शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांनो पाणी जपून वापरा; पाणी कपातीचे धोरण, एकदिवस आड पाणी येणार

By भारत चव्हाण | Updated: October 12, 2023 16:47 IST

पुरेशा पाऊस झाला नसल्याने भोगावती, पंचगंगा नदीची पातळी अचानक कमी होण्याचे प्रकार वाढले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी पुरेशा पाऊस झाला नसल्याने भोगावती, पंचगंगा नदीची पातळी अचानक कमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच फेब्रुवारीनंतर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या गोष्टीचा विचार करुन शहर पाणी पुरवठा विभागाकडून बी, सी, डी व ई वॉर्डमधील बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या भागातील नागरिकांना उद्या, शनिवार ( दि. १४ ऑक्टोंबर) पासून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. सन २०२३ मध्ये नियमित पावसाच्या अभावी धरण क्षेत्रामधील पाणी साठा कमी होत असल्याने नदीपात्रामध्ये पाण्याची पाण्याची पातळी कमी होत आहे. भविष्यातील पाणी टंचाई विचारात घेता शहराला पुरेसा पाणी पुरवठा योग्य दाबाने होण्यासाठी व पाणी टंचाई परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. पाणी पुरवठ्यातील हा बदल प्रायोगिक तत्वावर असून काळम्मावाडी योजना जर दसऱ्यानंतर सुरु झाली आणि नागरिकांना पाणी व्यवस्थित मिळायला लागले की एक दिवस आड पाणी पुरवठ्याचा निर्णय रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शहरातील नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महापालिका पाणी पुरवठा विभागास सहकार्य करावे, असे आवाहनही सरनोबत यांनी  केले आहे. तर एक दिवसआड पाणी औटघटकेचा निर्णय कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्ण झाले असून दसरा ते दिवाळी दरम्यान या योजनेतून  शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे. खरंच ही योजना मुश्रीफ यांच्या सांगण्याप्रमाणे सुरु झाली तर एक दिवस आड पाणी पुरवठ्याचा निर्णय हा औटघटकेचा ठरणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी