शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही कोर्टात गेलो प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:29 IST

उत्तूर : आम्ही न्यायालयात गेलो ते आंबेओहोळ प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी प्रकल्पाचे काम थांबवण्यासाठी नाही. आता प्रकल्पात पाणी तुंबले, आता पुनर्वसनाचे ...

उत्तूर :

आम्ही न्यायालयात गेलो ते आंबेओहोळ प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी प्रकल्पाचे काम थांबवण्यासाठी नाही. आता प्रकल्पात पाणी तुंबले, आता पुनर्वसनाचे काय, असा सवाल करीत आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांनी आंबेओहोळच्या श्रेयवादाची लढाई आणि वस्तुस्थिती यांची पत्रकार परिषदेत माहिती दिली.

२४ एप्रिल २०१७ ते २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रकल्पाच्या पुनर्वसनाच्या घडामोडींचा पत्रकार परिषदेत लेखाजोखा मांडण्यात आला.

यामध्ये १०० टक्के पुनर्वसन एकाही धरणग्रस्ताचे झालेले नाही. अर्धवट पुनर्वसन ३० धरणग्रस्तांचे झाले. ५६ प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. १५ भूमीहीनांना कोणताही मोबदला दिला नाही.

४६० स्वेच्छा पुनर्वसन खातेदारांपैकी ३७३ जणांचे स्वेच्छा पुनर्वसन झाले. ३० टक्के लोकांचे पेमेंट उचल झालेली नाही. संकलन दुरुस्तीसाठी तारीख पे तारीख दिली जाते. मात्र, संकलन दुरुस्ती झाली नाही. २८१ धरणग्रस्तांना १४१ प्लॉट लिंगनूर-कडगाव येथे उपलब्ध आहेत, त्याचेही वाटप झाले नाही. १०० टक्के पुनर्वसन कायदा डावलून प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला आहे. घळभरणी करून पाणीसाठा करणार, असे प्रकल्पग्रस्तांना सांगायला हवे होते. तसे सांगितले नाही. घळभरणीस परवानगी कुणी दिली याची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

प्रकल्पात पाणीसाठा सुरू झाल्याने श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. मात्र, पुनर्वसनाचे तीन-तेराच झाले आहे. पाणीसाठा करणार हे धरणग्रस्तांना सांगणे गरजेचे होते. आज उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. याला जबाबदार कोण, अशी विचारणा करण्यात आली आहे.

आंबेओहोळ धरणातील जलाशयाचे नाव रामकृष्ण जलाशय असे काही मंडळींनी ठेवून ग्रामविकासमंत्री यांचा सत्कार करण्यात आला. हे धरणग्रस्त आहेत का याची विचारणा करून आम्ही ‘अश्रुसागर जलाशय’ असे नामकरण करू, असा इशारा देऊन प्रकल्पस्थळावर फलकही लावण्यात आला.

पत्रकार परिषदेला सदानंद व्हनबट्टे, महादेव खाडे, सरपंच संतोष बेलवाडे, राजा देशपांडे, सचिन पावले आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे ‘अश्रुसागर जलाशय’ असा फलक लावताना धरणग्रस्त.

क्रमांक : ०५०७२०२१-गड-०९