शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सापडलेले बाळ कुणीही नेतो म्हणणे बेकायदेशीर; दत्तक प्रक्रिया असते कशी.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:44 IST

ती न केल्यास होतो गुन्हा दाखल

कोल्हापूर : एखादे अनाथ बाळ सापडल्यानंतर आम्ही पालकत्व स्वीकारतो, म्हणून बाळाला परस्पर घरी नेणे हा कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे बाळ सापडले की सांभाळण्याचा माेह टाळून त्याची माहिती सर्वात आधी पोलिसांना द्या अन्यथा गुन्हा दाखल होण्याचा धोका आहे. बालकल्याण समितीच्या नियमानुसार बाळाच्या मुक्ततेच्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर ते दत्तक दिले जाते.हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे गुरुवारी स्त्री अर्भक सापडल्यानंतर मुंगुरवाडीतील दाम्पत्याने चांगुलपणाच्या भावनेने बाळाचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी दाखवली. मात्र, एखादे बाळ सापडले की ने घरी असे होत नाही. त्याबद्दलची साक्षरता समाजात अजूनही नाही. कोणत्याही बाळाला कायदेशीररीत्या दत्तक घ्यावे लागते. त्यासाठी दाम्पत्याला केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागते. त्यांचे चारित्र्य पडताळणीपासून ते संपत्तीपर्यंतची तपासणी केली जाते. दाम्पत्य बाळ सांभाळू शकते, याची खात्री पटल्यावर त्यांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये जाते. देशभरातील जे बाळ दत्तक प्रक्रियेसाठी मुक्त झालेले असते, ते बाळ दिले जाते.

जिजा बालकल्याणमध्ये दाखल

हलकर्णी येथे गुरुवारी सापडलेले स्त्री जातीचे अर्भक तातडीने मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलमध्ये दाखल करण्यात आले. संस्थेने बाळाचे जिजा असे नामकरण केले आहे. जिजाला शुक्रवारी पोलिसांच्या अहवालाने बालकल्याण समितीसमोर सादर करण्यात आले. त्यानंतर रितसर बाळाला शिशुगृहात दाखल केले जाईल.

अशी असते दत्तक प्रक्रिया

  • बाळ ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडते तेथील पोलिसांकडून बाळाला बालकल्याण समितीकडे सादर केले जाते.
  • कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर समितीकडून बाळाच्या पालकांचा शोध घेतला जातो. तशी जाहिरात दिली जाते.
  • प्रसिद्धीनंतर एक महिन्याच्या आत बाळाची आई, वडील किंवा नातेवाइकांनी संपर्क साधला नाही, तर बाळाला दत्तक प्रक्रियेसाठी मुक्त केले जाते.
  • बाळाची नोंद शासनाच्या कारा पोर्टलवर केली जाते.
  • याच पोर्टलवर वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या पालकांना बाळ दत्तक दिले जाते.
  • देशभरातील कोणत्याही शिशुगृहातील बाळ दत्तक म्हणून दिले जाते. त्यामुळे कोल्हापुरात सापडलेले बाळ कोल्हापुरातल्याच दाम्पत्याला दिले जाते असे नाही.

बाळ सापडले की, पोलिसांना न कळवता घरी नेणे कायद्याने गुन्हा आहे. बाळाला संस्थेत दाखल करून घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया केली जाते. बाळाची वैद्यकीय तपासणी होते. त्यानंतर ९० दिवसांमध्ये दत्तक प्रक्रिया केली जाते.  - पद्मजा गारे सदस्य (बालकल्याण समिती), कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर