शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे पाणी शेतात

By admin | Updated: November 27, 2014 00:49 IST

शेतकऱ्यांतून तीव्र संताप : गलथानपणामुळे लाखोंचे नुकसान

कोल्हापूर : पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यास अपयशी ठरल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेला दोन वेळा बॅँक गॅरंटीच्या जप्तीची नामुष्की पत्करावी लागली आहे. तरीही कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) सुरू करण्यात अपयश आले आहे. मागील आठवड्यात जयंती नाल्यातून पाणी थेट नदीत पाणी सोडल्यानंतर आता आडमार्गाने म्हणजेच प्रक्रिया केंद्राच्या पूर्वेकडील शेतातून पाणी नदीत सोडण्याचा उद्योग सुरू आहे. ऊसतोडणी तोंडावर आहे, लागणीचे दिवस आहेत, यातच शेतात गुडघाभर पाणी साचल्याने शेतकऱ्यांतून संतापाची लाट उसळली.न्यायालयाच्या दणक्यानंतर ३१ जानेवारी २०१५ पर्यंत २४ एमएलडीच्या प्रक्रियेच्या क्षमतेने सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यासाठी महानगरपालिकेची धावाधाव व्यर्थ ठरत आहे. एसटीपी सुरू होण्यास विलंब होऊ लागल्याने जयंती नाल्यातून दररोज ४६ एमएलडी सांडपाणी थेट नदीत सोडून दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने फौजदारीची नोटीस बजावल्यानंतर तत्काळ पाणी सोडणे बंद केले. इतक्या जलद नदीत मिसळणारे सांडपाणी बंद झाल्याने पर्यावरण तज्ज्ञांनाही धक्का बसला.मात्र, जयंती नाल्यातील पाणी पूर्ण क्षमतेने उपसा करून या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने केलेली चालूगिरी आता उघड झाली. नाल्यातून उपसा केलेले पाणी झूम प्रकल्पाजवळील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेले. मात्र, प्रक्रिया व त्यानंतर विल्हेवाटची सक्षम यंत्रणा नसल्याने प्रकल्पाशेजारील पाणंदीतून व शेतातून पाणी सोडण्याचा उद्योग महापालिकेतर्फे सुरू आहे.हे पाणी तत्काळ न थांबविल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. १महानगरपालिकेच्या सदोष यंत्रणेमुळे या परिसरातील शेतात दूषित पाणी येण्याचे प्रकार वारंवार घडतात. दूषित पाण्यामुळे येथील जमिनीचा पोतही बिघडू लागला आहे. या शेतातील उसाचा व गुळाचा स्तरही खालावत असल्याने दर मिळत नाही. महापालिकेच्या गलथानपणामुळे शेतकऱ्यांचे दीर्घकालीन नुकसान होत आहे.२शेतातील सर्व कामे या दूषित पाण्यामुळे आता लांबणीवर पडणार आहेत. तक्रार करूनही दाद दिली जात नाही. महापालिकेने योग्य बंदोबस्त करावा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे शेतकरी प्रभाकर मोरे यांनी सांगितले.