शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
3
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
4
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
5
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
6
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
7
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
8
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
9
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
10
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
11
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
12
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
13
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
14
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
15
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
16
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
17
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
18
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
19
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
20
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

‘राजाराम’चा पाणीपुरवठा खंडित

By admin | Updated: April 21, 2015 00:59 IST

वीजजोडणी आज तोडणार; पंचगंगा प्रदूषणप्रकरणी कारवाई

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याचा पाणीपुरवठा सोमवारी सायंकाळी जलसंपदा विभागाने खंडित केला. कारखान्याच्या इतिहासात अशाप्रकारची कारवाई पहिल्यांदाच होत आहे. इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सचे वीज व पाणीपुरवठा तोडण्याची कारवाई आज, मंगळवारी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अनबालगन यांनी सक्त आदेश दिल्यानंतर महावितरण व जलसंपदा विभागाचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्याची तसेच त्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी मुंबई उच्च न्यायायलाने विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांच्यावर सोपविली आहे. शनिवारी कोल्हापुरात झालेल्या पंचगंगा नदी प्रदूषण आढावा बैठकीनंतर चोकलिंगम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अनबालगन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर काही तासांत अनबालगन यांनी नदीचे प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. हे आदेश सोमवारी महावितरण व जलसंपदा विभागाला मिळाले. ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर यांनी या आदेशानुसार सोमवारी कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप व इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक शिंदे यांना राजाराम साखर कारखाना व इचलकरंजीतील प्रोसेसर्स सावंत, रघुनंदन, राधामोहन, राधा कन्हैया, लक्ष्मी को-आॅपरेटिव्ह, हरिहर को-आॅपरेटिव्ह, डेक्कन को-आॅपरेटिव्ह, यशवंत को-आॅपरेटिव्ह, अरविंद कॉटसीन, आदींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. सर्व संबंधितांना चोवीस तासांची नोटीस देऊन मंगळवारी ही कारवाई करण्यात येईल, असे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले. पंचगंगा नदी प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेत सर्वच यंत्रणांना फटकारले आहे. त्यामुळे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ खडबडून जागे झाले आहे. त्यांनी पाणी, वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एकाच वेळी नऊ प्रोसेसर्सवर अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. (प्रतिनिधी) इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सचाही पाणीपुरवठा तोडणारप्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस जलसंपदा विभागाला मिळाली असल्याचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले. राजाराम साखर कारखाना हे आपले ग्राहक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सायंकाळी त्यांचा पाणीपुरवठा खंडित करून यंत्रणा सील करण्यात आली आहेत. इचलकरंजीमधील नऊ प्रोसेसर्स हे आपले ग्राहक नसले तरी नगरपालिकेला पत्र लिहून त्यांचे पाणी कनेक्शन तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.