शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
3
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
4
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
5
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
6
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
7
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
8
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
9
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
10
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
11
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
12
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
14
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
15
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
16
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
18
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
19
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
20
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा

बावीस वर्षांनंतर आंबेओहोळ प्रकल्पात पहिल्यांदा पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:16 IST

: आजरा तालुक्यातील आंबेओहोळ पाटबंधारे प्रकल्पात २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच पाणीसाठा होत आहे. लाभक्षेत्रात आनंद तर बुडीत क्षेत्रातील नागरिक पुनर्वसनाअभावी ...

: आजरा तालुक्यातील आंबेओहोळ पाटबंधारे प्रकल्पात २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच पाणीसाठा होत आहे. लाभक्षेत्रात आनंद तर बुडीत क्षेत्रातील नागरिक पुनर्वसनाअभावी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून आंबेओहोळ प्रकल्पास मंजुरी मिळाली. अनेक कृती समित्या स्थापन झाल्या. कृती समित्यांचे एकमत होत नसल्याने प्रशासन पुनर्वसनासाठी दिरंगाई करीत असल्यामुळे हा प्रकल्प कधी काम सुरू तर कधी बंद अशामुळे २२ वर्षे रखडला गेला.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नामुळे प्रकल्पाच्या कामास गती आली. गेली चार महिने प्रकल्पाचे काम दिवस-रात्र करण्यात येऊन घळभरणी करण्यात आली, तर दुसरीकडे मुश्रीफ यांनी पुनर्वसनासाठी वेगवेगळ्या बैठकांचा जोर सुरू केल्याने प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न सुटले. पण, काही प्रश्न अंधातरीच राहिले.

मुश्रीफ यांनी अधिकारी व प्रकल्पग्रस्त यांच्या बैठकातून घळभरणी करून पाणीसाठा करू द्या. शेवटच्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत प्रकल्पातून पाणीसाठा सोडला जाणार नाही, असा शब्द दिला. त्यामुळे प्रकल्पाच्या कामास चालना मिळाली.

प्रकल्पाची किरकोळ कामे अपूर्ण आहेत. वळीव पाऊस सुरू झाल्याने पूर्ण होऊ शकली नाहीत. मात्र, महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. सांडवा व कोल्हापूर पद्धतीचे ७ बंधाऱ्यांची कामे झाली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी शेतीसाठी सोडले जाणार असल्याचे लाभक्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.

प्रकल्पाची घळभरणी होणार नाही अशा संभ्रमावस्थेत धरण्रस्त होते. त्यामुळे बुडित क्षेत्रात नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी जमिनी कसण्यासाठी तयार केल्या होत्या. ऊस लागवडही केली होती. हजारो हेक्टर ऊस, झाडे पाण्याखाली गेल्याने धरणग्रस्त हळहळ व्यक्त करीत आहेत.

प्रकल्पात ३२ टक्के पाणीसाठा

धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने प्रकल्पात प्रथमच ३०० मि. ली. मीटर इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे प्रकल्पात पहिल्यांदाच ३२ टक्के पाणीसाठा आहे. १ टीएमसीचा प्रकल्प आहे.

न्याय केव्हा मिळणार ?

प्रकल्पात जमिनी जाऊन आम्ही भूमिहीन झालो आहोत. प्रकल्पात पाणीसाठा झाला यासाठी धरणग्रस्तांनी क्वचित प्रसंगी विरोध केला. आम्ही कायम साथ दिली. पाणीसाठा झाल्याने आमच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष होऊ नये हीच अपेक्षा.

- महादेव खाडे, धरणग्रस्त

--

उत्तूर विभागातील पाणीप्रश्न संपुष्टात

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शंभर टक्के पुनर्वसनाची जबाबदारी घेतल्याने प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळेल. प्रकल्पामुळे परिसरातील शेती सुजलाम सुफलाम् होतील. तसेच उत्तूर परिसरातील पाणीप्रश्न संपुष्टात येईल.

- काशिनाथ तेली, सरपंच, होन्याळी.

-----------------------------

* फोटो ओळी : उत्तूर (ता. आजरा) परिसरात साकारण्यात आलेल्या आंबेओहोळ प्रकल्पात यंदा पहिल्यांदा पाणीसाठ्यास प्रारंभ झाला. त्यामुळे अनेक पिढ्यान् पिढ्या जमीन कसून उदरनिर्वाह करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची शेती यंदापासून पाण्याखाली गेली आहे.

क्रमांक : १८०६२०२१-गड-०१