शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बावीस वर्षांनंतर आंबेओहोळ प्रकल्पात पहिल्यांदा पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:16 IST

: आजरा तालुक्यातील आंबेओहोळ पाटबंधारे प्रकल्पात २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच पाणीसाठा होत आहे. लाभक्षेत्रात आनंद तर बुडीत क्षेत्रातील नागरिक पुनर्वसनाअभावी ...

: आजरा तालुक्यातील आंबेओहोळ पाटबंधारे प्रकल्पात २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच पाणीसाठा होत आहे. लाभक्षेत्रात आनंद तर बुडीत क्षेत्रातील नागरिक पुनर्वसनाअभावी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून आंबेओहोळ प्रकल्पास मंजुरी मिळाली. अनेक कृती समित्या स्थापन झाल्या. कृती समित्यांचे एकमत होत नसल्याने प्रशासन पुनर्वसनासाठी दिरंगाई करीत असल्यामुळे हा प्रकल्प कधी काम सुरू तर कधी बंद अशामुळे २२ वर्षे रखडला गेला.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नामुळे प्रकल्पाच्या कामास गती आली. गेली चार महिने प्रकल्पाचे काम दिवस-रात्र करण्यात येऊन घळभरणी करण्यात आली, तर दुसरीकडे मुश्रीफ यांनी पुनर्वसनासाठी वेगवेगळ्या बैठकांचा जोर सुरू केल्याने प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न सुटले. पण, काही प्रश्न अंधातरीच राहिले.

मुश्रीफ यांनी अधिकारी व प्रकल्पग्रस्त यांच्या बैठकातून घळभरणी करून पाणीसाठा करू द्या. शेवटच्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत प्रकल्पातून पाणीसाठा सोडला जाणार नाही, असा शब्द दिला. त्यामुळे प्रकल्पाच्या कामास चालना मिळाली.

प्रकल्पाची किरकोळ कामे अपूर्ण आहेत. वळीव पाऊस सुरू झाल्याने पूर्ण होऊ शकली नाहीत. मात्र, महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. सांडवा व कोल्हापूर पद्धतीचे ७ बंधाऱ्यांची कामे झाली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी शेतीसाठी सोडले जाणार असल्याचे लाभक्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.

प्रकल्पाची घळभरणी होणार नाही अशा संभ्रमावस्थेत धरण्रस्त होते. त्यामुळे बुडित क्षेत्रात नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी जमिनी कसण्यासाठी तयार केल्या होत्या. ऊस लागवडही केली होती. हजारो हेक्टर ऊस, झाडे पाण्याखाली गेल्याने धरणग्रस्त हळहळ व्यक्त करीत आहेत.

प्रकल्पात ३२ टक्के पाणीसाठा

धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने प्रकल्पात प्रथमच ३०० मि. ली. मीटर इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे प्रकल्पात पहिल्यांदाच ३२ टक्के पाणीसाठा आहे. १ टीएमसीचा प्रकल्प आहे.

न्याय केव्हा मिळणार ?

प्रकल्पात जमिनी जाऊन आम्ही भूमिहीन झालो आहोत. प्रकल्पात पाणीसाठा झाला यासाठी धरणग्रस्तांनी क्वचित प्रसंगी विरोध केला. आम्ही कायम साथ दिली. पाणीसाठा झाल्याने आमच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष होऊ नये हीच अपेक्षा.

- महादेव खाडे, धरणग्रस्त

--

उत्तूर विभागातील पाणीप्रश्न संपुष्टात

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शंभर टक्के पुनर्वसनाची जबाबदारी घेतल्याने प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळेल. प्रकल्पामुळे परिसरातील शेती सुजलाम सुफलाम् होतील. तसेच उत्तूर परिसरातील पाणीप्रश्न संपुष्टात येईल.

- काशिनाथ तेली, सरपंच, होन्याळी.

-----------------------------

* फोटो ओळी : उत्तूर (ता. आजरा) परिसरात साकारण्यात आलेल्या आंबेओहोळ प्रकल्पात यंदा पहिल्यांदा पाणीसाठ्यास प्रारंभ झाला. त्यामुळे अनेक पिढ्यान् पिढ्या जमीन कसून उदरनिर्वाह करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची शेती यंदापासून पाण्याखाली गेली आहे.

क्रमांक : १८०६२०२१-गड-०१