शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे पाणी शेतात

By admin | Updated: November 27, 2014 00:49 IST

शेतकऱ्यांतून तीव्र संताप : गलथानपणामुळे लाखोंचे नुकसान

कोल्हापूर : पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यास अपयशी ठरल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेला दोन वेळा बॅँक गॅरंटीच्या जप्तीची नामुष्की पत्करावी लागली आहे. तरीही कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) सुरू करण्यात अपयश आले आहे. मागील आठवड्यात जयंती नाल्यातून पाणी थेट नदीत पाणी सोडल्यानंतर आता आडमार्गाने म्हणजेच प्रक्रिया केंद्राच्या पूर्वेकडील शेतातून पाणी नदीत सोडण्याचा उद्योग सुरू आहे. ऊसतोडणी तोंडावर आहे, लागणीचे दिवस आहेत, यातच शेतात गुडघाभर पाणी साचल्याने शेतकऱ्यांतून संतापाची लाट उसळली.न्यायालयाच्या दणक्यानंतर ३१ जानेवारी २०१५ पर्यंत २४ एमएलडीच्या प्रक्रियेच्या क्षमतेने सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यासाठी महानगरपालिकेची धावाधाव व्यर्थ ठरत आहे. एसटीपी सुरू होण्यास विलंब होऊ लागल्याने जयंती नाल्यातून दररोज ४६ एमएलडी सांडपाणी थेट नदीत सोडून दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने फौजदारीची नोटीस बजावल्यानंतर तत्काळ पाणी सोडणे बंद केले. इतक्या जलद नदीत मिसळणारे सांडपाणी बंद झाल्याने पर्यावरण तज्ज्ञांनाही धक्का बसला.मात्र, जयंती नाल्यातील पाणी पूर्ण क्षमतेने उपसा करून या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने केलेली चालूगिरी आता उघड झाली. नाल्यातून उपसा केलेले पाणी झूम प्रकल्पाजवळील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेले. मात्र, प्रक्रिया व त्यानंतर विल्हेवाटची सक्षम यंत्रणा नसल्याने प्रकल्पाशेजारील पाणंदीतून व शेतातून पाणी सोडण्याचा उद्योग महापालिकेतर्फे सुरू आहे.हे पाणी तत्काळ न थांबविल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. १महानगरपालिकेच्या सदोष यंत्रणेमुळे या परिसरातील शेतात दूषित पाणी येण्याचे प्रकार वारंवार घडतात. दूषित पाण्यामुळे येथील जमिनीचा पोतही बिघडू लागला आहे. या शेतातील उसाचा व गुळाचा स्तरही खालावत असल्याने दर मिळत नाही. महापालिकेच्या गलथानपणामुळे शेतकऱ्यांचे दीर्घकालीन नुकसान होत आहे.२शेतातील सर्व कामे या दूषित पाण्यामुळे आता लांबणीवर पडणार आहेत. तक्रार करूनही दाद दिली जात नाही. महापालिकेने योग्य बंदोबस्त करावा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे शेतकरी प्रभाकर मोरे यांनी सांगितले.