शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

Sammed Shikharji: आम्ही अहिंसक जरूर आहोत, भित्रे नाही; लक्ष्मीसेन महास्वामींनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 13:12 IST

केंद्र सरकारने शिखरजीला शाश्वत जैन तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर केल्याशिवाय मागे हटणार नाही

कोल्हापूर : अनादी कालापासून सिद्धभूमी असलेल्या सम्मेद शिखरजीवर पर्यटन सुरू झाले, तर पवित्रता नष्ट होणार आहे. भगवान महावीरांनी अहिंसा, जगा आणि जगू द्या, हे तत्त्वज्ञान जगाला दिले. आम्ही अहिंसक आहोत, पण भित्रे नाही. आमच्या तीर्थक्षेत्रासाठी आज जैन समाज रस्त्यावर उतरला आहे. तुम्ही आमच्या हृदयावर घाव घातला आहे, आमच्या संयमाचा बांध फुटू देऊ नका, वेळ पडली, तर दिल्लीला धडक देऊ, पण केंद्र सरकारने शिखरजीला शाश्वत जैन तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी व जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीं यांनी मंगळवारी सरकारला दिला. भगवान महावीर दीक्षा घेण्यापूर्वी क्षत्रिय होते, हे जैन समाजाने व सरकारनेही ध्यानात घ्यावे, असेही यावेळी ठणकावून सांगण्यात आले.सम्मेद शिखरजीला दिलेला पर्यटन स्थळाचा दर्जा मागे घ्यावा, या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी व जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे, राजू शेट्टी, माजी आमदार सुजित मिणचेकर, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट, संजय शेटे, अशोकराव माने, राजू लाटकर उपस्थित होते.लक्ष्मीसेन महास्वामी म्हणाले, अनेक लोक म्हणत आहेत पर्यटनस्थळाचा दर्जा दिला तर बिघडलं कुठं, देशाची प्रगती होईल. आमचा प्रगतीला अडथळा नाही. पर्यटनाच्या नावाखाली त्या सिद्धभूमीवर मत्स्यपालन, कुक्कुटपालन, बार, रेस्टॉरंट होणार असून, त्यामुळे पावित्र्य नष्ट होणार आहे. गिरनार, पालितानामध्ये सध्या हेच सुरू आहे, अशी अवस्था आम्हाला सम्मेद शिखरजीची होऊ द्यायची नाही. जैन समाज अहिंसेने, संयमाने वागणारा आहे. यापूर्वीही ब्रिटिशांनी येथे पर्यटन सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी समाजाने लढा देऊन ब्रिटिश व्हाइसरॉयला हा निर्णय मागे घ्यायला लावला.नांदणीचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी म्हणाले, सम्मेद शिखरजी आमचे हृदय आहे, प्रत्येक जैन श्राव-श्राविकांच्या हृदयात तुम्हाला शिखरजी दिसेल. आम्ही अहिंसक आहोत, भित्रे नाही. या पवित्रस्थानी आम्ही दारू, मांस, मच्छी चालू देणार नाही. विना चप्पल आज रस्त्यावरून मोर्चात चालताना माझे फक्त पायच तापले नाहीत, तर मस्तकही तापले आहे. देशभरातून जैन समाजाचा मोर्चा निघत असताना केंद्र व झारखंड सरकार गप्प का आहे? आम्ही फक्त रस्त्यावर येणार नाही, तर दिल्लीला धडक मारू.भट्टारक पट्टाचार्य महास्वामी म्हणाले, देशात जैन समाज अल्पसंख्यांक असला, तरी २४ टक्के कर आम्ही भरतो. आता फक्त सम्मेद शिखरजीचा विषय आला आहे, पण यासोबतच गिरनार, पालीताना, शत्रुंजय ही सगळी तीर्थक्षेत्रे आम्ही मिळवू. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर