शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

शेतकऱ्यांना न्याय कधी ?

By admin | Updated: June 10, 2016 00:18 IST

शासकीय पातळीवर दखल नाही : वाळलेल्या उसाची नुकसान भरपाई देण्याची मागणी

शिवराज लोंढे--सावरवाडी --पाणी उपसाबंदी, दुष्काळजन्य परिस्थिती, शासनाचे शेतकऱ्यांकडे झालेले दुर्लक्ष, शेतीचे ढासळलेले पाणी नियोजन, या साऱ्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी ते मे महिन्यांत करवीर तालुक्यात भोगावती नदीकाठच्या कार्यक्षेत्रात ५00 एकर ऊस पिकांचे वाळून नुकसान झाले. ऊस पिके वाळून गेल्याने शेतकरी वर्ग हबकला गेला. उपसाबंदीमुळे वाळून गेलेल्या ऊस शेतीकडे शासकीय पातळीवर कोणीच दखल घेत नाही. ऐन दुष्काळात वाळलेल्या ऊस पीक शेतकऱ्यांना न्याय मिळणार कधी? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला .गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात पाटबंधारे खात्याने पाणी उपसाबंदी लादल्याने यावर्षी ऊस शेतीतून शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले. वाळून गेलेल्या ऊस पकांच्या क्षेत्राचे अद्याप शासकीय पातळीवर पंचनामे झालेले नाहीत. आडसाली ऊस क्षेत्रातून शेतकऱ्यांचा झालेला खर्च वाया गेल्याने वाळून गेलेल्या शेतकऱ्यांचे दुखणं अजून कोणीही पाहिलेले नाही. उपसाबंदीचा परिणाम शेती व्यवसायावर झाल्याने ऊस क्षेत्रासाठी केलेली मशागत, खतांचा डोस, पाणीपट्टी, भांगलण यासाठी झालेला खर्च वाया गेल्याने हताश झालेला शेतकरी माना वाळून गेलेली ऊस पिके काढून टाकण्याकडे वळलेला आहे.शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा प्रश्न गुलदस्त्यातच आहे. वाळून गेलेल्या ऊस पिकाच्या नुकसान भरपाईबाबत शेतकऱ्यांना कोणीच विचारत नाही. लोकप्रतिनीधींनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्यामुळे ऊस पट्ट्यात नाराजीचा सूर शेतकरी वर्गात उमटत आहे.वाळलेल्या ऊस पिकांच्या क्षेत्राचा शासकीय पातळीवर पाहणीचा सर्व्हे झालेला नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही, याबाबी महत्त्वाच्या आहेत.तालुक्यात शेतीसाठी लागणारे पाणी याबाबत गेल्या ४० वर्षांत मोठे पाझर तलाव उभारणी डोंगरी भागात झालेले नाही. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या योजनेचा बट्ट्याबोळ उडाला गेला. सहकारी पाणीपुरवठा संस्थांद्वारे होणारा अपुरा पाणीपुरवठा अथवा पाणीपुरवठा संस्था राजकीय गटाऱ्या बनल्याने पाणी वाटपात सावळा गोंधळ उडत आहे. उपसाबंदीचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने साखर कारखान्यांसमोर ऊसटंचाईचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. वाळून गेलेल्या ऊस पिकांचा सर्व्हे होऊन शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करवीर तालुक्यात भोगावती, तुळशी, कुंभी नद्या वाहताना नदीपात्रे पाण्याने तुडुंब भरलेली असून, उपसाबंदीचा फटका शेतकऱ्यांना चांगलाच बसलेला आहे. वाळलेल्या ऊस पिकांचे मात्र शासकीय पातळीवर पंचनामे अद्याप झालेले नाहीत. उपसाबंदीमुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जाताना शेतीच्या पाणी पुरवठ्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे.