शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना न्याय कधी ?

By admin | Updated: June 10, 2016 00:18 IST

शासकीय पातळीवर दखल नाही : वाळलेल्या उसाची नुकसान भरपाई देण्याची मागणी

शिवराज लोंढे--सावरवाडी --पाणी उपसाबंदी, दुष्काळजन्य परिस्थिती, शासनाचे शेतकऱ्यांकडे झालेले दुर्लक्ष, शेतीचे ढासळलेले पाणी नियोजन, या साऱ्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी ते मे महिन्यांत करवीर तालुक्यात भोगावती नदीकाठच्या कार्यक्षेत्रात ५00 एकर ऊस पिकांचे वाळून नुकसान झाले. ऊस पिके वाळून गेल्याने शेतकरी वर्ग हबकला गेला. उपसाबंदीमुळे वाळून गेलेल्या ऊस शेतीकडे शासकीय पातळीवर कोणीच दखल घेत नाही. ऐन दुष्काळात वाळलेल्या ऊस पीक शेतकऱ्यांना न्याय मिळणार कधी? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला .गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात पाटबंधारे खात्याने पाणी उपसाबंदी लादल्याने यावर्षी ऊस शेतीतून शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले. वाळून गेलेल्या ऊस पकांच्या क्षेत्राचे अद्याप शासकीय पातळीवर पंचनामे झालेले नाहीत. आडसाली ऊस क्षेत्रातून शेतकऱ्यांचा झालेला खर्च वाया गेल्याने वाळून गेलेल्या शेतकऱ्यांचे दुखणं अजून कोणीही पाहिलेले नाही. उपसाबंदीचा परिणाम शेती व्यवसायावर झाल्याने ऊस क्षेत्रासाठी केलेली मशागत, खतांचा डोस, पाणीपट्टी, भांगलण यासाठी झालेला खर्च वाया गेल्याने हताश झालेला शेतकरी माना वाळून गेलेली ऊस पिके काढून टाकण्याकडे वळलेला आहे.शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा प्रश्न गुलदस्त्यातच आहे. वाळून गेलेल्या ऊस पिकाच्या नुकसान भरपाईबाबत शेतकऱ्यांना कोणीच विचारत नाही. लोकप्रतिनीधींनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्यामुळे ऊस पट्ट्यात नाराजीचा सूर शेतकरी वर्गात उमटत आहे.वाळलेल्या ऊस पिकांच्या क्षेत्राचा शासकीय पातळीवर पाहणीचा सर्व्हे झालेला नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही, याबाबी महत्त्वाच्या आहेत.तालुक्यात शेतीसाठी लागणारे पाणी याबाबत गेल्या ४० वर्षांत मोठे पाझर तलाव उभारणी डोंगरी भागात झालेले नाही. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या योजनेचा बट्ट्याबोळ उडाला गेला. सहकारी पाणीपुरवठा संस्थांद्वारे होणारा अपुरा पाणीपुरवठा अथवा पाणीपुरवठा संस्था राजकीय गटाऱ्या बनल्याने पाणी वाटपात सावळा गोंधळ उडत आहे. उपसाबंदीचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने साखर कारखान्यांसमोर ऊसटंचाईचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. वाळून गेलेल्या ऊस पिकांचा सर्व्हे होऊन शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करवीर तालुक्यात भोगावती, तुळशी, कुंभी नद्या वाहताना नदीपात्रे पाण्याने तुडुंब भरलेली असून, उपसाबंदीचा फटका शेतकऱ्यांना चांगलाच बसलेला आहे. वाळलेल्या ऊस पिकांचे मात्र शासकीय पातळीवर पंचनामे अद्याप झालेले नाहीत. उपसाबंदीमुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जाताना शेतीच्या पाणी पुरवठ्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे.