शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

Maratha Reservation :मराठा आरक्षणासाठी पुन्हा जोमाने लढा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 15:47 IST

Maratha Reservation Kolhapur : मराठा आरक्षणासाठी पुन्हा जोमाने लढा उभारणार. रस्त्यावर उतरून तीव्र लढा देणार, अशा विविध प्रतिक्रिया बुधवारी कोल्हापुरातील सकल मराठा समाजातील समन्वयक, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. मराठा समाजातील राज्य, जिल्हा पातळीवरील समन्वयक, शिलेदारांसमवेत चर्चा करून पुढील दिशा ठरविण्याची कार्यवाही त्यांनी सुरू केली.

ठळक मुद्देकोल्हापुरातील सकल मराठा समाजातील समन्वयकांच्या प्रतिक्रिया पुढील दिशा ठरविण्याची कार्यवाही सुरू

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी पुन्हा जोमाने लढा उभारणार. रस्त्यावर उतरून तीव्र लढा देणार, अशा विविध प्रतिक्रिया बुधवारी कोल्हापुरातील सकल मराठा समाजातील समन्वयक, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. मराठा समाजातील राज्य, जिल्हा पातळीवरील समन्वयक, शिलेदारांसमवेत चर्चा करून पुढील दिशा ठरविण्याची कार्यवाही त्यांनी सुरू केली.सर्वांनी मराठा समाजाला पाठबळ द्यावे

मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याचे मोठे दु:ख होत आहे. राज्य शासनाने मराठा समाजाला सामोरे जाऊन चर्चा करावी. सर्व राजकीय पक्षांनी एकजुटीने मराठा समाजाला आरक्षणासाठी पाठबळ द्यावे. आरक्षणासाठीच्या या पुढील लढ्याची दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी सकल मराठा समाजातील समन्वयकांशी चर्चा करण्यात येईल.-वसंतराव मुळीक,राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ.

आता, ओबीसीतून आरक्षणाची मागणी

केंद्र, राज्य सरकार आणि राजकारण्यांनी मराठा समाजाचा घात केला आहे. न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे. या व्यवस्थेने दिलेला निर्णय आम्ही मानतो. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा जोमाने लढा उभारला जाईल. तालुका, जिल्हा पातळीवर बैठका घेतल्या जातील. कोणत्याही राजकीय नेत्याच्या भडकाऊ भाषणाला बळी पडून समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य मराठा समाजातील बांधव-भगिनींनी करू नये.-दिलीप देसाई,समन्वयक, सकल मराठा समाज दसरा चौक.

मराठा समाजाने शांतपणे भूमिका घ्यावी

आम्ही पहिल्यांदाच सांगितले होते की, मराठा समाजाचे हे आरक्षण टिकणार नाही. मराठा समाजाची फसवणूक झाली आहे. आता यापुढे मराठा समाजाने शांतपणे आणि फायदा होणारी भूमिका घ्यावी. कोणत्या राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवू नये. राज्य सरकारने आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे शैक्षणिक, नोकरी आदी स्वरूपातील सर्व सवलती द्याव्यात. सारथी संस्थेला सक्षम करावे.-इंद्रजित सावंत,इतिहास संशोधक.

कायदेशीर पर्यायांचा विचार व्हावा

आरक्षण रद्द होणे हे मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्षांनी एकमेकांना दोष देणे, आरोप करण्याऐवजी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत. या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करता येते का? हे तपासून पहावे. सरकारने कायदेशीर पर्यायांचा विचार करावा. आम्ही शौर्यपीठाच्या माध्यमातून मुंबईतील उच्च न्यायालयातील वकीलांसमवेत चर्चा करणार आहोत. आरक्षण मिळविण्यासाठी आम्ही पुन्हा तीव्र लढा देणार आहोत.-प्रसाद जाधव,समन्वयक, शौर्यपीठ सकल मराठा समाज, शिवाजी चौक.

रस्त्यावर उतरून तीव्र लढा देणार

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे. योग्य पद्धतीने म्हणणे सरकारने मांडले नाही. आज राजकारण जिंकले असून मराठा समाज हरला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी समाज आता शांत बसणार नाही. रस्त्यावर उतरून तीव्र लढा दिला जाणार आहे.-सचिन तोडकर,समन्वयक, सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा.

ओबीसीमध्ये समावेश करावा

मराठा आरक्षण रद्दचा निर्णय खूप दुर्दैवी आहे. अन्य राज्यांमध्ये आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडलेली चालते. मग, महाराष्ट्रात का चालत नाही? आता राज्य सरकारने लवकर ठोस पावले उचलून मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा. मराठा समाजावर झालेला अन्याय दूर करावा.-ऋतुराज माने,निमंत्रक, मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर