपंचायत स्थापनेत शासन दुजाभाव करीत आहे, अशी ग्रामस्थांची भावना झाली आहे.

शिरोळ, आजरा आणि चंदगड या तालुक्यांच्या ग्रामपंचायती बरखास्त होऊन या ठिकाणी नगरपंचायती निर्माण झाल्या. मात्र, अद्याप हातकणंगलेसारख्या मोठ्या गावाचा नंबर लागला नाही. आजरा आणि चंदगडपेक्षा हातकणंगलेची लोकसंख्या मोठी असूनही त्याला वेगळा न्याय लावला जात आहे. शिरोळ, आजरा आणि चंदगडचे नेतृत्व सर्वच पातळींवर सरस ठरले असल्याची भावना झाली आहे. हातकणंगलेसाठी कोणी वाली आहे का? अशी हाकही ग्रामस्थ घालत आहेत.

हातकणंगले येथील आमदार सुजित मिणचेकर, राधानगरी-भुदरगडचे स्थानिक आमदार प्रकाश आबिटकर आणि शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील हे तीन आमदार शिवसेनेचे आहेत. त्यांच्या मतदारसंघातील हातकणंगले, राधानगरी, गारगोटी आणि शाहूवाडी ही तालुक्याची ठिकाणे जाणूनबुजून नगरपंचायतीपासून वंचित ठेवली जात असल्याचा आक्षेप शिवसैनिक आणि नागरिकांमध्ये आहे.सेना-भाजपमधील राजकारणात भाजप शिवसेनेच्या आमदारांवर कुरघोडीचे राजकारण करत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राजकीय काटशहांमध्ये नागरिकांना नगरपंचायतीपासून वंचित रहावे लागत आहे.मागणी कायम : मुख्यमंत्र्यांना निवेदनहातकणंगलेचे सेना आमदार सुजित मिणचेकर यांनी हातकणंगले येथील सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी आणि दादा गोरे यांच्यासह मुख्यमंत्री यांची भेट घेऊन हातकणंगले नगरपंचायत तत्काळ स्थापन करावी, असे निवेदन दिले. मख्यमंत्र्यांनी या निवेदनावर तत्काळ अंमलबजावणीचा शेरा मारून पुढील कार्यवाहीसाठी निवेदन नगरविकास विभागाकडे पाठवून दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी हातकणंगले नगरपंचायत स्थापन होण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.हातकणंगले नगरपंचायतीच्या मागणीसाठी आमदार सुजित मिणचेकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी सागर पुजारी, दादा गोरे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस