शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

‘चिकोत्रा’साठी जलतृप्ती लोकलढा : सर्वच ३५ गावांतून प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:48 IST

म्हाकवे : चिकोत्रा खोऱ्यातील गंभीर बनलेल्या पाणीप्रश्नामुळे व्यथित झालेल्या किसान सभेने चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी प्रशासनावर दबाव गट निर्माण करण्याचा निर्धार केला आहे.

ठळक मुद्देजलसमृद्धीसाठी एकसंध राहण्यासाठी गट-तट बाजूला ठेऊन ग्रामस्थांची साद

म्हाकवे : चिकोत्रा खोऱ्यातील गंभीर बनलेल्या पाणीप्रश्नामुळे व्यथित झालेल्या किसान सभेने चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी प्रशासनावर दबाव गट निर्माण करण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी या खोºयातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन लोकलढा उभारण्यासाठी हाक दिली आहे. तर, राजकीय बॅनर, पक्षाचा झेंडा खाली ठेवून चिकोत्रातील जलसमृद्धीसाठी एकसंध राहण्यासाठी येथील ग्रामस्थांनी साद घातली आहे. त्यामुळे तब्बल २२ वर्षांपासून पाण्याचे दुर्भिक्ष्य असतानाही असंघटितपणामुळे लोकचळवळ उभारू शकलेली नव्हती. पहिल्यांदाच चिकोत्रा जलतृप्ती लोकलढा उभारला जातोय.

१९९६ मध्ये चिकोत्रा खोऱ्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहून प्रशासनाने कागल तालुक्याच्या दक्षिणेकडे आजरा तालुक्याच्या हद्दीत झुलपेवाडी येथे चिकोत्रा (झुलपेवाडी) धरणाची उभारणी केली. मात्र, अत्यल्प पाणलोट क्षेत्रामुळे हे धरण अतिवृष्टीची दोन वर्षे वगळता पूर्ण क्षमतेने भरतच नाही. परिणामी, ऐन उन्हाळ्यात येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण ठरलेलीच असते.धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी राजकीय पातळीवर विचारविनिमय आणि प्रशासनाने प्रयत्न केलेच नाहीत, असे नाही. परंतु, हे प्रयत्न अपुरे ठरले आहेत. या चिकोत्रा खोऱ्यात आजरा, भुदरगडसह कागलमधील ३५ गावांचा समावेश आहे. प्रत्येक गावात राजकीय गटतटासह अनेक मंडळे कार्यरत आहेत. परंतु, येथील जनतेला भेडसावणाºया पाणीप्रश्नाबाबत एकदाही व्यापक जनआंदोलन उभारले गेले नाही. या धरणाची क्षमता अवघी दीड टीएमसी इतकीच आहे. जर, हे पूर्ण क्षमतेने भरले तर ३५ गावांच्या पिण्यासह ५ हजार ६२० एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. परंतु, दुर्दैव म्हणजे हे धरण भरतच नाही. यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. यासाठी लोकचळवळीचा लढा तीव्र करून प्रशासनावर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे.गावकऱ्यांची अशीही कृतज्ञता...चिकोत्रा खोºयातील पाणीप्रश्नाबाबत किसान सभेने पुकारलेल्या लोकलढ्याला सर्वच ३५ ग्रामपंचायत प्रशासनाने प्रतिसाद दिला आहे. किसान सभेचे कार्यकर्ते यासाठी जंग-जंग पछाडत आहेत. पदरमोड करून प्रबोधन करणाºया या कार्यकर्त्यांचे गावागावांत स्वागत होत आहे. काही गावांत त्यांचे चहापान, तर काही गावकरी त्यांच्या माध्यानभोजनाची व्यवस्था करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहेत.असे होणार ठरावहेळ्याचा देव, भावेश्वरी मंदिर परिसर, आरळगुंडी, म्हातारीचे पठार, शिवारबा पठार येथून वाया जाणारे पाणी चिकोत्रा धरणात वळवणे तसेच, नागणवाडी धरणग्रस्तांचे पुनर्वसन करून हे धरण तत्काळ पूर्ण करावे या मागण्या १ मेच्या चिकोत्रा खोºयातील ३५ गावांतील ग्रामसभेत करून त्याचे ठराव किसान सभेकडे एकत्रित करण्यात येणार आहेत. तर किसान सभा हे ठराव जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग, तसेच पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांना देऊन पाठपुरावा करणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरण