शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

हातकणंगलेला नगरपंचायत कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:22 IST

ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, गाव बंद आंदोलन, उपोषण, अशी लोकशाही मार्गाची विविध जनआंदोलने पूर्ण झाली. पालकमंत्री, नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा होऊनही हातकणंगले

ठळक मुद्देग्रामस्थांचा सवाल : भाजप-शिवसेनेच्या राजकारणाचा फटका!लोकसभा निवडणुकीपूर्वी हातकणंगले नगरपंचायत स्थापन होण्याच्या अशा पल्लवित

दत्ता बिडकर ।हातकणंगले : ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, गाव बंद आंदोलन, उपोषण, अशी लोकशाही मार्गाची विविध जनआंदोलने पूर्ण झाली. पालकमंत्री, नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा होऊनही हातकणंगले तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत स्थापन करण्यामध्ये भाजपचे शासन दुजाभाव करीत असल्याची भावना हातकणंगले ग्रामस्थांची झाली आहे. आजरा, चंदगडपेक्षा हातकणंगलेची लोकसंख्या जास्त असूनही येथील नगरपंचायत निर्मितीसाठी राज्य शासन उदासीन असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

हातकणंगले नगरपंचायतसाठी कृती समितीच्यावतीने २०१६ पासून ग्रामस्थांच्यावतीने वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. आॅक्टोबर २०१७ च्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आला. तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलने झाली, तरीही शासनाने नगरपंचायत स्थापनेकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले. नगरपंचायतीच्या स्थापनेसाठी ग्रामस्थांनी कृती समिती स्थापन करून आमदार, खासदार, पालकमंत्री, नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करूनही हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे नगरपंचायत स्थापनेत शासन दुजाभाव करीत आहे, अशी ग्रामस्थांची भावना झाली आहे.

शिरोळ, आजरा आणि चंदगड या तालुक्यांच्या ग्रामपंचायती बरखास्त होऊन या ठिकाणी नगरपंचायती निर्माण झाल्या. मात्र, अद्याप हातकणंगलेसारख्या मोठ्या गावाचा नंबर लागला नाही. आजरा आणि चंदगडपेक्षा हातकणंगलेची लोकसंख्या मोठी असूनही त्याला वेगळा न्याय लावला जात आहे. शिरोळ, आजरा आणि चंदगडचे नेतृत्व सर्वच पातळींवर सरस ठरले असल्याची भावना झाली आहे. हातकणंगलेसाठी कोणी वाली आहे का? अशी हाकही ग्रामस्थ घालत आहेत.

हातकणंगले येथील आमदार सुजित मिणचेकर, राधानगरी-भुदरगडचे स्थानिक आमदार प्रकाश आबिटकर आणि शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील हे तीन आमदार शिवसेनेचे आहेत. त्यांच्या मतदारसंघातील हातकणंगले, राधानगरी, गारगोटी आणि शाहूवाडी ही तालुक्याची ठिकाणे जाणूनबुजून नगरपंचायतीपासून वंचित ठेवली जात असल्याचा आक्षेप शिवसैनिक आणि नागरिकांमध्ये आहे.सेना-भाजपमधील राजकारणात भाजप शिवसेनेच्या आमदारांवर कुरघोडीचे राजकारण करत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राजकीय काटशहांमध्ये नागरिकांना नगरपंचायतीपासून वंचित रहावे लागत आहे.मागणी कायम : मुख्यमंत्र्यांना निवेदनहातकणंगलेचे सेना आमदार सुजित मिणचेकर यांनी हातकणंगले येथील सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी आणि दादा गोरे यांच्यासह मुख्यमंत्री यांची भेट घेऊन हातकणंगले नगरपंचायत तत्काळ स्थापन करावी, असे निवेदन दिले. मख्यमंत्र्यांनी या निवेदनावर तत्काळ अंमलबजावणीचा शेरा मारून पुढील कार्यवाहीसाठी निवेदन नगरविकास विभागाकडे पाठवून दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी हातकणंगले नगरपंचायत स्थापन होण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.हातकणंगले नगरपंचायतीच्या मागणीसाठी आमदार सुजित मिणचेकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी सागर पुजारी, दादा गोरे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस