शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शाळा व्यवस्थापन समितीत इतकं दडलंय तरी काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:11 IST

दत्ता पाटील। म्हाकवे : लाभाचे, प्रतिष्ठेचे ना दारावर पाटी लावण्याचे पद तरीही प्रतिष्ठा, गट-तट, राजकीय पक्ष आणि आता यापुढे ...

ठळक मुद्देउमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला : गट-तट, पक्ष आणि शपथाही

दत्ता पाटील।म्हाकवे : लाभाचे, प्रतिष्ठेचे ना दारावर पाटी लावण्याचे पद तरीही प्रतिष्ठा, गट-तट, राजकीय पक्ष आणिआता यापुढे जाऊन देवादिकांच्या शपथी घेऊन निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा घाट शाळाव्यवस्थापन समिती स्थापन करण्यासाठी घातला जात आहे. यामुळे भावा शाळा व्यवस्थापन समितीत इतकं दडलयं तरी काय? असा सवाल जाणकार मंडळीतून व्यक्त होत आहे.

आघाडी सरकारच्या काळात आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे पालकांचे अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या हेतूने आणि शिक्षकांवर नजर ठेवण्यासाठी पालकांतूनच प्रतिनिधी निवड करण्याची संकल्पना पुढे आली. यामध्ये प्रत्येक वर्गातून एक याप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात येते. या समितीचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो. त्यामुळे हा कार्यकाळ संपला असून, जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये सध्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडी सुरू आहेत.

काही शाळांतील पालकांमध्ये या निवडीला आणि पद प्रतिष्ठेला गौण मानून या निवडीची औपचारिकता पूर्ण केली. मात्र, मोठ्या गावात या निवडीलाही ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे मतदानाचे स्वरूप आले आहे. गट-तट, पक्ष पातळीवर युत्या करून जागा (तिकीट) वाटप करण्यात येत आहेत. तर अनेक ठिकाणी राजकीय हाडवैर असणारी मंडळी एकत्र येऊन जागा वाटप करीत आहेत. जागा वाटपाची चर्चा अंतिम करताना ग्रामदैवत, सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या देवांच्या शपथा२ही घेतल्या जात असल्याबाबत पालकांतून बोलले जात आहे.'कागल'मध्ये चर्चेचा विषय...कागलमधील एका गावात तर निवडणूक कोणतीही असली तरी त्या दोन गटांत विरोध ठरलेला. मात्र, पहिल्यांदाच येथील दोन स्थानिक गट एकत्र येऊन संबंधित गावातील शाळा व्यवस्थापन समितीच्या जागा वाटप करीत आहेत. अध्यक्षपदाच्याही एक-एक वर्षासाठी वाटण्या केल्या आहेत. यासाठी चक्क तीर्थक्षेत्रावर जाऊन शपथ विधीही केल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, हा सलोखा शाळेसह गावच्या विकासासाठीही कायम राहणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे. 

गट बदलण्याचीही तयारीकागलमध्ये पदासाठी गट बदलणे नवीन नाही; परंतु शाळा व्यवस्थापन समितीत आपल्या सौभाग्यवतीला स्थान मिळविण्यासाठी गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असणाºया गटाला रामराम करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे त्याला ही जागा देऊ केली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच विरोधी नेत्यानेच हा आपल्याकडे उमेदवारी मागत असल्याचे सांगून बिंग फोडले.पाल्याच्या गुणवत्तेचा पर्याय वापरावामुलांच्या समोरच या निवडी केल्या जातात. यावेळी काही वेळा हमरीतुमरीचे प्रसंगही घडतात. त्यामुळे निवडणुकीऐवजी प्रत्येक वर्गातील पहिल्या क्रमांकाच्या पाल्यांच्या पालकांना प्रतिनिधित्वाची संधी द्यावी. ते इच्छुक नसतील किंवा बाहेरगावी राहत असतील तर दोन नंबरच्या पाल्याच्या पालकांना संधी द्यावी. यामुळे प्रतिनिधित्व करू इच्छिणाºयांमध्ये आपल्या पाल्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्पर्धा वाढेल.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर