शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

आम्हा आंधळ्यांचा देव पाठीराखा --: तिघेही अंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:04 IST

जन्मापासूनच अंधार वाट्याला आलेल्या दोन मुलांचा सांभाळ करणाऱ्या धीरोदत्त अंध बापाची ही करूण कहाणी आहे. जो आयुष्यात कधीच खचला नाही, पिचला नाही. वाघासारखी दोन लेकरं नियतीच्या खेळाची शिकार बनलीत म्हणून तिला दोष न देता कणखरपणे जगत राहिला.

ठळक मुद्देभाचरवाडी येथील बापलेकांची करूण कहाणी

विक्रम पाटील ।करंजफेण : भेटला ना कुणी सोबती, ना सखा, आम्हा आंधळ्यांचा देव पाठीराखा, डोळ्यांचा प्रवास आजन्म तमाचा, तरी रोज दिसे कवडसा तेजाचा, येथे वेळ कुणा कवटाळण्या दु:खा.... एका कवीने लिहिलेल्या या ओळी पन्हाळा तालुक्यातील कोतोली पैकी भाचरवाडी येथील पांडुरंग धोंडिराम रेडेकर (वय ९०) यांच्या अंध कुटुंबाला तंतोतंत लागू पडत आहेत.

जन्मापासूनच अंधार वाट्याला आलेल्या दोन मुलांचा सांभाळ करणाऱ्या धीरोदत्त अंध बापाची ही करूण कहाणी आहे. जो आयुष्यात कधीच खचला नाही, पिचला नाही. वाघासारखी दोन लेकरं नियतीच्या खेळाची शिकार बनलीत म्हणून तिला दोष न देता कणखरपणे जगत राहिला.

वाढत्या वयानुसार दृष्टीहीन झालेल्या पांडुरंग रेडेकर यांना चार अपत्ये. त्यातील दोन मुलींची लग्न होऊन त्या माहेरी गेल्या. परंतु दोन मुले जन्मत:च अंध असल्याने ती अविवाहित राहिली. पांडुरंग यांनी अंगात बळ असेपर्यंत पत्नीच्या साथीने काबाडकष्ट करून अंध मुलांचा सांभाळ केला, पण दहा वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले अन् ते एकटे पडले. सध्या वयामुळे ते दृष्टीहीन झाल्याने अंथरूणावर पडून आहेत. त्यामुळे जन्मजात अंध असलेले व पूर्णपणे त्यांच्यावरच अवलंबून असलेले धनाजी (४०) व जगन्नाथ (५०) हे दोघे बंधू हवालदिल झालेत. पण येणाºया संकटाशी सामना करत जीवन जगायलाच हवं या सकारात्मक मानसिकतेतून ते जगण्याशी लढा देत आहेत. पण त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी कोणतेही साधन नसल्याने त्यांची जगण्याची लढाई खडतर बनली आहे.

धनाजी हा दररोजच्या वाटेवरील शेतातील जमेल तेवढी वैरण आणून गाईचा सांभाळ करत आहे. गोवºया स्वत: थापटून सरपण तयार करत स्वयंपाक बनवून नियतीच्या खेळाला न जुमानता जगण्याचा प्रयत्न करत आहे. शेजार मंडळी माणुसकीच्या नात्याने मदत करून त्यांना आधार देत आहेत. दृष्टी नसल्याने गाव व माणसं न पाहिलेल्या या कुटुंबाने अनेक वर्षे कोणताही सणवार साजरा केलेला नाही. संकटाच्या अशा भयानक परिस्थीतीत देखील वडिलांची प्रामाणिकपणे सेवा ते करत आहेत. 

एकाच घरात तिघे अंध असल्यामुळे कुटुंबाला जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यांना शासनाच्या योजनांचा फायदा मिळत नसून समाजातील दानशूर मंडळींनी अशा व्यक्तींना मदत करून बापलेकांची आधाराची काठी होणे गरजेचे आहे. - राहुल रेडेकर, ग्रामस्थ

टॅग्स :kolhapurकोल्हापूर