शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

आम्हा आंधळ्यांचा देव पाठीराखा --: तिघेही अंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:04 IST

जन्मापासूनच अंधार वाट्याला आलेल्या दोन मुलांचा सांभाळ करणाऱ्या धीरोदत्त अंध बापाची ही करूण कहाणी आहे. जो आयुष्यात कधीच खचला नाही, पिचला नाही. वाघासारखी दोन लेकरं नियतीच्या खेळाची शिकार बनलीत म्हणून तिला दोष न देता कणखरपणे जगत राहिला.

ठळक मुद्देभाचरवाडी येथील बापलेकांची करूण कहाणी

विक्रम पाटील ।करंजफेण : भेटला ना कुणी सोबती, ना सखा, आम्हा आंधळ्यांचा देव पाठीराखा, डोळ्यांचा प्रवास आजन्म तमाचा, तरी रोज दिसे कवडसा तेजाचा, येथे वेळ कुणा कवटाळण्या दु:खा.... एका कवीने लिहिलेल्या या ओळी पन्हाळा तालुक्यातील कोतोली पैकी भाचरवाडी येथील पांडुरंग धोंडिराम रेडेकर (वय ९०) यांच्या अंध कुटुंबाला तंतोतंत लागू पडत आहेत.

जन्मापासूनच अंधार वाट्याला आलेल्या दोन मुलांचा सांभाळ करणाऱ्या धीरोदत्त अंध बापाची ही करूण कहाणी आहे. जो आयुष्यात कधीच खचला नाही, पिचला नाही. वाघासारखी दोन लेकरं नियतीच्या खेळाची शिकार बनलीत म्हणून तिला दोष न देता कणखरपणे जगत राहिला.

वाढत्या वयानुसार दृष्टीहीन झालेल्या पांडुरंग रेडेकर यांना चार अपत्ये. त्यातील दोन मुलींची लग्न होऊन त्या माहेरी गेल्या. परंतु दोन मुले जन्मत:च अंध असल्याने ती अविवाहित राहिली. पांडुरंग यांनी अंगात बळ असेपर्यंत पत्नीच्या साथीने काबाडकष्ट करून अंध मुलांचा सांभाळ केला, पण दहा वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले अन् ते एकटे पडले. सध्या वयामुळे ते दृष्टीहीन झाल्याने अंथरूणावर पडून आहेत. त्यामुळे जन्मजात अंध असलेले व पूर्णपणे त्यांच्यावरच अवलंबून असलेले धनाजी (४०) व जगन्नाथ (५०) हे दोघे बंधू हवालदिल झालेत. पण येणाºया संकटाशी सामना करत जीवन जगायलाच हवं या सकारात्मक मानसिकतेतून ते जगण्याशी लढा देत आहेत. पण त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी कोणतेही साधन नसल्याने त्यांची जगण्याची लढाई खडतर बनली आहे.

धनाजी हा दररोजच्या वाटेवरील शेतातील जमेल तेवढी वैरण आणून गाईचा सांभाळ करत आहे. गोवºया स्वत: थापटून सरपण तयार करत स्वयंपाक बनवून नियतीच्या खेळाला न जुमानता जगण्याचा प्रयत्न करत आहे. शेजार मंडळी माणुसकीच्या नात्याने मदत करून त्यांना आधार देत आहेत. दृष्टी नसल्याने गाव व माणसं न पाहिलेल्या या कुटुंबाने अनेक वर्षे कोणताही सणवार साजरा केलेला नाही. संकटाच्या अशा भयानक परिस्थीतीत देखील वडिलांची प्रामाणिकपणे सेवा ते करत आहेत. 

एकाच घरात तिघे अंध असल्यामुळे कुटुंबाला जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यांना शासनाच्या योजनांचा फायदा मिळत नसून समाजातील दानशूर मंडळींनी अशा व्यक्तींना मदत करून बापलेकांची आधाराची काठी होणे गरजेचे आहे. - राहुल रेडेकर, ग्रामस्थ

टॅग्स :kolhapurकोल्हापूर