शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

जिल्ह्यातील ९१ गावांमध्ये भासू शकते पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:28 IST

कोल्हापूर : उन्हाळ्याची चाहूल लागली असून, येत्या महिन्या-दीड महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात ९१ गावांमध्ये पाणीटंचाई भासू शकते. ही टंचाई भासू ...

कोल्हापूर : उन्हाळ्याची चाहूल लागली असून, येत्या महिन्या-दीड महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात ९१ गावांमध्ये पाणीटंचाई भासू शकते. ही टंचाई भासू नये यासाठी विविध उपायोजना सुरू करण्यात आल्या असून, विंधन विहिरींसाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे.

जिल्ह्यांमध्ये गावांबरोबरच वाड्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ९१ गावांबरोबरच २१९ वाड्यांवरही पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरून एका गावातील आणि चार वाड्यांवरील सार्वजनिक विहिरी खोल करण्यात येणार असून, तेथील गाळ काढण्यात येणार आहे. टंचाई भासण्यास सुरुवात होताच तातडीचा उपाय म्हणून गावातीलच खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहेत. गावांमधील ४५, तर वाड्यांवरील १८ खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहेत.

विंधन विहिरींच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रतिवर्षी नियोजन करण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात ४५ गावांमध्ये आणि १९२ वाड्यांवर विंधन विहिरी खोदण्याचे नियोजन असून, त्यादृष्टीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. वाड्यांवरील २ नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती हाती घेण्यात येणार आहे, तर ३ वाड्यांवरील पूरक पाणी योजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

चौकट

दोन कोटींचा खर्च

सार्वजनिक विहिरी खोल करणे, गाळ काढणे, खाजगी विहिरी अधिग्रहित करणे, नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करणे, पूरक पाणी योजना करणे या सर्व कामांसाठी २ कोटी ४ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. सध्या केवळ पूर्वतयारी सुरू आहे.

कोट

संभाव्य कोणत्या गावांमध्ये आणि वाड्यांवर पाणीटंचाई भासेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येणार आहे. पाणीटंचाई याचा अर्थ त्या गावात पाणीच नाही असा होत नाही. शासकीय योजनेच्या स्रोताद्वारे पाणीपुरवठा बंद होतो; परंतु त्या ठिकाणी अन्य पर्यायांच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू ठेवला जातो. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. ८ मार्चअखेर अशी टंचाई कुठेही नाही.

मनीष पवार

प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर.