शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने महाराष्ट्रात खळबळ
2
राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 
3
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
4
जितेंद्र यांनी प्रॉपर्टी मार्केटमध्ये उडवली खळबळ; जपानी कंपनीसोबत ५५९.२५ कोटी रुपयांचा करार, नक्की प्रकरण काय?
5
पगारदारांनो लक्ष द्या! तुमच्या पीएफ खात्यावर मिळतोय ७ लाखांचा मोफत विमा; असा करा क्लेम
6
नोकरी सोडून शेतीची धरली कास! १३ लाखांच्या कर्जात बुडलेला तरुण आता कमावतोय वार्षिक २ कोटी
7
राधिका आपटेने बंडच पुकारलं! कामाच्या तासांवरुन निर्मात्यांसमोर ठेवल्या अटी, म्हणाली...
8
अत्यंत हलाखीची परिस्थिती, पत्र्याचं घर अन् गंभीर आजाराचा सामना; जालन्याचा काळू डॉन म्हणाला- "दर महिन्याला रक्त बदलावं लागतं..."
9
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
10
आता चांदी ₹3 लाखच्या जवळ...! MCX वर 10800 रुपयांनी वधारला भाव; गुंतवणूकदारांना करतेय मालामाल
11
वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?
12
Thailand Train Accident: थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
13
८० वर्षांच्या डॉक्टरची १५ कोटींची फसवणूक! १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट', ७०० बँक खात्यांत पैसा
14
भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
15
एका शेअरवर ५७ रुपयांचा डिविडंड देणार TATA समूहाची 'ही' कंपनी; रेकॉर्ड डेट जवळ, तुमच्याकडे आहे का?
16
नातूच झाला काळ! स्वतःच्या हाताने संपवलं आजी-आजोबांचं आयुष्य; आजीच्या एका खुणेने पकडला गेला
17
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
18
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक स्वभावाने तीळगुळाहून गोड, पण चिडले की समोरच्यावर संक्रांत!
19
५० देशांच्या जीडीपीपेक्षा BMC ची तिजोरी मोठी; पाहा मुंबई महापालिकेच्या सत्तेचे आर्थिक गणित
20
चोराचा कारनामा! मंदिरात चोरी केली, हात जोडून माफी मागितली अन् दागिन्यांवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन योजना आम्हीच पूर्ण करणार

By admin | Updated: December 31, 2016 23:18 IST

देवेंद्र फडणवीस : अग्रणी नदी बारमाही करू; ढालगाव येथे म्हैसाळ, टेंभू योजनेतील कामांचे उद्घाटन

ढालगाव : युतीच्या काळात सुरू केलेल्या सिंचन योजना आमचेच सरकार पूर्ण करणार असून, रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.म्हैसाळ उपसा सिंचन योजना व टेंभू सिंचन प्रकल्पांतर्गत ढालगाव वितरिका, कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव सिंचन तसेच जत तालुक्यातील अंकले व खलाटी सिंचन योजना, खानापूर तालुक्यातील भूड येथील पंपगृह कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे झाले. यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले की, टेंभू-म्हैसाळ सिंचन योजनेची कामे १९९५ मध्ये भाजप-शिवसेना युतीच्या काळात सुरू झाली होती. आता ती कामे आमचेच सरकार पूर्ण करणार आहे. गेल्या पंधरा वर्षांत योजनांसाठी किती खर्च केला व योजना किती पूर्ण झाल्या, हे आपण सांगण्याची गरज नाही. त्या योजनांची चौकशी तर होईलच. हे वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यांनी सुरू केलेल्या या योजनांतील ढालगाव वितरिका, टप्पा क्र. ६ व टप्पा क्र. ६ ब तसेच यांच्यासह सहा प्रमुख कामांची सुरुवात ताकदीने केली आहे.जत तालुक्यातील ४२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सोडवू. घाटनांद्रे-तिसंगी योजनेचे काम तांत्रिक अडचणीमुळे लांबले आहे. ते येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे, पारदर्शी कारभार करणारे आहे.मराठा, धनगर आरक्षणाबाबत ते म्हणाले की, या अगोदरच्या आघाडी सरकारने आरक्षणाचे चुकीचे अहवाल केंद्र शासनाकडे पाठविले होते. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला.खासदार संजयकाका पाटील यांनी जत तालुक्याचे विभाजन, टेंभू व म्हैसाळ पाणी योजना, जत तालुक्यातील ४२ गावांचा पाणी प्रश्न याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. या सरकारने राबविलेल्या चांगल्या योजनांचे कौतुकही त्यांनी केले. आ. विलासराव जगताप यांनीही जत तालुक्याच्या समस्या सोडविण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला. चंद्रकांत हाक्के यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार पणन व वस्त्रोद्योग, पालकमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. सुरेश खाडे, अनिल बाबर, रमेश शेंडगे, पृथ्वीराज देशमुख, दीपक शिंदे-म्हैसाळकर, श्रीकांत देशमुख, सभापती वैशाली पाटील, दादासाहेब कोळेकर, अनिल शिंदे, अनिल लोंढे, मिलिंद कोरे, औदुंबर पाटील, हायूम सावनूरकर, काकासाहेब आठवले, दिलीप ठोंबरे, अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, के. डी. शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)दिलेली आश्वासनेकवठेमहांकाळ, जत, सांगोला, तासगाव, आटपाडी, खानापूर तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणू. अग्रणी नदी बारमाही करू.सूक्ष्मसिंचनाला चालना देऊन उत्पादन वाढीचा प्रयोग यशस्वी करू.सूक्षसिंचनासाठी अनुदान देणार आहे.