शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

योग्य समन्वय ठेऊन पाणी पुरवठा केला जाईल, आयुक्त कलशेट्टी यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:34 IST

कोल्हापूर शहरात पिण्याचे पाणी भरपूर आहे; मात्र केवळ आपल्यातील विस्कळीतपणामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे; त्यामुळे नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात योग्य समन्वय ठेवून योग्य व पुरेशा पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाईल, असे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी झालेल्या स्थायी समिती सभेत सांगितले. नगरसेवकांनीसुद्धा त्यांच्या भागात काही अडचणी असतील, तर त्या लेखी स्वरूपात द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देयोग्य समन्वय ठेऊन पाणी पुरवठा केला जाईलआयुक्त कलशेट्टी यांची स्थायी सभेत ग्वाही

कोल्हापूर : शहरात पिण्याचे पाणी भरपूर आहे; मात्र केवळ आपल्यातील विस्कळीतपणामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे; त्यामुळे नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात योग्य समन्वय ठेवून योग्य व पुरेशा पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाईल, असे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी झालेल्या स्थायी समिती सभेत सांगितले. नगरसेवकांनीसुद्धा त्यांच्या भागात काही अडचणी असतील, तर त्या लेखी स्वरूपात द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.शहरात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. नियोजनाचा अभाव, गळती, यामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत असल्याच्या तक्रारी सभापती शारंगधर देशमुख व संदीप कवाळे यांनी सभेत केली. त्यावेळी आयुक्तांनी त्याची दखल घेत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.शहरातील जलवाहिन्यांची गळती काढण्याचे काम सुरूआहे. त्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. कामाच्या वेळेचे नियोजन करताना अधिकाऱ्यांनी स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यावे.

अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर हे पाणी पुरवठा विभागाकडे, तसेच पाणी पुरवठा सुरळीत सुरूराहण्यासाठी लक्ष देतील. त्यांनी वेळोवेळी फिरती करावी. जेथे माझी आवश्यकता असेल, त्या ठिकाणी मी स्वत: येऊन पाहणी करतो. सदस्यांनी व प्रशासनाने एकत्रित येऊन काम केले पाहिजे, असे सांगितले.अमृत योजनेच्या कामांचा आढावा मी आठवड्यात घेणार आहे. ही कामे गतीने पूर्ण व्हावीत, अशी आपली अपेक्षा आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याबाबत जनजागृती करण्यात येईल, असेही ते म्हणाले.शिंगणापूर येथे पाणी उपसा करण्याकरिता पाचवा पंप खरेदीची प्रक्रिया सुरू करणार आहे. पाचव्या पंपाद्वारे तासाला सात लाख लिटर्स पाण्याचा डिस्चार्ज वाढेल; त्यामुळे ई वॉर्डला पाणी पुरवठा करता येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.झुम प्रकल्पामधील कचऱ्यावर प्रक्रिया करून कॅपिंग करण्यात येणार आहे; परंतु तेथे जमिनीखालून लिचड वाहत असून, ते बंद करावे; त्यामुळे परिसरातील विहिरी व बोअरला दुर्गंधीयुक्तपाणी येत आहे, असे माधुरी लाड यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर खुलासा करताना मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी सांगितले की, सध्या जो कचऱ्याचा ढिग आहे, त्यावर प्रक्रिया करून कॅपिंग करण्यात येणार आहे. हे काम १५ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यामधील कोणतीही लिचड वाहणार नाही.बऱ्याच वर्षांनी आयुक्त स्थायी सभेतमहापालिकेच्या स्थायी समिती सभेत अत्यंत महत्त्वाचे आर्थिक निर्णय होत असतात. धोरणे ठरत असतात. कोट्यवधींची कामे मंजूर केली जातात; परंतु या सभेला आयुक्त म्हणून सहा-सात वर्षांत कोणी उपस्थित राहिले नाहीत. स्थायी सभेस उपस्थित राहावे, असे कोणतेच बंधन आयुक्तांवर नाही; त्यामुळे आतापर्यंत आलेल्या आयुक्तांनी दांड्या मारल्या; परंतु डॉ. कलशेट्टी यांनी सभेस उपस्थित राहून, आपण महिन्यातून एक-दोन सभांना येईन, अशी ग्वाही दिली.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर