शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

प्लास्टिकला पर्याय काय...बेकरी व्यवसायासमोर समस्या; पदार्थ खराब होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 12:27 IST

बेकरीतील बिस्कीट, खारी, बटर, टोस्ट या वस्तूंच्या पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशवीचाच वापर केला जातो. त्यावर सध्या बेकरी व्यावसायिकांच्या काही उपाय समोर नसल्याने खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला राहणार नाही. त्यामुळे ग्राहकांवरही त्याचा परिणाम होण्याची भीती बेकरी व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देप्लास्टिक ला पर्याय काय...बेकरी व्यवसायासमोर समस्यापदार्थ खराब होण्याची भीती

कोल्हापूर : बेकरीतील बिस्कीट, खारी, बटर, टोस्ट या वस्तूंच्या पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशवीचाच वापर केला जातो. त्यावर सध्या बेकरी व्यावसायिकांच्या काही उपाय समोर नसल्याने खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला राहणार नाही. त्यामुळे ग्राहकांवरही त्याचा परिणाम होण्याची भीती बेकरी व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.बेकरीतील प्रामुख्याने खारी, चिवडा, खाजे, पेढे या वस्तू पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशवीचाच वापर केला जातो. एका ठिकाणाहून हा माल दुसऱ्या ठिकाणच्या बेकरीत पोहोचविण्यासाठी किंवा ग्राहकांना हे पदार्थ देण्यासाठी प्लास्टिकचे पॅकिंग उपयुक्त ठरत होते. मात्र, प्लास्टिकला बंदी आल्याने हा माल कसा पाठवयाचा, असा प्रश्न बेकरी विक्रेत्यांसमोर आला आहे.कागदातून पॅकिंग करून दिल्यास पदार्थ मऊ पडण्याची शक्यता आहे. प्लास्टिक पिशवीत बेकरी पदार्थ खूप दिवस टिकतात. पावसाळी व हिवाळी वातावरणात कागदी पिशवीतील पदार्थ भिजण्याची किंवा मऊ पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पदार्थाच्या दर्जावर परिणाम होणार आहे, असल्याचे बेकरी व्यावसायिकांच्यामधून सांगण्यात येत आहेत. आमचा प्लास्टिक बंदीला विरोध नाही; मात्र यावर शासनानेच काहीतरी उपाय सुचवावा, अशी मागणी बेकरी व्यावसायिकांमधून होत आहे.

किराणा दुकानदारांना दिलासा...प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात काटेकोरपणे सुरू असताना किराणा दुकानांतील अडचणी लक्षात घेतल्या. पाव किलोवरील किराणा मालाच्या पॅकिंगसाठी असलेली प्लास्टिक बंदी शासनाने मागे घेतली आहे. या निर्णयामुळे किराणा व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक परत गोळा करण्याची जबाबदारीही संबंधित दुकानदारांचीच आहे.

पॅकिंगवर उत्पादकाचे नाव, पत्ता, प्लास्टिकचा दर्जा छापावा, उत्पादकांनी रिसायकलिंगसाठी कलेक्शन सेंटर्स उभारावीत. हे प्लास्टिक रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित दुकानदारांचीच राहणार असल्याने त्यांचे काम वाढले आहे.

पर्यावरणांच्या दृष्टिकोनातून प्लास्टिक बंदीचा निर्णय चांगला आहे. मात्र, बेकरी व्यवसायासाठी प्लास्टिकबाबत काही तरी पर्याय देणे गरजेचे आहे. बेकरी पदार्थ व प्लास्टिक यांचे अतूट नाते आहे. प्लास्टिक विना बेकरीतील पदार्थ ग्राहकांना किंवा अन्य दुकानांपर्यंत कसा पोहोचवायचा असा प्रश्न पडला आहे.एम. आर. शेख,अध्यक्ष,कोल्हापूर जिल्हा बेकर्स ग्राहक सहकारी मर्या संस्था 

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीkolhapurकोल्हापूर