शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

हातकणंगलेला नगरपंचायत कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:22 IST

ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, गाव बंद आंदोलन, उपोषण, अशी लोकशाही मार्गाची विविध जनआंदोलने पूर्ण झाली. पालकमंत्री, नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा होऊनही हातकणंगले

ठळक मुद्देग्रामस्थांचा सवाल : भाजप-शिवसेनेच्या राजकारणाचा फटका!लोकसभा निवडणुकीपूर्वी हातकणंगले नगरपंचायत स्थापन होण्याच्या अशा पल्लवित

दत्ता बिडकर ।हातकणंगले : ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, गाव बंद आंदोलन, उपोषण, अशी लोकशाही मार्गाची विविध जनआंदोलने पूर्ण झाली. पालकमंत्री, नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा होऊनही हातकणंगले तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत स्थापन करण्यामध्ये भाजपचे शासन दुजाभाव करीत असल्याची भावना हातकणंगले ग्रामस्थांची झाली आहे. आजरा, चंदगडपेक्षा हातकणंगलेची लोकसंख्या जास्त असूनही येथील नगरपंचायत निर्मितीसाठी राज्य शासन उदासीन असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

हातकणंगले नगरपंचायतसाठी कृती समितीच्यावतीने २०१६ पासून ग्रामस्थांच्यावतीने वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. आॅक्टोबर २०१७ च्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आला. तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलने झाली, तरीही शासनाने नगरपंचायत स्थापनेकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले. नगरपंचायतीच्या स्थापनेसाठी ग्रामस्थांनी कृती समिती स्थापन करून आमदार, खासदार, पालकमंत्री, नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करूनही हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे नगरपंचायत स्थापनेत शासन दुजाभाव करीत आहे, अशी ग्रामस्थांची भावना झाली आहे.

शिरोळ, आजरा आणि चंदगड या तालुक्यांच्या ग्रामपंचायती बरखास्त होऊन या ठिकाणी नगरपंचायती निर्माण झाल्या. मात्र, अद्याप हातकणंगलेसारख्या मोठ्या गावाचा नंबर लागला नाही. आजरा आणि चंदगडपेक्षा हातकणंगलेची लोकसंख्या मोठी असूनही त्याला वेगळा न्याय लावला जात आहे. शिरोळ, आजरा आणि चंदगडचे नेतृत्व सर्वच पातळींवर सरस ठरले असल्याची भावना झाली आहे. हातकणंगलेसाठी कोणी वाली आहे का? अशी हाकही ग्रामस्थ घालत आहेत.

हातकणंगले येथील आमदार सुजित मिणचेकर, राधानगरी-भुदरगडचे स्थानिक आमदार प्रकाश आबिटकर आणि शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील हे तीन आमदार शिवसेनेचे आहेत. त्यांच्या मतदारसंघातील हातकणंगले, राधानगरी, गारगोटी आणि शाहूवाडी ही तालुक्याची ठिकाणे जाणूनबुजून नगरपंचायतीपासून वंचित ठेवली जात असल्याचा आक्षेप शिवसैनिक आणि नागरिकांमध्ये आहे.सेना-भाजपमधील राजकारणात भाजप शिवसेनेच्या आमदारांवर कुरघोडीचे राजकारण करत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राजकीय काटशहांमध्ये नागरिकांना नगरपंचायतीपासून वंचित रहावे लागत आहे.मागणी कायम : मुख्यमंत्र्यांना निवेदनहातकणंगलेचे सेना आमदार सुजित मिणचेकर यांनी हातकणंगले येथील सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी आणि दादा गोरे यांच्यासह मुख्यमंत्री यांची भेट घेऊन हातकणंगले नगरपंचायत तत्काळ स्थापन करावी, असे निवेदन दिले. मख्यमंत्र्यांनी या निवेदनावर तत्काळ अंमलबजावणीचा शेरा मारून पुढील कार्यवाहीसाठी निवेदन नगरविकास विभागाकडे पाठवून दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी हातकणंगले नगरपंचायत स्थापन होण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.हातकणंगले नगरपंचायतीच्या मागणीसाठी आमदार सुजित मिणचेकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी सागर पुजारी, दादा गोरे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस