शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आम्हा आंधळ्यांचा देव पाठीराखा --: तिघेही अंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:04 IST

जन्मापासूनच अंधार वाट्याला आलेल्या दोन मुलांचा सांभाळ करणाऱ्या धीरोदत्त अंध बापाची ही करूण कहाणी आहे. जो आयुष्यात कधीच खचला नाही, पिचला नाही. वाघासारखी दोन लेकरं नियतीच्या खेळाची शिकार बनलीत म्हणून तिला दोष न देता कणखरपणे जगत राहिला.

ठळक मुद्देभाचरवाडी येथील बापलेकांची करूण कहाणी

विक्रम पाटील ।करंजफेण : भेटला ना कुणी सोबती, ना सखा, आम्हा आंधळ्यांचा देव पाठीराखा, डोळ्यांचा प्रवास आजन्म तमाचा, तरी रोज दिसे कवडसा तेजाचा, येथे वेळ कुणा कवटाळण्या दु:खा.... एका कवीने लिहिलेल्या या ओळी पन्हाळा तालुक्यातील कोतोली पैकी भाचरवाडी येथील पांडुरंग धोंडिराम रेडेकर (वय ९०) यांच्या अंध कुटुंबाला तंतोतंत लागू पडत आहेत.

जन्मापासूनच अंधार वाट्याला आलेल्या दोन मुलांचा सांभाळ करणाऱ्या धीरोदत्त अंध बापाची ही करूण कहाणी आहे. जो आयुष्यात कधीच खचला नाही, पिचला नाही. वाघासारखी दोन लेकरं नियतीच्या खेळाची शिकार बनलीत म्हणून तिला दोष न देता कणखरपणे जगत राहिला.

वाढत्या वयानुसार दृष्टीहीन झालेल्या पांडुरंग रेडेकर यांना चार अपत्ये. त्यातील दोन मुलींची लग्न होऊन त्या माहेरी गेल्या. परंतु दोन मुले जन्मत:च अंध असल्याने ती अविवाहित राहिली. पांडुरंग यांनी अंगात बळ असेपर्यंत पत्नीच्या साथीने काबाडकष्ट करून अंध मुलांचा सांभाळ केला, पण दहा वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले अन् ते एकटे पडले. सध्या वयामुळे ते दृष्टीहीन झाल्याने अंथरूणावर पडून आहेत. त्यामुळे जन्मजात अंध असलेले व पूर्णपणे त्यांच्यावरच अवलंबून असलेले धनाजी (४०) व जगन्नाथ (५०) हे दोघे बंधू हवालदिल झालेत. पण येणाºया संकटाशी सामना करत जीवन जगायलाच हवं या सकारात्मक मानसिकतेतून ते जगण्याशी लढा देत आहेत. पण त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी कोणतेही साधन नसल्याने त्यांची जगण्याची लढाई खडतर बनली आहे.

धनाजी हा दररोजच्या वाटेवरील शेतातील जमेल तेवढी वैरण आणून गाईचा सांभाळ करत आहे. गोवºया स्वत: थापटून सरपण तयार करत स्वयंपाक बनवून नियतीच्या खेळाला न जुमानता जगण्याचा प्रयत्न करत आहे. शेजार मंडळी माणुसकीच्या नात्याने मदत करून त्यांना आधार देत आहेत. दृष्टी नसल्याने गाव व माणसं न पाहिलेल्या या कुटुंबाने अनेक वर्षे कोणताही सणवार साजरा केलेला नाही. संकटाच्या अशा भयानक परिस्थीतीत देखील वडिलांची प्रामाणिकपणे सेवा ते करत आहेत. 

एकाच घरात तिघे अंध असल्यामुळे कुटुंबाला जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यांना शासनाच्या योजनांचा फायदा मिळत नसून समाजातील दानशूर मंडळींनी अशा व्यक्तींना मदत करून बापलेकांची आधाराची काठी होणे गरजेचे आहे. - राहुल रेडेकर, ग्रामस्थ

टॅग्स :kolhapurकोल्हापूर