शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: November 9, 2014 01:37 IST

पाणी गळती : मोरेवाडी-कंदलगाव, चित्रनगरी परिसरात पाण्याचा तुटवडा

 पाचगाव : मोरेवाडी-कंदलगांव (ता. करवीर) येथील कोल्हापूर चित्रनगरीच्या रस्त्यावरील मुख्य जलवाहिनीला आज, शनिवारी मोठी गळती लागली. या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. त्याचा परिणाम येथील जलकुंभावर झाला आहे. त्यामुळे या परिसरातील उपनगरांतील नागरिकांना कमी व अपुऱ्या दाबाने पाणी मिळणार आहे. कोल्हापूर चित्रनगरी येथील जलकुंभ (पाण्याची टाकी) क्षमता ही २२ लाख ५० हजार लिटर इतकी आहे. या टाकीमुळे परिसरातील वैभव हाउसिंग सोसायटीसह म्हाडा कॉलनी, आर. के.नगर, मोरेवाडी, आदी परिसराला नागरिकांना रोज सकाळी व सायंकाळी या वेळेत प्रत्येकी दोन तास पाणी मिळते. आज, शनिवारी दुपारी चित्रनगरी रस्त्याच्या जलवाहिनीला गळती लागली. त्यामधून हजारो लिटर पाणी वाया गेले. याचा परिणाम ही टाकी पूर्ण भरण्याच्या क्षमतेवर झाला. त्यामुळे उद्या, रविवारी नागरिकांना पाणीटंचाई भासणार आहे. दरम्यान, महापालिका प्रशासन सोमवार (दि. १०) या जलवाहिनीचे काम सुरू करण्याची शक्यता आहे. गावाशेजारी असणाऱ्या अनेक कॉलन्यांमध्ये जलवाहिनीची गळती दिवसेंदिवस वाढत असून, या गळतीमुळे स्थानिक नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. काहीवेळा या गळतीच्या खड्ड्यांतूनच नागरिकांना आपली तहान भागवावी लागत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. आर. के. नगर परिसरात अशा प्रकारची १३ ते १४ ठिकाणी गळती असून, या गळतीमधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या वाया जात असलेल्या पाण्याबद्दल पाणीपुरवठा कर्मचारी व अधिकाऱ्यांना अनेकवेळा तोंडी सूचना देऊनसुद्धा याकडे दुर्लक्ष केले आहे. या गळतीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी जर एका आठवड्यात लक्ष दिले नाही, तर ग्रामपंचायतीमार्फत आंदोलनाचा इशारा ग्रामपंचायत सदस्य हेमंत नाईक यांनी दिला आहे. (वार्ताहर)