शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

आमच्या स्वातंत्र्याचे काय?; आजऱ्यात स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात कष्टकरी जनतेचा रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 16:06 IST

देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे कष्टकरी जनतेच्या लढ्यातून मिळाले आहे. लढून मिळविलेल्या या स्वातंत्र्याचा सन्मान करणे आणि कष्टकऱ्यांच्या मुक्तीसाठी त्यांच्या नव्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष उभा करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे.

आजरा - सगळीकडे स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी होत असताना आजरा तालुक्यातील कष्टकरी जनतेने श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आमच्या स्वातंत्र्याचे काय? असा सवाल करून आजरा शहरात आज मिरवणूक काढली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून रॅलीची सुरुवात झाली. स्वातंत्र्याची ७५ वर्षे- आमच्या स्वातंत्र्याचे काय? अशा घोषणा देत रॅली संभाजी चौकात आली. घोषणांनी चौक दणाणून सोडला. त्यानंतर तिथेच सभा झाली. 

देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे कष्टकरी जनतेच्या लढ्यातून मिळाले आहे. लढून मिळविलेल्या या स्वातंत्र्याचा सन्मान करणे आणि कष्टकऱ्यांच्या मुक्तीसाठी त्यांच्या नव्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष उभा करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरे करताना कष्टकऱ्यांच्या मुक्तीसाठीचा संघर्ष चालू ठेवणे हाच खरा तिरंग्याचा सन्मान आहे असे श्रमुदचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई यांनी सांगितले.

आमच्या वाट्याला अजून खरे स्वातंत्र्य यायचे आहे असे प्रा राजा शिरगुप्पे यांनी सांगितले. सभेत प्रा नवनाथ शिंदे, संजय घाटगे, दशरथ घुरे, हरिबा कांबळे यांचीही भाषणे झाली. रॅलीत मुकुंद नार्वेकर, प्रकाश मोरुस्कर, संतोष सुतार, निवृत्ती फगरे, नारायण भडांगे, नारायण राणे, काशीनाथ मोरे, शिवाजी भंगूत्रे, सुशीला होरंबळे, सोनाली रायकर यासह कष्टकरी स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आभार पांडुरंग गाडे यांनी मानले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर