शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

‘राजाराम’चा पाणीपुरवठा खंडित

By admin | Updated: April 21, 2015 00:59 IST

वीजजोडणी आज तोडणार; पंचगंगा प्रदूषणप्रकरणी कारवाई

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याचा पाणीपुरवठा सोमवारी सायंकाळी जलसंपदा विभागाने खंडित केला. कारखान्याच्या इतिहासात अशाप्रकारची कारवाई पहिल्यांदाच होत आहे. इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सचे वीज व पाणीपुरवठा तोडण्याची कारवाई आज, मंगळवारी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अनबालगन यांनी सक्त आदेश दिल्यानंतर महावितरण व जलसंपदा विभागाचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्याची तसेच त्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी मुंबई उच्च न्यायायलाने विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांच्यावर सोपविली आहे. शनिवारी कोल्हापुरात झालेल्या पंचगंगा नदी प्रदूषण आढावा बैठकीनंतर चोकलिंगम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अनबालगन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर काही तासांत अनबालगन यांनी नदीचे प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. हे आदेश सोमवारी महावितरण व जलसंपदा विभागाला मिळाले. ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर यांनी या आदेशानुसार सोमवारी कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप व इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक शिंदे यांना राजाराम साखर कारखाना व इचलकरंजीतील प्रोसेसर्स सावंत, रघुनंदन, राधामोहन, राधा कन्हैया, लक्ष्मी को-आॅपरेटिव्ह, हरिहर को-आॅपरेटिव्ह, डेक्कन को-आॅपरेटिव्ह, यशवंत को-आॅपरेटिव्ह, अरविंद कॉटसीन, आदींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. सर्व संबंधितांना चोवीस तासांची नोटीस देऊन मंगळवारी ही कारवाई करण्यात येईल, असे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले. पंचगंगा नदी प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेत सर्वच यंत्रणांना फटकारले आहे. त्यामुळे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ खडबडून जागे झाले आहे. त्यांनी पाणी, वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एकाच वेळी नऊ प्रोसेसर्सवर अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. (प्रतिनिधी) इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सचाही पाणीपुरवठा तोडणारप्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस जलसंपदा विभागाला मिळाली असल्याचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले. राजाराम साखर कारखाना हे आपले ग्राहक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सायंकाळी त्यांचा पाणीपुरवठा खंडित करून यंत्रणा सील करण्यात आली आहेत. इचलकरंजीमधील नऊ प्रोसेसर्स हे आपले ग्राहक नसले तरी नगरपालिकेला पत्र लिहून त्यांचे पाणी कनेक्शन तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.