शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तीन फुटाने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 18:51 IST

गेले दोन दिवस सागंली, सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याने नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीचे वेगाने वाढणारी पाणी पातळी आज सकाळपासून मंदावली.

ठळक मुद्देश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तीन फुटाने वाढश्रींची उत्सवमूर्ती प.पू. नारायणस्वामी महाराजांच्या मठात

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी : गेले दोन दिवस सागंली, सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याने नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीचे वेगाने वाढणारी पाणी पातळी आज सकाळपासून मंदावली.

पाउस थांबल्याने आणि धरणातून होणारा विसर्ग कमी झाल्याने व अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने येथील कृष्णा-पंचगंगा नदीची पाणी लवकरच स्थिर होईल. या आशेने नदीकाठच्या लोकांना दिलासा मिळाला आहे.दरम्यान, कालपासून नदीच्या पाणी पातळीत तीन फुटाने वाढ झाली. नदीचे वाढलेले पाणी नृसिंहवाडी परीसरातील बाबर वसाहत, राम नगर, सुमित्रा मंगल कार्यालय, प्रबुद्ध नगर आदी ठिकाणी नदीचे पाणी पोहचल्याने त्या परिसरातील सुमारे २० कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.दत्त मंदिर परिसरातील टेंबे स्वामी नवे मंदिर, गोपाळपुरा देणगी ऑफिस, प.पू.नारायणस्वामी मंदिर आदी ठिकाणी नदीचे पाणी पोहचले आहे.श्री दत्त मंदिरात नदीचे पाणी असल्याने श्रींची उत्सवमूर्ती प.पू. नारायणस्वामी महाराजांच्या मठात ठेवण्यात आली असून तिथे तिन्ही त्रिकाळ पूजा अर्चा चालू आहे. दत्तात्रय, पांडुरंग व अवधूत रुक्केपुजारी व परिवार हे श्रींच्या उत्सवमूर्तीसाठी रोज लागणाऱ्या फुलांच्या माळेची सेवा करत असून संजय रुक्केपुजारी हे श्रींचा आकर्षक पोशाख करण्याची सेवा करत आहेत. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूरReligious Placesधार्मिक स्थळे