शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

कोल्हापूरकरांनो पाणी जपून वापरा; पाणी कपातीचे धोरण, एकदिवस आड पाणी येणार

By भारत चव्हाण | Updated: October 12, 2023 16:47 IST

पुरेशा पाऊस झाला नसल्याने भोगावती, पंचगंगा नदीची पातळी अचानक कमी होण्याचे प्रकार वाढले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी पुरेशा पाऊस झाला नसल्याने भोगावती, पंचगंगा नदीची पातळी अचानक कमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच फेब्रुवारीनंतर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या गोष्टीचा विचार करुन शहर पाणी पुरवठा विभागाकडून बी, सी, डी व ई वॉर्डमधील बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या भागातील नागरिकांना उद्या, शनिवार ( दि. १४ ऑक्टोंबर) पासून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. सन २०२३ मध्ये नियमित पावसाच्या अभावी धरण क्षेत्रामधील पाणी साठा कमी होत असल्याने नदीपात्रामध्ये पाण्याची पाण्याची पातळी कमी होत आहे. भविष्यातील पाणी टंचाई विचारात घेता शहराला पुरेसा पाणी पुरवठा योग्य दाबाने होण्यासाठी व पाणी टंचाई परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. पाणी पुरवठ्यातील हा बदल प्रायोगिक तत्वावर असून काळम्मावाडी योजना जर दसऱ्यानंतर सुरु झाली आणि नागरिकांना पाणी व्यवस्थित मिळायला लागले की एक दिवस आड पाणी पुरवठ्याचा निर्णय रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शहरातील नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महापालिका पाणी पुरवठा विभागास सहकार्य करावे, असे आवाहनही सरनोबत यांनी  केले आहे. तर एक दिवसआड पाणी औटघटकेचा निर्णय कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्ण झाले असून दसरा ते दिवाळी दरम्यान या योजनेतून  शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे. खरंच ही योजना मुश्रीफ यांच्या सांगण्याप्रमाणे सुरु झाली तर एक दिवस आड पाणी पुरवठ्याचा निर्णय हा औटघटकेचा ठरणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी