शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

Kolhapur Circuit Bench: उच्च न्यायालयाचे खंडपीठ-सर्किट बेंचमध्ये फरक काय ?.. वाचा सविस्तर

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 2, 2025 13:31 IST

इंदुमती गणेश कोल्हापूर : प्रलंबित खटल्यांचा निपटारा लवकरात लवकर होण्यासाठी सहा जिल्ह्यांतील वकील मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ स्थापण्यासाठी ...

इंदुमती गणेशकोल्हापूर : प्रलंबित खटल्यांचा निपटारा लवकरात लवकर होण्यासाठी सहा जिल्ह्यांतील वकील मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ स्थापण्यासाठी कोल्हापूरकर लढा देत होते. पण, सर्वसामान्यांच्या मनामध्ये खंडपीठ आणि सर्किट बेंच म्हणजे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रलंबित खटल्यांचा वेळेवर निपटारा करण्यासाठी उच्च न्यायालयाची विभागीय न्यायालये म्हणजेच सर्किट बेंच. कलम ५१ (३) नुसार मुख्य न्यायाधीशांना वरचष्मा देण्यात आला असून, त्यांना आवश्यक असल्यास राज्यपाल यांच्या संमतीने विनाविलंब सर्किट बेंच स्थापन करता येऊ शकते.

वाचा: १९८२ पासून मागणी, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचा लढा; संपुर्ण घटनाक्रम..  राज्यपालांच्या अध्यादेशाने सर्किट बेंचभारतीय न्यायव्यवस्थेत सर्किट बेंच हा शब्द ब्रिटिश काळापासून वापरला जातो. खंडपीठ म्हणजे ज्या उच्च न्यायालयामध्ये एखाद्या प्रदेशातील खटल्यांचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी खटल्यांचा वेळेवर निपटारा करण्यासाठी न्यायालयाच्या बसण्याचे ठिकाण निश्चित करून राज्यपालांच्या अध्यादेशाने स्थापन करण्यात येणारे विभागीय न्यायालय म्हणजे सर्किट बेंच.जेथे खटल्यांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी वर्षातील काही निवडक महिन्यांमध्ये मुख्य न्यायमूर्तींच्या आदेशाने कामकाज चालविले जाते. ज्या राज्यांमध्ये खटल्यांचे प्रमाण नगण्य आहे; परंतु सर्वसामान्य पक्षकारांना उच्च न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहणे अडचणीचे असते, अशा ठिकाणी खटले चालविण्यासाठी सर्किट बेंचची स्थापना करण्यात येते.

वाचा : सरन्यायाधीशांनी दिलेला शब्द खरा करून दाखविलासर्किट बेंच असेही त्यामध्ये दोन प्रकार आहेत. सर्किट बेंचमध्ये घटनेशी संबंधित ( कॉन्स्टिट्युशन मॅटर) प्रकरणे थेट दाखल करून घेता येत नाहीत. राष्ट्रपतींच्या अध्यादेशाने खंडपीठकायमस्वरूपी उच्च न्यायालयाचे खंडपीठ एखाद्या ठिकाणी स्थापन करण्याकरिता सर्वप्रथम राज्य पुनर्रचना कायदा १९५६ मध्येदेखील कलम ५१ (२) नुसार राज्य शासनाने खंडपीठ स्थापनेबाबतचा प्रस्ताव मुख्य न्यायाधीशांच्या परवानगीने सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मुख्य न्यायाधीशांनीदेखील खंडपीठाच्या प्रस्तावावर राज्यपालांची संमती घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येतो. केंद्र सरकारकडून खंडपीठाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यास राष्ट्रपतींच्या अध्यादेशाद्वारे खंडपीठाची स्थापना करण्यात येते.