शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही माणसांत देव पाहिला; जवानांच्या पाया पडणाऱ्या महिलेकडून आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 19:59 IST

सध्या सोशल मीडियावर कोल्हापुरातील पुरातून सैन्यदलातील जवानांनी होडीतून सुखरूपपणे बाहेर काढताना त्यांच्या पाया पडणाऱ्या महिलेच्या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.

- प्रदीप शिंदे कोल्हापूर : तुला पुजलं राऊळात... तुला पाहिलं दगडात... दगडाचा तू... दगडाचं काळीज... नदीआई कोपली... बा ज्योतिबा रुसला... माझ्या गं मदतीला देवमाणूस धावला... देव माणसातच दडलाय... वर्दीतला देवदूत जीवनदान देऊन गेला... असाच अनुभव आंबेवाडी येथील सुजता आंबी यांना आला.

 सध्या सोशल मीडियावर कोल्हापुरातील पुरातून सैन्यदलातील जवानांनी होडीतून सुखरूपपणे बाहेर काढताना त्यांच्या पाया पडणाऱ्या महिलेच्या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. या सुजाता मिलिंद आंबी यांच्याकडून ‘लोकमत’ने सर्व परिस्थिती जाणून घेतली. 

आंबेवाडी येथील आंबी गल्ली येथील सुजाता आंबी यांचे एकत्रित कुटुंब आहे. घरात एकूण १६ सदस्य आहेत. जनार्दन आंबी हे कुटुंबप्रमुख. त्यांना चार मुले मदन, मोहन, मिलिंद. हे शेती व्यवसाय व गुऱ्हाळघर पाहतात. सर्वांत धाकटे आहेत ते मुकुंद आंबी हे वीज कंपनीत उपकार्यकारी अभियंता आहेत. 

सोमवारी (दि. ५) पाऊस सुरू झाल्यानंतर आंबी यांनी नवीन बांधलेल्या जवळच्या तीनमजली घरामध्ये स्थलांतर केले. पावसामुळे परिस्थिती बिकट झाली. प्रथम चिखली गाव पाण्यात गेले. गावातील लोकांनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी दुभती जनावरे पाण्यात सोडली. पुराचे पाणी वाढल्याने आमचे घर गावांतील अन्य लोकांसाठी खुले केले. मंगळवारी गावाला पाण्याने वेढा घातल्याने सुमारे २०० नागरिक यांच्या घरामध्ये राहण्यास होते. घर उंचावर असल्याने घरामध्ये पाणी येत नव्हते. मात्र वीज नाही, मोबाईल चार्जिंग नाही, एकही रस्ता वाहतुकीसाठी खुला नाही; त्यामुळे बाहेरगावांतील लोकांचा संपर्क तुटला. बुधवार (दि. ७) पर्यंत तिथेच राहिलो. घरामध्ये २०० माणसांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. मात्र तेही अन्नधान्य संपू लागले. मदतीसाठी संपर्क करण्यात येत होता; मात्र संपर्क होत नव्हता. यामध्ये पाणी वाढत असताना सांगलीतील ब्रह्मनाळ  येथे पूरग्रस्तांना वाचविताना बोट बुटून लोकांना जलसमाधी मिळाली, ही बातमी कानांवर पडल्याने पायांखालची जमीनच सरकली. 

 गुरुवारी दुपारी गावामध्ये सैन्यदलाच्या बोटी येऊ लागल्या. आम्ही प्रथम गावातील महिलांना व लहान मुलांना बोटीतून पुढे पाठविले. शेवटी आम्ही कुटुंबातील सगळे सदस्य एका बोटीत बसलो. बोटीत बसताना ब्रह्मनाळ येथील घटना आठवल्याने धाडस होत नव्हते; कारण घरातील लहान मुले, महिला होत्या. सैन्यदलातील लोकांनी ‘आम्ही सोबत आहोत; काळजी करू नका,’ असे सांगून मनोबल वाढविले. पुढे जातो तर एक साप आडवा आला, आता साप बोटीत शिरला तर मोठा अनर्थ होईल, असे वाटत असतानाच एका जवानाने वल्ह्याच्या साहाय्याने साप दूर फेकला आणि समोरचे संकट टळले. अजून काठ दूर होता. धाकधुक वाढलीच होती. तशीच दहा मिनिटे गेली तरी वाट सरत नव्हती. तेवढ्यात काठ आणि  माणसे दिसू लागल्याने जिवात जीव आला. 

काठावर बोट येताच आमच्यासोबत माणसांच्या रूपाने देवच सोबत होते ही भावना डोळ्यांसमोर आल्याने दोघा जवानांचे पाय आपोआपच धरल्याचा अनुभव सुजाता आंबी यांनी सांगितला.  कोल्हापुरातील संभाजीनगर येथील निकम पार्क येथे हे कुटुंबीय स्थलांतरित झाले आहे. या ठिकाणी आंबी कुटुंबीयांना भेटण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर