शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मंत्रिपदाची चर्चा आता आम्ही थांबवली

By admin | Updated: January 24, 2015 00:18 IST

खासदार शेट्टी यांचा उद्वेग : संघटना मंत्रिपदासाठी काढली का..?

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळेल की नाही यासंबंधीची चर्चा आम्ही आता थांबवली असल्याची उद्वेगजनक प्रतिक्रिया संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. पत्रकारांनी त्यांना यासंबंधी वारंवार विचारणा केल्यावर ‘मंत्रिमंडळात जायला मिळेल म्हणूनच आम्ही संघटना काढली का...?’ अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संघटनेची भाजपला चांगली मदत होऊनही सत्ता आल्यानंतर मात्र भाजपने संघटनेला ठेंगा दाखविला आहे. जिल्हा नियोजन मंडळावरही संघटनेच्या एकाही कार्यकर्त्याला भाजपने संधी दिलेली नाही. ऊसदराच्या प्रश्नांत राज्य सरकार काहीच निर्णय घ्यायला तयार नसल्याने संघटनेने गेल्या आठवड्यात पुण्यात साखर आयुक्त कार्यालयाची तोडफोड केली. त्याचा परिणाम म्हणून भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीत संघटनेच्या सदाभाऊ खोत यांचा पत्ता ‘कट’ केला. त्याअनुषंगाने प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज खासदार शेट्टी यांना पत्रकारांनी गराडा घातला परंतु ते आज बोलण्याच्या मूडमध्ये नव्हते.ते म्हणाले,‘आम्हाला मंत्रिपद मिळेल की नाही यासंबंधीची चर्चा आम्ही आता थांबवली आहे. माझ्यासह कोणताच सहकारी आता याविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. आम्ही यापुढे फक्त शेतकऱ्यांच्याच प्रश्नांसंबंधी बोलण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्तरानंतरही पुन्हा पुण्यातील आंदोलन व विधानपरिषदेची हुकलेली संधी याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले. त्यावर कॅमेऱ्यापासून बाजूला होत त्यांनी ‘मंत्रिमंडळात जाण्यासाठीच आम्ही संघटना काढली का...?’ असा प्रतिप्रश्न केला. नियोजन समितीच्या बैठकीतही मित्रपक्ष असलेले खासदार शेट्टी हे व्यासपीठाच्या एका बाजूला बसून होते. कामकाजातही त्यांनी फारसा उत्साही सहभाग दाखविला नाही. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उजव्या बाजूला ‘राष्ट्रवादी’चे खासदार धनंजय महाडिक हे बसले होते.