शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एकत्रच

By admin | Updated: September 27, 2016 00:44 IST

हद्दवाढ किंवा प्राधिकरण मुद्दा गौण : ‘कोल्हापूर शहर हद्दवाढ : प्राधिकरणाची भूमिका’ परिसंवादातील सूर

कोल्हापूर : जिल्ह्याचा विकास हाच आमच्यापुढील एकमेव अजेंडा असून, जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. त्यामुळे हद्दवाढ किंवा प्राधिकरण हा मुद्दा गौण आहे. केवळ जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ, असा सूर ‘कोल्हापूर शहर हद्दवाढ : प्राधिकरणाची भूमिका’ या विषयावर महावीर महाविद्यालय भूगोल विभागाच्यावतीने सोमवारी आयोजित परिसंवादामध्ये निघाला. या परिसंवादाचे उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अ‍ॅड. के. ए. कापसे होते. आमदार क्षीरसागर म्हणाले, हद्दवाढ ही नैसर्गिक गोष्ट आहे. कारण वाढत्या शहरीकरणामुळे नागरी समस्याही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाकरिता निधी हवा. यासाठी हद्दवाढीमध्ये १८ गावांचा समावेश आवश्यक होता. त्यात हद्दवाढ नको म्हणणाऱ्यांनी निधी नाही म्हणून आमच्या गावांचा समावेश करत असल्याचा आरोप केला आहे. हा आरोप चुकीचा आहे. अमृत योजनेतून कोल्हापूर शहराला १२५ कोटी रुपयांचा निधी आला. याशिवाय रिंग रोडच्या बांधणीसाठी १०९ कोटी खर्च झाले आहेत, तर एसटीपी प्लँट, आदी विकासाची कामे झाली. एखाद्या जमिनीवर आरक्षण टाकण्याची प्रक्रिया पालिकेकडे नसून टाऊन प्लॅनिंगकडे असते, हा गैरसमज दूर व्हावा. शेतजमिनीला हात न लावता विकास होणे गरजेचे आहे. आपल्यासाठी शहर आणि ग्रामीण वेगळे नाही. आमचा लढा शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी आहे. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, ग्रामीण जनतेच्या भावना लक्षात घेऊन हद्दवाढीला विरोध केला. हद्दवाढ झाल्यानंतर विकास होईल हा समज चुकीचा आहे. आमचा दुग्ध व्यवसाय महिला पाहत आहेत. त्याची बिलेही दहा दिवसांत मिळतात. याशिवाय घरफाळा, करही कमी आहे. प्रथम महापालिका क्षेत्राचा विकास तुम्ही तुमच्या पातळीवर करा. त्यातून तुमचे भले झाले तर आम्हीही सहभागी होऊ. याशिवाय पालिकेने विकासाकरिता ४०० कोटी व १८ गावांच्या प्राधिकरणाच्या माध्यमातून ४०० कोटी असा एकूण ८०० कोटींचा विकास निधी आणू. हा निधी जिल्ह्याला उपयोगी पडेल. त्यामुळे जिल्ह्याचा विकास होऊ दे. माजी आमदार संपतबापू पाटील म्हणाले, हद्दवाढ ही ग्रामीण जनतेच्या मुळावर बसणारी आहे. त्यामुळे आमचा विरोध आहे. प्राधिकरणाच्या रूपाने १८ गावांचा विकास निश्चित होणार आहे. त्यात ग्रामपंचायतींचे अधिकार शाबूत राहणार असून लोकसंख्येची अटही केंद्र सरकारने काढली आहे. महापालिका क्षेत्राचाही विकास व्हावा व या ग्रामपंचायतींचाही विकास व्हावा. परिसंवादात माजी महापौर अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, हद्दवाढविरोधी कृती समितीचे प्रवक्ते नाथाजी पोवार, पीटर चौधरी यांनी भूमिका मांडली.यावेळी प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे, संस्था सचिव महावीर देसाई, प्रा. रामदास तुरके, रेश्मा शेळके, प्रियांका विभूते, आदी विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)————-————फोटो : २६०९२०१६-कोल-महावीर फोटोओळी : समर्थक-विरोधक प्रथमच एकत्रहद्दवाढविरोधी भूमिका घेणारे आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार संपतबापू पाटील यांच्यासह हद्दवाढीचे समर्थन करणारे राजेश क्षीरसागर, राजेश लाटकर, आदी मान्यवर प्रथमच शहरासह जिल्ह्याच्या विकासाकरिता एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे चित्र दिसले.