शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

‘राजाराम’चा पाणीपुरवठा खंडित

By admin | Updated: April 21, 2015 00:59 IST

वीजजोडणी आज तोडणार; पंचगंगा प्रदूषणप्रकरणी कारवाई

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याचा पाणीपुरवठा सोमवारी सायंकाळी जलसंपदा विभागाने खंडित केला. कारखान्याच्या इतिहासात अशाप्रकारची कारवाई पहिल्यांदाच होत आहे. इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सचे वीज व पाणीपुरवठा तोडण्याची कारवाई आज, मंगळवारी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अनबालगन यांनी सक्त आदेश दिल्यानंतर महावितरण व जलसंपदा विभागाचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्याची तसेच त्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी मुंबई उच्च न्यायायलाने विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांच्यावर सोपविली आहे. शनिवारी कोल्हापुरात झालेल्या पंचगंगा नदी प्रदूषण आढावा बैठकीनंतर चोकलिंगम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अनबालगन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर काही तासांत अनबालगन यांनी नदीचे प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. हे आदेश सोमवारी महावितरण व जलसंपदा विभागाला मिळाले. ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर यांनी या आदेशानुसार सोमवारी कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप व इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक शिंदे यांना राजाराम साखर कारखाना व इचलकरंजीतील प्रोसेसर्स सावंत, रघुनंदन, राधामोहन, राधा कन्हैया, लक्ष्मी को-आॅपरेटिव्ह, हरिहर को-आॅपरेटिव्ह, डेक्कन को-आॅपरेटिव्ह, यशवंत को-आॅपरेटिव्ह, अरविंद कॉटसीन, आदींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. सर्व संबंधितांना चोवीस तासांची नोटीस देऊन मंगळवारी ही कारवाई करण्यात येईल, असे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले. पंचगंगा नदी प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेत सर्वच यंत्रणांना फटकारले आहे. त्यामुळे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ खडबडून जागे झाले आहे. त्यांनी पाणी, वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एकाच वेळी नऊ प्रोसेसर्सवर अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. (प्रतिनिधी) इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सचाही पाणीपुरवठा तोडणारप्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस जलसंपदा विभागाला मिळाली असल्याचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले. राजाराम साखर कारखाना हे आपले ग्राहक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सायंकाळी त्यांचा पाणीपुरवठा खंडित करून यंत्रणा सील करण्यात आली आहेत. इचलकरंजीमधील नऊ प्रोसेसर्स हे आपले ग्राहक नसले तरी नगरपालिकेला पत्र लिहून त्यांचे पाणी कनेक्शन तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.