शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे पाणी शेतात

By admin | Updated: November 27, 2014 00:49 IST

शेतकऱ्यांतून तीव्र संताप : गलथानपणामुळे लाखोंचे नुकसान

कोल्हापूर : पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यास अपयशी ठरल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेला दोन वेळा बॅँक गॅरंटीच्या जप्तीची नामुष्की पत्करावी लागली आहे. तरीही कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) सुरू करण्यात अपयश आले आहे. मागील आठवड्यात जयंती नाल्यातून पाणी थेट नदीत पाणी सोडल्यानंतर आता आडमार्गाने म्हणजेच प्रक्रिया केंद्राच्या पूर्वेकडील शेतातून पाणी नदीत सोडण्याचा उद्योग सुरू आहे. ऊसतोडणी तोंडावर आहे, लागणीचे दिवस आहेत, यातच शेतात गुडघाभर पाणी साचल्याने शेतकऱ्यांतून संतापाची लाट उसळली.न्यायालयाच्या दणक्यानंतर ३१ जानेवारी २०१५ पर्यंत २४ एमएलडीच्या प्रक्रियेच्या क्षमतेने सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यासाठी महानगरपालिकेची धावाधाव व्यर्थ ठरत आहे. एसटीपी सुरू होण्यास विलंब होऊ लागल्याने जयंती नाल्यातून दररोज ४६ एमएलडी सांडपाणी थेट नदीत सोडून दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने फौजदारीची नोटीस बजावल्यानंतर तत्काळ पाणी सोडणे बंद केले. इतक्या जलद नदीत मिसळणारे सांडपाणी बंद झाल्याने पर्यावरण तज्ज्ञांनाही धक्का बसला.मात्र, जयंती नाल्यातील पाणी पूर्ण क्षमतेने उपसा करून या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने केलेली चालूगिरी आता उघड झाली. नाल्यातून उपसा केलेले पाणी झूम प्रकल्पाजवळील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेले. मात्र, प्रक्रिया व त्यानंतर विल्हेवाटची सक्षम यंत्रणा नसल्याने प्रकल्पाशेजारील पाणंदीतून व शेतातून पाणी सोडण्याचा उद्योग महापालिकेतर्फे सुरू आहे.हे पाणी तत्काळ न थांबविल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. १महानगरपालिकेच्या सदोष यंत्रणेमुळे या परिसरातील शेतात दूषित पाणी येण्याचे प्रकार वारंवार घडतात. दूषित पाण्यामुळे येथील जमिनीचा पोतही बिघडू लागला आहे. या शेतातील उसाचा व गुळाचा स्तरही खालावत असल्याने दर मिळत नाही. महापालिकेच्या गलथानपणामुळे शेतकऱ्यांचे दीर्घकालीन नुकसान होत आहे.२शेतातील सर्व कामे या दूषित पाण्यामुळे आता लांबणीवर पडणार आहेत. तक्रार करूनही दाद दिली जात नाही. महापालिकेने योग्य बंदोबस्त करावा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे शेतकरी प्रभाकर मोरे यांनी सांगितले.