शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
3
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
4
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
5
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
6
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
7
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
8
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
9
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

‘चिकोत्रा’साठी जलतृप्ती लोकलढा : सर्वच ३५ गावांतून प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:48 IST

म्हाकवे : चिकोत्रा खोऱ्यातील गंभीर बनलेल्या पाणीप्रश्नामुळे व्यथित झालेल्या किसान सभेने चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी प्रशासनावर दबाव गट निर्माण करण्याचा निर्धार केला आहे.

ठळक मुद्देजलसमृद्धीसाठी एकसंध राहण्यासाठी गट-तट बाजूला ठेऊन ग्रामस्थांची साद

म्हाकवे : चिकोत्रा खोऱ्यातील गंभीर बनलेल्या पाणीप्रश्नामुळे व्यथित झालेल्या किसान सभेने चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी प्रशासनावर दबाव गट निर्माण करण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी या खोºयातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन लोकलढा उभारण्यासाठी हाक दिली आहे. तर, राजकीय बॅनर, पक्षाचा झेंडा खाली ठेवून चिकोत्रातील जलसमृद्धीसाठी एकसंध राहण्यासाठी येथील ग्रामस्थांनी साद घातली आहे. त्यामुळे तब्बल २२ वर्षांपासून पाण्याचे दुर्भिक्ष्य असतानाही असंघटितपणामुळे लोकचळवळ उभारू शकलेली नव्हती. पहिल्यांदाच चिकोत्रा जलतृप्ती लोकलढा उभारला जातोय.

१९९६ मध्ये चिकोत्रा खोऱ्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहून प्रशासनाने कागल तालुक्याच्या दक्षिणेकडे आजरा तालुक्याच्या हद्दीत झुलपेवाडी येथे चिकोत्रा (झुलपेवाडी) धरणाची उभारणी केली. मात्र, अत्यल्प पाणलोट क्षेत्रामुळे हे धरण अतिवृष्टीची दोन वर्षे वगळता पूर्ण क्षमतेने भरतच नाही. परिणामी, ऐन उन्हाळ्यात येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण ठरलेलीच असते.धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी राजकीय पातळीवर विचारविनिमय आणि प्रशासनाने प्रयत्न केलेच नाहीत, असे नाही. परंतु, हे प्रयत्न अपुरे ठरले आहेत. या चिकोत्रा खोऱ्यात आजरा, भुदरगडसह कागलमधील ३५ गावांचा समावेश आहे. प्रत्येक गावात राजकीय गटतटासह अनेक मंडळे कार्यरत आहेत. परंतु, येथील जनतेला भेडसावणाºया पाणीप्रश्नाबाबत एकदाही व्यापक जनआंदोलन उभारले गेले नाही. या धरणाची क्षमता अवघी दीड टीएमसी इतकीच आहे. जर, हे पूर्ण क्षमतेने भरले तर ३५ गावांच्या पिण्यासह ५ हजार ६२० एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. परंतु, दुर्दैव म्हणजे हे धरण भरतच नाही. यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. यासाठी लोकचळवळीचा लढा तीव्र करून प्रशासनावर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे.गावकऱ्यांची अशीही कृतज्ञता...चिकोत्रा खोºयातील पाणीप्रश्नाबाबत किसान सभेने पुकारलेल्या लोकलढ्याला सर्वच ३५ ग्रामपंचायत प्रशासनाने प्रतिसाद दिला आहे. किसान सभेचे कार्यकर्ते यासाठी जंग-जंग पछाडत आहेत. पदरमोड करून प्रबोधन करणाºया या कार्यकर्त्यांचे गावागावांत स्वागत होत आहे. काही गावांत त्यांचे चहापान, तर काही गावकरी त्यांच्या माध्यानभोजनाची व्यवस्था करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहेत.असे होणार ठरावहेळ्याचा देव, भावेश्वरी मंदिर परिसर, आरळगुंडी, म्हातारीचे पठार, शिवारबा पठार येथून वाया जाणारे पाणी चिकोत्रा धरणात वळवणे तसेच, नागणवाडी धरणग्रस्तांचे पुनर्वसन करून हे धरण तत्काळ पूर्ण करावे या मागण्या १ मेच्या चिकोत्रा खोºयातील ३५ गावांतील ग्रामसभेत करून त्याचे ठराव किसान सभेकडे एकत्रित करण्यात येणार आहेत. तर किसान सभा हे ठराव जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग, तसेच पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांना देऊन पाठपुरावा करणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरण