शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

प्लास्टिकला पर्याय काय...बेकरी व्यवसायासमोर समस्या; पदार्थ खराब होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 12:27 IST

बेकरीतील बिस्कीट, खारी, बटर, टोस्ट या वस्तूंच्या पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशवीचाच वापर केला जातो. त्यावर सध्या बेकरी व्यावसायिकांच्या काही उपाय समोर नसल्याने खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला राहणार नाही. त्यामुळे ग्राहकांवरही त्याचा परिणाम होण्याची भीती बेकरी व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देप्लास्टिक ला पर्याय काय...बेकरी व्यवसायासमोर समस्यापदार्थ खराब होण्याची भीती

कोल्हापूर : बेकरीतील बिस्कीट, खारी, बटर, टोस्ट या वस्तूंच्या पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशवीचाच वापर केला जातो. त्यावर सध्या बेकरी व्यावसायिकांच्या काही उपाय समोर नसल्याने खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला राहणार नाही. त्यामुळे ग्राहकांवरही त्याचा परिणाम होण्याची भीती बेकरी व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.बेकरीतील प्रामुख्याने खारी, चिवडा, खाजे, पेढे या वस्तू पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशवीचाच वापर केला जातो. एका ठिकाणाहून हा माल दुसऱ्या ठिकाणच्या बेकरीत पोहोचविण्यासाठी किंवा ग्राहकांना हे पदार्थ देण्यासाठी प्लास्टिकचे पॅकिंग उपयुक्त ठरत होते. मात्र, प्लास्टिकला बंदी आल्याने हा माल कसा पाठवयाचा, असा प्रश्न बेकरी विक्रेत्यांसमोर आला आहे.कागदातून पॅकिंग करून दिल्यास पदार्थ मऊ पडण्याची शक्यता आहे. प्लास्टिक पिशवीत बेकरी पदार्थ खूप दिवस टिकतात. पावसाळी व हिवाळी वातावरणात कागदी पिशवीतील पदार्थ भिजण्याची किंवा मऊ पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पदार्थाच्या दर्जावर परिणाम होणार आहे, असल्याचे बेकरी व्यावसायिकांच्यामधून सांगण्यात येत आहेत. आमचा प्लास्टिक बंदीला विरोध नाही; मात्र यावर शासनानेच काहीतरी उपाय सुचवावा, अशी मागणी बेकरी व्यावसायिकांमधून होत आहे.

किराणा दुकानदारांना दिलासा...प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात काटेकोरपणे सुरू असताना किराणा दुकानांतील अडचणी लक्षात घेतल्या. पाव किलोवरील किराणा मालाच्या पॅकिंगसाठी असलेली प्लास्टिक बंदी शासनाने मागे घेतली आहे. या निर्णयामुळे किराणा व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक परत गोळा करण्याची जबाबदारीही संबंधित दुकानदारांचीच आहे.

पॅकिंगवर उत्पादकाचे नाव, पत्ता, प्लास्टिकचा दर्जा छापावा, उत्पादकांनी रिसायकलिंगसाठी कलेक्शन सेंटर्स उभारावीत. हे प्लास्टिक रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित दुकानदारांचीच राहणार असल्याने त्यांचे काम वाढले आहे.

पर्यावरणांच्या दृष्टिकोनातून प्लास्टिक बंदीचा निर्णय चांगला आहे. मात्र, बेकरी व्यवसायासाठी प्लास्टिकबाबत काही तरी पर्याय देणे गरजेचे आहे. बेकरी पदार्थ व प्लास्टिक यांचे अतूट नाते आहे. प्लास्टिक विना बेकरीतील पदार्थ ग्राहकांना किंवा अन्य दुकानांपर्यंत कसा पोहोचवायचा असा प्रश्न पडला आहे.एम. आर. शेख,अध्यक्ष,कोल्हापूर जिल्हा बेकर्स ग्राहक सहकारी मर्या संस्था 

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीkolhapurकोल्हापूर